हत्तीण आणि कबुतरखाना प्रकरणात मनसेचा यू टर्न

मुंबई : न्यायालयाच्या आदेशामुळे मुंबईतले कबुतरखाने बंद करण्याची कारवाई महापालिकेने सुरू केली आहे. तसेच न्यायालयीन आदेशानुसार महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीची रवानगी 'वनतारा'मध्ये करण्यात आली आहे. पण या दोन्ही नागरिकांची आंदोलनं सुरू आहेत. महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला 'वनतारा'मधून परत आणावे अशी नांदिणी गावातील ग्रामस्थांची मागणी आहे. तर कबुतरखाने सुरू ठेवावे अशी मागणी करत मुंबईत जैन समुदाय आंदोलन करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांशी चर्चा केली आणि न्यायालयात दाद मागणे हाच पर्याय असल्याचे त्यांना सांगितले. या पार्श्वभूमीवर मनसेच्या नेत्यांची प्रतिक्रिया आली आहे. मनसेने हत्तीण आणि कबुतरखाना प्रकरणात यू टर्न घेतला आहे.



याआधी दादरच्या कबुतरखाना परिसरात बुधवारी ६ ऑगस्ट रोजी जैन समाजाने आक्रमक आंदोलन केले. मुंबई महापालिकेने दादरच्या कबुतरखान्यावर ताडपत्री टाकून तो बंद केला होता. आंदोलकांनी ताडपत्री हटवून कबुतखान्यात धान्य टाकले आणि घोषणाबाजी केली. कबुतरखाना सुरू ठेवण्याची मागणी केली. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनसेने हत्तीण आणि कबुतरखाना प्रकरणात यू टर्न घेतला आहे. चार दिवसांपूर्वी न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत करणाऱ्या मनसेने हत्तीण आणि कबुतरखाना प्रकरणात महाराष्ट्र शासनाने थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी, अशी मागणी केली आहे.

कबुतरखाने मानवी वस्तीपासून दूर असावेत अशी मनसेची आधीची अधिकृत भूमिका होती. पण मुंबईतले जैन समाजाचे आंदोलन बघून मनसेने यू टर्न घेतला आहे. मनसेने हत्तीण आणि कबुतरखाना प्रकरणात महाराष्ट्र शासनाने थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी, अशी मागणी करायला सुरुवात केली आहे.

Comments
Add Comment

धक्कादायक! मुलुंडमध्ये १६ वर्षीय मुलीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; आरोपी अटकेत

मुंबई : मुलुंड परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने मुंबईत खळबळ उडाली आहे. केवळ बोलणं बंद केल्याच्या रागातून एका

खरातला दिली गेलेली पाण्याची जोडणी मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर, शीतल म्हात्रेंचा गंभीर आरोप

मुंबई: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण सध्या राज्यभरत चांगलचं गाजत आहे. नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक

किनारी रस्ता प्रकल्पात पादचारी भुयारी मार्गात छत उभारण्याचा प्रस्ताव फेटाळला

मुंबई: महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील भाग–२ मधील पादचारी भुयारी

नवी मुंबईचा प्रवास वेगवान होणार, ठाणे-बेलापूर मार्गावरील प्रवास आता सिग्नलमुक्त

नवी मुंबई: नवी मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिकेने एका महत्त्वाच्या प्रकल्पाला मंजुरी

महापालिकेच्या टाऊनहॉल जिमखान्याचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळला

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने महापालिका मुख्यालयासमोरील आझाद मैदान येथील जुन्या क्रिडा भवनाच्या जागेवर

कुलाबा सांडपाणी प्रकल्पातील प्रक्रिया ३ दशलक्ष लिटर पाण्याची होणार विक्री

मुंबई: कुलाबा मल जल प्रक्रिया केंद्रात प्रकल्पातून पिण्याव्यतिरिक्त अन्य कामांसाठी प्राप्त होणाऱ्या १० दशलक्ष