हत्तीण आणि कबुतरखाना प्रकरणात मनसेचा यू टर्न

मुंबई : न्यायालयाच्या आदेशामुळे मुंबईतले कबुतरखाने बंद करण्याची कारवाई महापालिकेने सुरू केली आहे. तसेच न्यायालयीन आदेशानुसार महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीची रवानगी 'वनतारा'मध्ये करण्यात आली आहे. पण या दोन्ही नागरिकांची आंदोलनं सुरू आहेत. महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला 'वनतारा'मधून परत आणावे अशी नांदिणी गावातील ग्रामस्थांची मागणी आहे. तर कबुतरखाने सुरू ठेवावे अशी मागणी करत मुंबईत जैन समुदाय आंदोलन करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांशी चर्चा केली आणि न्यायालयात दाद मागणे हाच पर्याय असल्याचे त्यांना सांगितले. या पार्श्वभूमीवर मनसेच्या नेत्यांची प्रतिक्रिया आली आहे. मनसेने हत्तीण आणि कबुतरखाना प्रकरणात यू टर्न घेतला आहे.



याआधी दादरच्या कबुतरखाना परिसरात बुधवारी ६ ऑगस्ट रोजी जैन समाजाने आक्रमक आंदोलन केले. मुंबई महापालिकेने दादरच्या कबुतरखान्यावर ताडपत्री टाकून तो बंद केला होता. आंदोलकांनी ताडपत्री हटवून कबुतखान्यात धान्य टाकले आणि घोषणाबाजी केली. कबुतरखाना सुरू ठेवण्याची मागणी केली. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनसेने हत्तीण आणि कबुतरखाना प्रकरणात यू टर्न घेतला आहे. चार दिवसांपूर्वी न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत करणाऱ्या मनसेने हत्तीण आणि कबुतरखाना प्रकरणात महाराष्ट्र शासनाने थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी, अशी मागणी केली आहे.

कबुतरखाने मानवी वस्तीपासून दूर असावेत अशी मनसेची आधीची अधिकृत भूमिका होती. पण मुंबईतले जैन समाजाचे आंदोलन बघून मनसेने यू टर्न घेतला आहे. मनसेने हत्तीण आणि कबुतरखाना प्रकरणात महाराष्ट्र शासनाने थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी, अशी मागणी करायला सुरुवात केली आहे.

Comments
Add Comment

पुढील तीन ते चार दिवसांत नुकसानग्रस्तांच्या खात्यावर भरपाई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात ६० लाख हेक्टरचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ऑगस्टपर्यंत ने

महापालिका आरोग्य विभागाला माणसांपेक्षा श्वानांची चिंता!

रेबीज नियंत्रणासाठी श्वानांचे लसीकरण, पण चावा घेतलेल्यांना मिळत नाही लस मुंबई ( खास प्रतिनिधी) : मुंबईला सन वर्ष

जय शहांचे नाव घेत शिंदे सेनेवर टीका करणा-या ठाकरेंच्या नेत्याला भाजपने सोलून काढले

मुंबई: दसरा (विजयादशमी) मेळाव्याच्या आयोजनावरुन उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका करताना जय शहा

उद्धव गटाने दसरा मेळावा सोनिया गांधींच्या अंगणात घ्यावा

मुंबई: त्यांचे हाय कमांड दिल्लीत बसतात आणि त्यांच्याकडे विमान भरण्याइतकेही समर्थक नाहीत. त्यामुळे त्यांनी आपला

दसऱ्याच्या मुहूर्तावर झेंडूची फुले महागली

परतीच्या पावसामुळे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान नवी मुंबई : दसरा सणासाठी झेंडू, आंब्याच्या डहाळ्या,

शेतकरी खचून गेलेत, पण सरकार त्यांच्या पाठीशी; शिवसेनेचा दसरा मेळावा नेस्को सेंटरमध्ये होणार

पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यानंतर एकनाथ शिंदेंचे आश्वासन मुंबई: मराठवाडा विभागातील आठ जिल्ह्यांसह सोलापूरमध्ये