मोखाडा नगरपंचायत रिक्त पदे; कंत्राटी कर्मचाऱ्यांवर भार

‘कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे’


मोखाडा : मोखाडा नगरपंचायत ही आता रिक्त पदांची पंचायत झाल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी येथील अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या झाल्या यामध्ये मुख्याधिकारी यांची सुद्धा बदली झाली. त्यानंतर नवीन मुख्याधिकारी येण्यासाठी तीन ते चार महिने लागले, मात्र आता या कार्यालयातील महत्त्वाची पद मात्र अद्यापपर्यंत रिक्त आहेत. यामध्ये महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा १, महाराष्ट्र नगर परिषद कर निर्धारक व प्रशासकीय सेवा ३ पदे महाराष्ट्र नगर परिषद नगर रचनाकार आणि विकास सेवा १ पद आणि स्वच्छता निरीक्षक २ पदे अशी एकूण ७ पदे मंजूर आहेत मात्र आज घडीला यापैकी एकही पद भरले गेले नसल्यामुळे अगोदरच कमी असलेल्या कर्मचाऱ्यावरच या पदांचा भार टाकून कसाबसा कारभार चालवला जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.


एखाद्या शहराचा सर्व कारभार हा येथील नगरपंचायत नगर परिषद किंवा महानगरपालिका यांच्याद्वारे केला जातो. याशिवाय घरपट्टी, पाणीपट्टी, रस्ते नाले गटारी साफसफाई अशा शहराच्या सर्वच मूलभूत गरजांसाठी नगरपंचायत अतिशय महत्त्वाची असते. यामुळे अशा कार्यालयातील महत्त्वाची सर्वच पद भरलेली असणे गरजेचे आहे. एका शहराचा विकास करण्यासाठी ज्या पदांचे महत्त्व अधिक असते ती पदं भरणे किंवा त्या पदावर कायमस्वरूपी अधिकारी असणे खूप गरजेचे असते. मात्र नव्यानेच निर्माण झालेल्या मोखाडा नगरपंचायतीत महत्त्वाची ७ पद रिक्त असताना नेमका कारभार करायचा कसा, असा सवाल येथील प्रशासनाला पडलेला आहे. प्रशासनाबरोबरच येथील नागरिकांना सुद्धा या रिक्त पदांमुळे त्रास भोगावा लागत आहे.


यामुळे सध्या उपलब्ध असलेले कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांच्यावरच या रिक्त पदांचा भार टाकून कसाबसा कारभार चालवला जात आहे. यामुळे कोणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे याप्रमाणे येथील कामकाज सध्या चाललेले आहे. शासनाने ही रिक्त पदे तत्काळ भरावीत आणि जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच पावसाच्या सरी बरसणार

मुंबई : वाढत्या उष्णते मध्ये दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. 28 जून रोजीही राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा येलो

NCMC Card : वृद्ध असो की विद्यार्थी; सवलतीसाठी आता १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक

एसटीतील सवलतीसाठी १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक  मुंबई : राज्य मार्ग परिवहन (ST) महामंडळाच्या बसमधील सवलतीच्या

Maharashtra Farmers : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण; प्रत्येक गावात लाभार्थ्यांची यादी पाठवणार मुंबई : गेल्या काही वर्षांतील

Bharat Gogawale : राज्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार मुंबई : गरिबांच्या

Ketan Agrawal Murder Case : "सिया दोषी असेल तर तिलाही त्याच दरीत ढकला!"; आई-वडिलांचा संताप, पोलिसांकडून ९ प्रश्नांची सरबत्ती

पुणे : पुण्याला हादरवून सोडणाऱ्या केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या प्रकरणाचा तपास आता अत्यंत निर्णायक वळणावर येऊन

Jalgaon : जळगाव-गोवा विमानसेवा फुल्ल; १५ जुलैपर्यंत ८०% तिकिटे हाऊसफुल

Jalgaon : पावसाळा सुरू होताच पर्यटनप्रेमींचा मोर्चा गोव्याकडे वळला असून, जळगावहून गोव्यासाठी सुरू असलेल्या