चार उड्डाणपुलांच्या आराखड्याला रेल्वेची मंजुरी

निधी मागणीसाठी 'एमएमआरडीए'कडे प्रस्ताव


विरार : वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील रेल्वेमार्गावर उभारण्यात येणाऱ्या चार नियोजित उड्डाणपुलांच्या संकल्पना आराखड्याला (जनरल अरेंजमेंट डिझाईन) रेल्वेने मंजुरी दिली आहे. उमेळमान, अलकापुरी, ओसवाल नगरी आणि विराट नगर या ठिकाणी हे रेल्वे उड्डाणपूल उभारण्यात येणार असून या पुलांच्या आराखड्याला मंजुरी दिल्याचे पत्र रेल्वे प्रशासनाकडून बुधवारी महापालिकेला पाठविण्यात आले आहे. त्यामुळे या उड्डाणपुलाच्या निर्मितीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.


वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याचप्रमाणे वाहनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे विविध मार्गांवर वाहनचालकांना वाहतूक कोंडीच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. शहरात सर्वाधिक वाहतूक कोंडी रेल्वे वसई, नालासोपारा आणि विरार या तीनही रेल्वे स्थानक परिसरात होत असते. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रेल्वे उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव पुढे आला. वसई - विरार महानगरपालिका ने शहरात ४ रेल्वे उड्डाणपूलांचा प्रस्ताव तयार करून तो मंजुरीसाठी एमएमआरडीएकडे पाठवला होता. त्यामध्ये वसई -नायगाव स्थानकादरम्यान उमेळमान, नालासोपारा येथील अलकापुरी, विरारच्या विराट नगर येथे आणि नालासोपारा विरार दरम्यान ओस्वाल नगरी येथे अशा चार उड्डाणपूलांचा समावेश आहे.


दरम्यान, उड्डाणपुलाच्या निमिर्तीसाठी रेल्वेची परवानगी आवश्यक असल्याने महापालिकेने चार ठिकाणी नियोजित रेल्वे उड्डाणपुलांची जनरल अरेंजमेंट डिझाईन तयार करून रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाला पाठविली होती. मात्र, त्याला अनेक दिवसांपासून मंजुरी मिळाली नव्हती. तसेच लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे अखेर पश्चिम रेल्वेने या आराखड्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता या उड्डाणपुलाच्या बांधणीसाठी मिळालेली रेल्वेची मंजुरी आणि इतर कागदपत्र एमएमआरडीएकडे निधीच्या अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे अंतिम मंजुरीनंतर हे उड्डाणपूल एमएमआरडीए आणि रेल्वेच्या रुळावरील भाग हा रेल्वेतर्फे बांधण्यात येणार आहे.


११ उड्डाणपुलांच्या कामाला गती

नायगाव ते विरार दरम्यान उमेळमान, अलकापुरी, ओसवाल नगरी आणि विराट नगर येथे उभारण्यात येणाऱ्या रेल्वेच्या चार उड्डाणपुलांसह शहरातील आणखी ७ उड्डाणपुलाच्या कामाला गती मिळाली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीला त्रस्त झेलेल्या लाखो नागरिकांना दिलासा मिळणार आहे. वसई विरार मधील रखडलेल्या ७ उड्डाणपुलाच्या कामाला गती मिळावी म्हणून आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी शासनाकडे पाठपुरावा केला.अधिवेशनात सुद्धा हा विषय त्यांनी लाऊन धरला. शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर हे सर्व अकराही उड्डाणपूल वाहनधारकांसाठी दिलासादायक
ठरणार आहेत.

रेल्वे उड्डाणपुलासाठी लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा

रेल्वेच्या ४ उड्डाणपुलांसाठी आजी - माजी आमदारांसह खासदारांनी पाठपुरावा केला आहे. वसईचे माजी आमदार हितेंद्र ठाकूर आणि नालासोपाऱ्याचे माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनी या कामासाठी एमएमआरडीए आणि रेल्वेकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर रेल्वेच्या आराखडा मंजुरीसाठी पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा आणि नालासोपाराचे विद्यमान आमदार राजन नाईक यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला आहे. लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश आले असून अखेर रेल्वे तर्फे संकल्पना आराखडा मंजूर करण्यात आला आहे.
Comments
Add Comment

Vasai Railway Station Viral Video : जीवाशी खेळ! वसई स्थानकावरील VIDEO पाहून नेटकरी संतापले

वसई : मुंबई उपनगरीय रेल्वेत (Mumbai Suburban Railway) प्रवाशांकडून निष्काळजीपणामुळे जीव धोक्यात घालणाऱ्या घटना वारंवार समोर

Indian Fishermen : शिक्षा पूर्ण होऊनही १७८ भारतीय मच्छीमार पाकिस्तानच्या तुरुंगात

कॉन्स्युलर कराराचे उल्लंघन; डहाणू-तलासरीतील १८ कुटुंबांचा न्यायासाठी आक्रोश डहाणू : भारत-पाकिस्तानदरम्यान

Heavy Rain In Palghar : घोणसई गावाला पाण्याचा वेढा; मुख्य पूल पाण्याखाली

- मुख्य पूल बुडाल्याने गावाचा बाहेरील संपर्क खंडित वाडा : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार

Vasai-Virar Rain Update : वसई-विरारमध्ये पावसाचा कहर! पूर, वीज आणि इंटरनेट बंद; हजारो नागरिकांचे जनजीवन विस्कळीत

पालघर : वसई-विरार (Vasai- Virar) परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सलग दोन

Vandri Dam Waterfall : धबधब्यावर जाताय? थांबा! पालघरच्या वांद्री धबधब्यावर घडला थरार

धबधब्यांवर पाणी अचानक वाढलं आणि पर्यटकांची उडाली तारांबळ पालघर : मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पालघर

Girish Mahajan : पालघर पूरस्थितीवर सरकार ॲक्शन मोडमध्ये; गिरीश महाजनांचा दौरा, अभ्यासगटाची घोषणा

पालघर : मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) पालघर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती (Flood Situation) निर्माण झाली असून जनजीवन (Normal