सणासुदीच्या काळात रेल्वेची नवीन ऑफर... दोन्ही रेल्वे तिकिटांच्या बुकिंगवर २०% सूट

नवी दिल्ली: रेल्वेने प्रवाशांसाठी राउंड ट्रिप पॅकेज योजना सुरू केली आहे, ज्याअंतर्गत परतीच्या प्रवासात २०% सूट दिली जाईल. ही योजना सध्या प्रायोगिक तत्वावर लागू करण्यात आली आहे, जेणेकरून त्याचा परिणाम आणि प्रवाशांच्या प्रतिसादाचे मूल्यांकन करता येईल. या योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया.


रेल्वेने सणासुदीच्या काळात गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी 'राउंड ट्रिप पॅकेज' योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत, निर्धारित वेळेच्या मर्यादेत परतीचा प्रवास बुक करणाऱ्या प्रवाशांना रिटर्न तिकिटाच्या मूळ भाड्यावर २०% सूट मिळेल.



'कनेक्टिंग जर्नी फीचर' द्वारे तिकिटे बुक 


ही योजना १४ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होईल. याअंतर्गत, प्रथम १३ ऑक्टोबर २०२५ ते २६ ऑक्टोबर २०२५ दरम्यानच्या तारखेसाठी ऑनवर्ड जर्नीचे तिकीट बुक करावे लागेल. त्यानंतर, १७ नोव्हेंबर २०२५ ते १ डिसेंबर २०२५ दरम्यानच्या तारखेसाठी 'कनेक्टिंग जर्नी फीचर' द्वारे परतीचे तिकीट बुक करता येईल.



बेस फेअरवर सवलत उपलब्ध 


या योजनेत दोन्ही बाजूंचे तिकीट एकाच प्रवाशांच्या नावाने कन्फर्म केले असेल तरच सवलत मिळेल. परतीचे तिकीट बुक करण्यासाठी आगाऊ आरक्षण कालावधी लागू होणार नाही. परतीच्या प्रवासाच्या मूळ भाड्यावरच सवलत दिली जाईल. रेल्वेने सांगितले की, ही योजना सध्या प्रायोगिक तत्त्वावर लागू करण्यात आली आहे, जेणेकरून सणांच्या काळात दोन्ही बाजूंनी गाड्यांचा वापर चांगल्या प्रकारे करता येईल.

Comments
Add Comment

Vande Mataram Law : ‘वंदे मातरम्’चा अपमान केल्यास थेट जेलची हवा! कठोर कायदा आणण्याच्या तयारीत केंद्र सरकार

नवी दिल्ली : राष्ट्रीय गीत असलेल्या ‘वंदे मातरम्’चा अपमान करणे किंवा ते गाताना जाणीवपूर्वक अडथळा निर्माण करणे

World Emoji Day : तुमचा आवडता इमोजी तुमच्या स्वभावाबद्दल काय सांगतो? जाणून घ्या!

WhatsApp, Instagram, Facebook किंवा DM... https://prahaar.in/2026/07/16/never-practice-these-8-habits-after-waking-up-in-the-morning-they-could-affect-your-health/ कुठेही Chat करताना आपण वापरत असलेले इमोजी आता

Murshidabad Train Accident : मुर्शिदाबादमध्ये भीषण अपघात! ट्रेन-स्कूल व्हॅनच्या धडकेत ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

मुर्शिदाबाद : पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद (Murshidabad) जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी भीषण रेल्वे अपघात (Train Accident) झाला.

Hydrogen Train : भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला आज हिरवा झेंडा; जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये

जिंद : तब्बल ११० वर्षांपूर्वी, म्हणजेच १९१६ मध्ये ईस्ट इंडिया रेल्वेने (East India Railway) जिंद–पानीपत रेल्वेमार्ग (Railway Line)

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि