चार उड्डाणपुलांच्या आराखड्याला रेल्वेची मंजुरी

निधी मागणीसाठी 'एमएमआरडीए'कडे प्रस्ताव


विरार : वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील रेल्वेमार्गावर उभारण्यात येणाऱ्या चार नियोजित उड्डाणपुलांच्या संकल्पना आराखड्याला (जनरल अरेंजमेंट डिझाईन) रेल्वेने मंजुरी दिली आहे. उमेळमान, अलकापुरी, ओसवाल नगरी आणि विराट नगर या ठिकाणी हे रेल्वे उड्डाणपूल उभारण्यात येणार असून या पुलांच्या आराखड्याला मंजुरी दिल्याचे पत्र रेल्वे प्रशासनाकडून बुधवारी महापालिकेला पाठविण्यात आले आहे. त्यामुळे या उड्डाणपुलाच्या निर्मितीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.


वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याचप्रमाणे वाहनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे विविध मार्गांवर वाहनचालकांना वाहतूक कोंडीच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. शहरात सर्वाधिक वाहतूक कोंडी रेल्वे वसई, नालासोपारा आणि विरार या तीनही रेल्वे स्थानक परिसरात होत असते. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रेल्वे उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव पुढे आला. वसई - विरार महानगरपालिका ने शहरात ४ रेल्वे उड्डाणपूलांचा प्रस्ताव तयार करून तो मंजुरीसाठी एमएमआरडीएकडे पाठवला होता. त्यामध्ये वसई -नायगाव स्थानकादरम्यान उमेळमान, नालासोपारा येथील अलकापुरी, विरारच्या विराट नगर येथे आणि नालासोपारा विरार दरम्यान ओस्वाल नगरी येथे अशा चार उड्डाणपूलांचा समावेश आहे.


दरम्यान, उड्डाणपुलाच्या निमिर्तीसाठी रेल्वेची परवानगी आवश्यक असल्याने महापालिकेने चार ठिकाणी नियोजित रेल्वे उड्डाणपुलांची जनरल अरेंजमेंट डिझाईन तयार करून रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाला पाठविली होती. मात्र, त्याला अनेक दिवसांपासून मंजुरी मिळाली नव्हती. तसेच लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे अखेर पश्चिम रेल्वेने या आराखड्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता या उड्डाणपुलाच्या बांधणीसाठी मिळालेली रेल्वेची मंजुरी आणि इतर कागदपत्र एमएमआरडीएकडे निधीच्या अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे अंतिम मंजुरीनंतर हे उड्डाणपूल एमएमआरडीए आणि रेल्वेच्या रुळावरील भाग हा रेल्वेतर्फे बांधण्यात येणार आहे.


११ उड्डाणपुलांच्या कामाला गती

नायगाव ते विरार दरम्यान उमेळमान, अलकापुरी, ओसवाल नगरी आणि विराट नगर येथे उभारण्यात येणाऱ्या रेल्वेच्या चार उड्डाणपुलांसह शहरातील आणखी ७ उड्डाणपुलाच्या कामाला गती मिळाली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीला त्रस्त झेलेल्या लाखो नागरिकांना दिलासा मिळणार आहे. वसई विरार मधील रखडलेल्या ७ उड्डाणपुलाच्या कामाला गती मिळावी म्हणून आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी शासनाकडे पाठपुरावा केला.अधिवेशनात सुद्धा हा विषय त्यांनी लाऊन धरला. शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर हे सर्व अकराही उड्डाणपूल वाहनधारकांसाठी दिलासादायक
ठरणार आहेत.

रेल्वे उड्डाणपुलासाठी लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा

रेल्वेच्या ४ उड्डाणपुलांसाठी आजी - माजी आमदारांसह खासदारांनी पाठपुरावा केला आहे. वसईचे माजी आमदार हितेंद्र ठाकूर आणि नालासोपाऱ्याचे माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनी या कामासाठी एमएमआरडीए आणि रेल्वेकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर रेल्वेच्या आराखडा मंजुरीसाठी पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा आणि नालासोपाराचे विद्यमान आमदार राजन नाईक यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला आहे. लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश आले असून अखेर रेल्वे तर्फे संकल्पना आराखडा मंजूर करण्यात आला आहे.
Comments
Add Comment

Bullet Train : बुलेट ट्रेनचे राज्यातील काम जोरात, तंत्रज्ञांनी पालघर जिल्ह्यात केली कमाल

पालघर : मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर आहे. केंद्रातल्या मोदी सरकार आणि राज्यातल्या फडणवीस

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन: पालघरमध्ये तिसऱ्या डोंगराळ बोगद्याचे काम फत्ते; अवघ्या ५ महिन्यांत महाराष्ट्रातील 'हे' मोठे आव्हान पूर्ण

पालघर : देशातील पहिल्या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या (high-Speed Railway Project) म्हणजेच 'मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन'च्या

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात ठार १३ जणांवर अंत्यसंस्कार, पीडित कुटुंबांचे पालकत्व शासन स्वीकारणार

डहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील धनिवरी येथे १८ मे रोजी झालेल्या भीषण अपघातातील १३ मृतांवर आज अत्यंत

Palghar Accident : काळजाचा ठोका चुकवणारं दृश्य! एकाच रांगेत १२ मृतदेह, बापूगावात महिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

पालघर : आनंदाने नटलेले घर, साखरपुड्याच्या निमित्ताने जमलेले सर्व नातेवाईक आणि उत्साहाचे वातावरण... पण नियतीच्या

Palghar Accident : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १३ जणांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना मदत जाहीर

डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानोरी येथे रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण आणि

Mumbai- Ahemdabad Expressway Accident : डहाणूमध्ये 100 वऱ्हाड्यांनी भरलेल्या ट्रकला भरधाव कंटेनरची धडक; 12 जणांचा जागीच मृत्यू, 25 हून अधिक गंभीर

डहाणू : साखरपुड्याचा आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या पाहुण्यांवर काळाने अचानक