अनधिकृत बांधकामांवर एमएमआरडीए आणणार नियंत्रण

अधिकाऱ्यांना कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार


मुंबई : नागरी विकासात शिस्तबद्धता आणि कायदेशीरतेला चालना देण्यासाठी, तसेच अनधिकृत बांधकामांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी, एमएमआरडीएने विशेष नियोजन प्राधिकरण (एसपीए) म्हणून कार्यरत असलेल्या क्षेत्रांमध्ये अंमलबजावणी अधिक सक्षमपणे राबवण्याचा निर्णय घेतला. यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ (एमआरटीपी ऍट) मधील कलम ५३ अंतर्गत अधिकृत अधिकारी नेमण्यात आले असून, त्यांना अनधिकृत विकासांविरुद्ध वेळीच आणि कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.


कठोर आणि वेळेच्या चौकटीत कारवाई सुनिश्चित करून एमएमआरडीएने ‘झिरो टॉलरन्स’नीती स्वीकारली आहे. जलद गती,ठाम निर्णय,कायदेशीर चौकटीत पूर्ण पारदर्शकतेने अधिकारी काम करतील. प्रत्येक प्रकरणावर ठराविक वेळेत निर्णय घेतला जाईल, योग्य दस्तऐवजीकरण व सुनावणीसह कारवाई केली जाईल. कायदेशीरतेला प्राधान्य, अनधिकृततेवर कारवाई, आणि शिस्तबद्ध नागरी विकास हाच एमएमआरडीएचा महत्त्वपूर्ण उद्देश आहे.


पालघर व अलिबाग येथील विस्तारित क्षेत्रांसाठी विकास परवानग्या त्या-त्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दिल्या जात राहतील, जोपर्यंत विकास आराखडे अंतिम होत नाहीत. त्यामुळे या भागातील अंमलबजावणीची जबाबदारीही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडेच राहील. अनधिकृत बांधकामांची ओळख करणे,एमआरटीपी कायद्यातील कलम ५२ ते ५६ नुसार कायदेशीर कारवाई सुरू करणे,पारदर्शक आणि कायदेशीर कारभारासाठी निश्चित केलेली प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) अमलात आणणे, प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) मध्ये समाविष्ट बाबी, योग्य, न्याय्य नोटीस देणे, नियमानुसार संपूर्ण प्रक्रिया राबविणे,अपील करण्यायोग्य आदेश देणे, न्यायालयीन निर्देशांप्रमाणे कारवाई करणे आदी कामे सर्व एसपीए क्षेत्रांमध्ये एमएमआरडीएने नेमलेले अधिकारी कामे पार पाडतील.

Comments
Add Comment

भावनिक आवाहनाला न फसता महाराष्ट्राच्या विकासाला मतदारांची पसंती - भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

मुंबई : वर्षानुवर्षे भाजपा कार्यकर्त्याने यशाच्या दिशेने पार्टीला नेण्याचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न साकार

BMC Election 2026 : भाजपची ऐतिहासिक मुसंडी तर ठाकरे, काँग्रेसचं काय? २९ महापालिकांच्या रणसंग्रामाचे 'A to Z' अपडेट्स!

मुंबई : भाजपचे निर्विवाद वर्चस्व राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत

 कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, भाजपाचे पाचही उमेदवार विजयी - मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या

BMC Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची २९ पैकी १४ महापालिकेत घसरगुंडी! पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही भोपळा फुटला नाही

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज समोर येत असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील

मुंबईत महायुतीला बहुमत मिळाल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून केले अभिनंदन

राज्यभरातील २९ महानगरपालिकांमध्ये महायुतीच अव्वल मुंबई : अत्यंत प्रतिष्ठेची निवडणुक ठरलेल्या मुंबई

Raj Thackeray : भावाशी युती करूनही राज ठाकरेंच्या खात्यात २२ शून्य, मुंबईत 'मनसे'ला जबरदस्त धक्का; ठाकरे ब्रँड फेल!

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेसाठी २० वर्षांचा वनवास संपवून एकत्र आलेल्या 'ठाकरे बंधूं'साठी आजचा निकाल