खारेपाट भागाला आजही गढूळ पाणीपुरवठा

साथीचे आजार पसरण्याची भीती


पेण : पेण तालुक्याच्या खारेपाटातील अनेक गावांना, वाड्यांना नेहमीच पाणीटंचाईचा व गढूळ पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. येथील पाणीप्रश्न सुटण्यासाठी विविध प्रकारची स्थानिकांनी आंदोलने केली. तरीही खासदारांसह स्थानिक आमदारांना पाझर फुटला नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे स्थानिक ग्रामस्थ संताप व्यक्त करीत असून, पाणीप्रश्न कधी सुटून स्वच्छ आणि नियमीत पिण्याचे पाणी मिळणार या प्रतीक्षेत ग्रामस्थ आहेत.


शहापाडा धरणाची साठवण क्षमता ८३५ दश लक्ष मीटर असून, ४० उंच, ७२० फूट लांबीचे हे शहापाडा धरण आहे, तर ३६० फुटाचा सांडवा या आराखड्यात धरणाची साठवण क्षमता ८३५ दशलक्ष मीटर एवढी आहे.


मात्र गेली कित्येक वर्षांपासून धरणातील साचलेला गाळ न उपसल्याने धरण संपूर्ण गाळाने भरलेले आहे. पाण्याची साठवण क्षमता गाळामुळे कमी झालेली असल्याने लवकरच हे धरण पाण्याने भरले जाते, तसेच शहापाडा धरणावर असलेले फिल्टरेशन प्लांट फक्त नावाला आहे. हा प्लांट कित्येक वर्षे बंद अवस्थेत आहे. त्यामुळे या धरणातून स्थानिकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होऊ शकत नाही.


परिणामी स्थानिकांना गढूळ व अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून येथील पाणीप्रश्न सुटू न शकल्याने राजकीय दृष्टीकोनातून या प्रश्नावर श्रेयाच्या लढाईत स्थानिक नागरिक व खारेपाट नागरिक पिण्याच्या पाण्याची वाट पाहात आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून वाशी विभागातील ग्रामस्थांना सध्या लालसर व दुर्गंधीयुक्त दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे वाशी विभागातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.


जोपर्यंत सदर जलवाहिनीचे लिकेज सापडून त्याचे काम होत नाही, तोवर ग्रामस्थांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची व्यवस्था करावी, अन्यथा या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी सांडपाणी मिश्रीत पाणी संबंधीत जिपच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना सदर पाणी पिण्यासाठी भेट देण्याचे लक्षवेधी आंदोलन खारेपाट विकास संकल्प संघटनेच्या माध्यमातून केले जाईल असा इशारा स्थानिकांनी
दिला आहे.

Comments
Add Comment

Murud-Janjira Fort : मुरुड-जंजिरा किल्ल्यावर आता 'हायटेक' जेट्टी

मुरुड-जंजिरा : जागतिक पर्यटनाच्या नकाशावर असलेल्या ऐतिहासिक जंजिरा जलदुर्ग किल्ल्याच्या दर्शनासाठी येणाऱ्या

Raigad : भरडखोल बंदर प्रकल्पामुळे मच्छीमारांना मिळणार अत्याधुनिक सुविधा

श्रीवर्धन : महाराष्ट्रातील मच्छीमारांच्या सोयीसुविधांमध्ये वाढ करण्यासाठी आणि मत्स्यव्यवसायाला चालना

Raigad : रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील : पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबई: रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या पर्यटनांच्या कामांना गती

Tourists on Raigad's Beaches : रायगडच्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची विक्रमी गर्दी; समुद्रकिनारे पर्यटकांनी बहरले

रायगड : महाराष्ट्र दिनाची सुट्टी, त्याला जोडून आलेला शनिवार-रविवार आणि शाळांच्या परीक्षा संपल्यानंतर लागलेल्या

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भीषण अपघात, २५ वर्षीय चालकाचा चिरडून मृत्यू

श्रीवर्धन – श्रीवर्धन येथे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे. म्हसळा

रायगड जिल्ह्यातील अंबा व कुंभे उदंचन जलविद्युत प्रकल्प क्षमतावाढीसाठी CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'एनटीपीसी'शी सुधारित सामंजस्य करार

मुंबई : एनटीपीसी लिमिटेडच्या रायगड जिल्ह्यातील कुंभे व अंबा उदंचन जलविद्युत प्रकल्पांच्या स्थापित