LPG गॅस वर ३०,००० कोटी रुपयांचे अनुदान : मध्यमवर्गीयांना दिलासा !

  59

नवी दिल्ली : महागाईने होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे . सध्या LPG गॅस चे दर हे दिवसेंदिवस वाढत आहेत . याचा फटका मध्यमवर्गीयांना बसत असतो . पण आता LPG गॅस चे दर कमी होण्याची शक्यता आहे . पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली, ज्यामध्ये अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यमवर्गीयांना एलपीजी गॅस परवडण्यासाठी ३०,००० कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.


ते म्हणाले की सध्याची राजकीय परिस्थिती पाहता गॅसच्या किमतीत चढ-उतार होत असते . त्यावर नियंत्रण ठेवणे गरजचे आहे . जेणेकरून जनतेला दिलासा मिळेल . म्हणून केंद्र सरकार यावर ३०,००० कोटी रुपयांचे अनुदान देत आहे . २०२५-२६ साठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत १२,००० कोटी रुपयांचे अनुदान मंत्रिमंडळाने मंजूर केले आहे . तसेच तांत्रिक शिक्षण संस्थांना बळकटी देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने ४,२०० कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे .


अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली की, मंत्रिमंडळाने ४२०० कोटी रुपयांच्या मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन अँड रिसर्च इम्प्रूव्हमेंट इन टेक्निकल एज्युकेशन (MERITE) योजनेसाठी अर्थसंकल्पीय सहाय्य मंजूर केले आहे. MERITE अंतर्गत राज्य सरकारी संस्थांना सहाय्य केले जाईल. भारतातील १७५ अभियांत्रिकी संस्था आणि १०० पॉलिटेक्निकना याचा फायदा होईल.

Comments
Add Comment

उत्तरकाशीत ढगफुटी, पूर, भूस्खलन; महाराष्ट्रातील एक महिला पर्यटक अद्याप बेपत्ता

उत्तरकाशी : उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली आणि हर्षिल परिसरात ढगफुटीनंतर मुसळधार पाऊस पडला आणि पूर

ट्रम्प-पुतिन यांच्या भेटीचे भारताकडून स्वागत

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

पंतप्रधान आज कर्नाटकात, नागपूर-पुणेसह तीन वंदे भारत एक्सप्रेसना दाखवणार हिरवा झेंडा

बंगळुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज १० ऑगस्ट रोजी कर्नाटकला भेट देणार आहेत. ते सकाळी ११ वाजता बेंगळूरु इथल्या

उत्तरकाशीच्या धारली आणि हर्षील गावाची परिस्थिती अजूनही बिकट! २५० लोकं अजूनही अडकलेले

उत्तरकाशी: उत्तरकाशीच्या धारली गावात झालेल्या आपत्तीनंतर परिस्थिती अजूनही गंभीर आहे. धारलीकडे जाणारे सर्व

भारत निवडणूक आयोगाकडून मोठी कारवाई! महाराष्ट्रातील ९ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द

मुंबई: भारत निवडणूक आयोगाने (ECI) निवडणूक व्यवस्था पारदर्शक करण्याच्या मोहिमेअंतर्गत कारवाई करत ३३४ नोंदणीकृत

अयोध्येत श्रीराम तर बिहारमध्ये सीताधाम; अमित शाहांच्या हस्ते सीतेच्या मंदिरासाठी पायाभरणी

सीतामढ़ी : बिहारच्या सीतामढ़ी येथील पुनौरा धाम येथे माता जानकीच्या भव्य मंदिराचा शिलान्यास झाला. हा केवळ