हत्तीण आणि कबुतरखाना प्रकरणात मनसेचा यू टर्न

मुंबई : न्यायालयाच्या आदेशामुळे मुंबईतले कबुतरखाने बंद करण्याची कारवाई महापालिकेने सुरू केली आहे. तसेच न्यायालयीन आदेशानुसार महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीची रवानगी 'वनतारा'मध्ये करण्यात आली आहे. पण या दोन्ही नागरिकांची आंदोलनं सुरू आहेत. महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला 'वनतारा'मधून परत आणावे अशी नांदिणी गावातील ग्रामस्थांची मागणी आहे. तर कबुतरखाने सुरू ठेवावे अशी मागणी करत मुंबईत जैन समुदाय आंदोलन करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांशी चर्चा केली आणि न्यायालयात दाद मागणे हाच पर्याय असल्याचे त्यांना सांगितले. या पार्श्वभूमीवर मनसेच्या नेत्यांची प्रतिक्रिया आली आहे. मनसेने हत्तीण आणि कबुतरखाना प्रकरणात यू टर्न घेतला आहे.



याआधी दादरच्या कबुतरखाना परिसरात बुधवारी ६ ऑगस्ट रोजी जैन समाजाने आक्रमक आंदोलन केले. मुंबई महापालिकेने दादरच्या कबुतरखान्यावर ताडपत्री टाकून तो बंद केला होता. आंदोलकांनी ताडपत्री हटवून कबुतखान्यात धान्य टाकले आणि घोषणाबाजी केली. कबुतरखाना सुरू ठेवण्याची मागणी केली. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनसेने हत्तीण आणि कबुतरखाना प्रकरणात यू टर्न घेतला आहे. चार दिवसांपूर्वी न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत करणाऱ्या मनसेने हत्तीण आणि कबुतरखाना प्रकरणात महाराष्ट्र शासनाने थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी, अशी मागणी केली आहे.

कबुतरखाने मानवी वस्तीपासून दूर असावेत अशी मनसेची आधीची अधिकृत भूमिका होती. पण मुंबईतले जैन समाजाचे आंदोलन बघून मनसेने यू टर्न घेतला आहे. मनसेने हत्तीण आणि कबुतरखाना प्रकरणात महाराष्ट्र शासनाने थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी, अशी मागणी करायला सुरुवात केली आहे.

Comments
Add Comment

मुंबई–पुण्यात बॉम्बस्फोटाच्या धमक्या; पासपोर्ट कार्यालय व दहिसरमधील शाळा अलर्टवर

मुंबई : राज्यातील दोन महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीचे ई-मेल प्राप्त मिळाल्याने सुरक्षा

शरद पवारांसाठी राज्यसभा सोडण्यास उबाठा गटाचा नकार

मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासाठी राज्यसभा सोडण्यास उबाठा गटाने नकार दिल्यामुळे महाविकास आघाडीत संघर्ष

कृषी योजनांसाठी ८ महिन्यांत ३५ टक्के निधी खर्च; विधान परिषदेत दत्ता भरणे यांची माहिती

मुंबई : राज्यातील कृषी विभागाच्या राज्य पुरस्कृत योजनांसाठी गेल्या आठ महिन्यांत एकूण ८०९८.४१ कोटी रुपयांची

बदलापूर प्रकरणाची विधान परिषदेत दखल; स्कूल बस नियमावलीच्या कडक अंमलबजावणीचे आदेश

मुंबई : बदलापूर येथील एका शाळेत घडलेल्या विनयभंग प्रकरणाचे विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले असून, राज्य सरकारने

शेतकरी आणि मजुरांना बिबट्यांपासून मिळणार सुरक्षा; विधान परिषदेत सरकारचा मास्टर प्लॅन

मुंबई : राज्यात वाढलेला बिबट्यांचा वावर आणि त्यामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी राज्य सरकारने अत्याधुनिक

एआय तंत्रज्ञानाने रोखणार वाघ-बिबट्यांचे हल्ले; प्रवीण दरेकरांच्या सूचनेवर सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्रप्रकल्पात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (AI) सहाय्याने राबवण्यात आलेला