सणासुदीच्या हंगामात नारळ, डाळींचे चढे दर

मुंबई (वार्ताहर) :सध्या सणांचा काळ सुरु झाल्यामुळे डाळी तसेच नारळाचा वापर धार्मिक विधी आणि नैवेद्य दाखवण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र अशातच आता नारळासह डाळींचे देखील दर वाढल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला फटका बसत आहे.


यंदा खरिपाच्या पेरण्यांमध्ये डाळींच्या पेरणी क्षेत्रात घट झाली आहे. त्यामुळे श्रावण महिना आणि सणासुदीच्या हंगामात डाळी महागणार आहेत. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या सांख्यिकी विभागाकडील आकडेवारीनुसार, यंदाच्या खरिपात सर्व प्रकारच्या डाळींच्या पेरणी क्षेत्रात सरासरी ०.३१ टक्क्यांची घट झाली आहे. त्यातील सर्वाधिक ६.६८ टक्क्यांची घट तुरीत आहे. मसुरीच्या पेरणी क्षेत्रातही ४.७९ टक्क्यांची मोठी घट आहे.


मुगाच्या पेरणी क्षेत्रात ३.३९ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे काहीसा दिलासा आहे. हरभरा वगळता, सर्व प्रकारच्या डाळींचे नवे पीक पावसाळ्यानंतर बाजारात येते. मात्र पावसाळ्यात पेरण्या कमी-अधिक झाल्यास, पीक बाजारात येण्याआधीच दरांमध्ये चढ-उतार होतात. यंदा पेरणी क्षेत्रात घट झाल्याने पीक घटण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच बाजारात डाळींचे दर वाढण्याची शक्यता आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.


मुंबईच्या किरकोळ बाजारात तूरडाळ ११० रुपये किलो, मुगडाळ १२० ते १२५ रुपये किलो, तर उडदाची डाळ १४० ते १५० रुपये किलोवर स्थिर आहे. खाद्यतेलाचा विचार केल्यास सोयाबीन तेल ११५, सूर्यफूल तेल १३० व शेंगदाणा तेल १७० रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे.


खाद्यतेलाचे दर नियंत्रणात 


भारत हा जगातील सर्वांत मोठा खाद्यतेल वापरकर्ता व आयातदार देश आहे. भारतात इंडोनेशिया व मलेशियातून पामतेलाची, तर रशिया, युक्रेनहून सूर्यफूल तेलाची आयात होते. अर्जेंटिनाहूनही सूर्यफूल तेलाची आयात होते. यंदा रशियाने अलिकडेच सूर्यफूल तेलावरील आयात शुल्कात घट केली. या पावलावर पाऊल ठेवून अर्जेटिनानेही दरकपात केली. त्यामुळे सध्या तरी खाद्यतेल दर नियंत्रणात आहेत. हीच स्थिती आगामी सणासुदीच्या काळात असेल, अशी आशा अ. भा. खाद्यतेल महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकर ठक्कर यांनी व्यक्त केली.


नारळाच्या किमतीतही वाढ : श्रावण महिन्यात नारळाची मागणी वाढली आहे, ज्यामुळे किमती वाढल्या आहेत. त्याचबरोबर दक्षिण भारतातून येणारा पुरवठा घटल्याने बाजारात नारळाचे दर चढले आहेत. पूर्वी २५ ते ३५ रुपयांत मिळणारा नारळ सध्या ४० ते ५० रुपयांना विकला जात असून, ग्राहकांच्या खिशाला कात्री लागली आहे. मुंबई, नवी मुंबई परिसरात आता नारळाला मागणी वाढली आहे. कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूसारख्या प्रमुख नारळ उत्पादक राज्यांत यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. तर काही भागांत अवकाळी पावसामुळे आणि कीड लागवडीमुळे उत्पादनही घटले. त्यामुळे महाराष्ट्रातील बाजारपेठांमध्ये नारळाचा पुरवठा घटला आहे. पुरवठा आणि मागणी यामधील असमतोलामुळे दर वाढले आहेत, अशी माहिती वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी दिली.

Comments
Add Comment

BMC : मुंबई महानगरपालिका मुख्यलयात मंत्रालयाच्या धर्तीवर प्रवेश

मुंबई  : मुंबई महापालिका मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा महापालिका

BMC मुख्यालय उडवून देण्याची धमकी, महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ

महापािलका मुख्यालय उडवून देण्याची धमकी ; महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ अशा धमक्यांना मी मुळीच घाबरत नाही-

अवकाळी पावसाने बाधित फळपिकांचे पंचनामे पूर्ण करा, कृषिमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : 'राज्यात मे आणि जून २०२६ या कालावधीत अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या

Verification of Street Vendors : मुंबईत २० हजार फेरीवाल्यांची पडताळणी पूर्ण

येत्या २६ जून पर्यंत पडताळणी न झालेल्यांना मिळणार नाही क्यू आर कोड ओळखपत्र मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : उच्‍च

Devendra Fadnavis : समर्थ भारत ते विकसित भारत’ पंतप्रधान मोदींमुळेच शक्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र राज्याच्या वतीने पत्र लिहून केले अभिनंदन मुंबई : देशाच्या इतिहासात

Panvel-Karjat Corridor : रेल्वेला नवी लाइफलाइन! लवकरच धावणार उपनगरी रेल्वे; पनवेल-कर्जत कॉरिडॉरचे ९८ टक्के काम पूर्ण

MUMBAI : मुंबई उपनगरी रेल्वे नेटवर्कसाठी महत्त्वाचा ठरणारा बहुप्रतीक्षित पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉर आता