आशिया कप हॉकी स्पर्धेतून पाकिस्तान संघाची माघार; भारतात येऊन खेळण्यास नकार

नवी दिल्ली : आशिया कप क्रिकेट स्पर्धेतील भारत-पाक यांच्यातील तिढा सुटला असताना दुसऱ्या बाजूला आशिया कप हॉकी स्पर्धेतून पाकिस्तान संघाने माघार घेतली आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तवर पाकिस्तान संघाने भारतात येण्यास नकार दिल्याची माहिती समोर येत आहे. आगामी २७ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत हॉकीतील आशिया कप स्पर्धा नियोजित आहे.


बिहारमधील राजगीर येथे होणारी ही स्पर्धा नेदरलंड आणि बेल्जियम यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणाऱ्या २०२६ च्या हॉकी वर्ल्ड कपच्या दृष्टिने महत्त्वपूर्ण आहे. ही स्पर्धा जिंकणारा संघ हॉकी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहे. यासंदर्भातील माहितीनुसार भारत सरकारने पाकिस्तानी खेळाडूंना या स्पर्धेसाठी व्हिसा देण्याची तयारी दर्शवली होती. पण पाकिस्तान हॉकी महासंघाने सुरक्षिततेच्या कारणास्तवर भारतात येण्यास नकार दिला आहे. त्यानंतर भारतीय हॉकी महासंघाने पाकिस्तानच्या जागी बांगलादेशच्या हॉकी संघाला या स्पर्धेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे.


आशिया कप हॉकी स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्याशिवाय चीन, जपान, मलेशिया, दक्षिण कोरिया आणि ओमान आणि चीनी ताइपे अर्थात तैवान या आठ संघांचा समावेश आहे. पाकिस्तान हॉकी संघ या स्पर्धेत सहभागी होणार नसल्यामुळे आता त्यांच्या जागी बांगलादेश संघाच्या या स्पर्धेत एन्ट्री होणार असल्याचे दिसत आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाक यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. याचा परिणाम क्रीडा क्षेत्रातील अनेक स्पर्धांवर उमटताना दिसत आहे. क्रिकेटमधील आशिया कप स्पर्धेवरही संकटाचे सावट निर्माण झाले होते. त्यामुळेच भारताकडे यजमानपद असूनही ही स्पर्धा युएईच्या मैदानात खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Comments
Add Comment

IND W vs AUS W : भारतीय संघ दिमाखात फायनलमध्ये, ऑस्ट्रेलियाला केले चारीमुंड्या चीत, आता द. आफ्रिकेशी होणार लढत

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला वनडे वर्ल्डकपच्या सेमीफायनल सामन्यात भारताने बलाढ्य

शरद पवार-फडणवीस एकत्र! 'या' नेत्यांना मोठा धक्का! नक्की काय घडलं?

मुंबई : राज्याच्या राजकारणात नेहमीच एकमेकांविरोधात उभे ठाकणारे भाजपचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि

कोहलीचा १८ नंबर घेऊन पंत मैदानात: सोशल मीडियावर व्हायरल फोटो!

आसाम : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेत भारताला पराभव पत्करावा लागला. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात

WC Semifinal: स्मृती मंधानाच्या विकेटवरून वाद, मैदानावर उभे असलेले अंपायरही झाले हैराण

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी महिला क्रिकेट वनडे वर्ल्डकपचा सेमीफायनल

सेमीफायनल सामन्यात काळी पट्टी बांधून खेळतायेत खेळाडू... कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!

मुंबई : आयसीसी महिला विश्वचषक २०२५ चा दुसरा उपांत्य सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जात आहे.

सेमी फायनलसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल ; ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला वन डे वर्ल्ड कप २०२५ चा सेमी फायनल सामना नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील