माधुरी लवकरच कोल्हापूरला परतणार!

कोल्हापूरकरांच्या लढ्याला यश; माधुरीला परत पाठवण्याबाबत वनताराकडून आश्वासन


कोल्हापूर: कोल्हापूरकरांच्या आंदोलनासमोर अखेर 'वनतारा' झुकले आहे. नांदणी मठातील माधुरी हत्तीणीला लवकरच कोल्हापुरात परत आणण्यासाठी मदत करणार असल्याचे आश्वासन 'वनतारा'च्या अधिकाऱ्यांनी दिले आहे. यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यापासून ते नांदणी मठात पुनर्वसन केंद्र उभारण्यापर्यंत सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे.



माधुरीला परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न


नांदणी मठाचे मठाधिपती आणि 'वनतारा'चे सीईओ विहान करनी यांच्यात एक महत्त्वाची बैठक पार पडली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत विहान करनी यांनी सांगितले की, "सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार माधुरीला 'वनतारा'मध्ये नेण्यात आले होते, पण कोल्हापूरकरांच्या भावनांचा आम्ही आदर करतो. कोल्हापूरकरांच्या भावना दुखावण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता."


करनी पुढे म्हणाले की, "यामध्ये कोणाचाही विजय किंवा पराजय नाही, हा माधुरी हत्तीणीचा विजय आहे. 'वनतारा'मध्ये तिला चांगल्या सुविधा मिळत आहेत आणि आता नांदणी मठातही तिला उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करू."



पुनर्वसन केंद्र उभारण्यास मदत


'वनतारा'च्या वतीने माधुरीसाठी नांदणी मठात एक पुनर्वसन केंद्र उभारण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, माधुरीला परत आणण्यासाठी 'वनतारा', राज्य सरकार आणि नांदणी मठ यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल. आवश्यक तो सर्व पत्रव्यवहार आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.



काय आहे प्रकरण?


गेल्या ३० वर्षांपासून नांदणी मठात असलेली माधुरी हत्तीण तिच्या हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करत 'पेटा' (PETA) या संस्थेने न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर २८ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने माधुरीला गुजरातमधील अनंत अंबानी यांच्या 'वनतारा'मध्ये पाठवण्याचा आदेश दिला. या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्ह्यात मोठा रोष निर्माण झाला. 'जिओ' सिमकार्डवर बहिष्कार घालण्यापासून ते भव्य पदयात्रा काढण्यापर्यंत अनेक आंदोलने झाली. राज्य सरकारनेही यात हस्तक्षेप करत माधुरीला परत आणण्यासाठी पावले उचलली. कोल्हापूरकरांच्या याच एकजुटीमुळे 'वनतारा'ने आता माघार घेतल्याचे दिसत आहे. लवकरच माधुरी तिच्या मूळ ठिकाणी परत येईल, अशी आशा आहे.

Comments
Add Comment

रोहित आर्याने विनापरवानगी शाळांकडून पैसे गोळा केले!

नागपूर : पवई येथे १७ मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याच्या एन्काऊंटर प्रकरणाची चर्चा मंगळवारी विधानसभेत झाली.

'तुकडेबंदी' शिथिल करणारे विधेयक विधानसभेत मंजूर

सातबारावर आता स्वतंत्र नाव लागणार नागपूर : राज्यातील नागरी वस्त्यांमध्ये गुंठेवारी किंवा लहान भूखंडांवर

शरद पवारांच्या पक्षातील सूर्यकांत मोरे विरोधात हक्कभंग

जामखेड : जामखेड नगरपालिका निवडणूक प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सूर्यकांत मोरे

मंत्री नितेश राणे यांचे विधानपरिषदेत आश्वासन; महिलांच्या सुरक्षेसाठी विदेशातून 'हँड ग्लोज' मागवणार

नागपूर: नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मच्छीमार व्यवसायातील महिलांना कोळंबी सोलत असताना होणाऱ्या शारीरिक

गुटखा विक्रेत्यांना 'मकोका' लावणार!- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; गुटखा बंदीसाठी कायद्यात बदल करणार

नागपूर : "गुटखा विक्री करणाऱ्यांवर मकोका लागू करण्याचा प्रस्ताव विधी आणि न्याय विभागाकडे पाठवण्यात आला होता.

विधानपरिषद सभापती-सदस्यांचा अपमान केल्याप्रकरणी सूर्यकांत मोरे हक्कभंगाच्या कचाट्यात

नागपूर: नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या एका पदाधिकाऱ्याने केलेल्या