नागपूर मधून धावणार तिसरी वंदे भारत एक्सप्रेस : पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा

नागपूर : अजनी (नागपूर) ते पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ येत्या १० ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. याच दिवशी बेळगाव- बंगळुरु आणि अमृतसर ते श्रीमाता वैष्णौदेवी कटारा या दोन मार्गांवर देखील वंदे भारत एक्स्प्रेसचा शुभारंभ होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकमधून तीन वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवतील.


नागपूर मधून सुटणारी ही तिसरी वंदे भारत एक्स्प्रेस असेल. यापूर्वी नागपूर ते विलासपूर आणि नागपूर ते सिकंदराबाद या मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस सुरु आहेत. आता नागपूरमधील अजनी ते पुणे अशी वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार आहे. रेल्वे मंत्रालयाने नागपूर - पुणे वंदे भारत एक्सप्रेस या गाडीचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र नियमित फेऱ्या केव्हापासून सुरू होणार याची तारीख अद्याप स्पष्ट केलेली नाही.


नवीन वंदे भारत एक्सप्रेस अजनी (नागपूर) येथून सकाळी ९:५० वाजता सुटेल आणि रात्री ९:५० वाजता पुण्याला पोहोचेल. आठवड्यातून सहा दिवस ही सेवा सुरू राहील. सोमवारी नागपूरहून ट्रेन चालणार नाही पुण्याहून ही ट्रेन सकाळी ६:२५ वाजता सुटून, संध्याकाळी ६:२५ वाजता अजनीला पोहोचेल. ही ट्रेन वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड या रेल्वे स्थानकांवर थांबेल.


अजनी (नागपूर) - पुणे वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन स्लीपर वंदे भारत असावी अशी प्रवाशांची अपेक्षा होती. मात्र, सध्या ही सेवा एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह एसी चेअर कार स्वरूपात सुरू करण्यात येत आहे. एसी चेअर कारचे भाडे सुमारे १५०० रुपये तर एसी एक्झिक्युटिव्ह चेअर कारचे भाडे ३५०० रुपये असणार आहे.


अजनी (नागपूर) - पुणे अंतर ८५० किलोमीटर इतकं आहे. या मार्गावरुन धावणाऱ्या हावडा- पुणे या एक्स्प्रेसला पुणे -नागपूर अंतर पार करण्यासाठी १२ तास ५५ मिनिटे लागतात. तर, पुणे- अजनी एसी स्पेशल ट्रेन १३ तास ३५ मिनिटे वेळ लागतो. अजनी- पुणे वंदे भारत एक्स्प्रेस हे अंतर १२ तासात पूर्ण करेल. यामुळं या गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा

Ketan Agrawal Murder Case : लोणावळा हत्याकांड : आरोपी सियाच्या पालकांची कठोर भूमिका : 'दोषी असल्यास मुलीलाही त्याच दरीत ढकलून द्या'...

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या सिया गोयलच्या पालकांनी

Maharashtra Rain Alert : पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता, २३ जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई : राज्यात मान्सून (Monsoon) पुन्हा सक्रिय झाला असून पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान विभागाने (India

Ketan Agrawal Murder Case : 'खून मी नाही, त्याने केला!'... केतन अग्रवाल हत्याकांडात नवा ट्विस्ट; पोलिसही चक्रावले

Ketan Agrawal Murder Case : आधी कॉफी, मग कट? केतन हत्येपूर्वी सिया-चेतनची तासभर चर्चा

कॅफेत बसून रचला गेला होता प्लॅन? पुणे :  पुण्यातील लोहगड (Lohgad) किल्ल्यावर व्यावसायिक केतन अग्रवाल याच्या मृत्यू (Death)

Nitesh Rane : मच्छिमारांच्या सुविधांसाठी दिघी जेट्टी प्रकल्प पावसाळा संपल्यानंतर तातडीने मार्गी लावा

मुंबई, : रायगड(raigad) जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील मौजे दिघी येथील मच्छिमार जेट्टी प्रकल्प तसेच परिसरातील गाळ