खारेपाट भागाला आजही गढूळ पाणीपुरवठा

साथीचे आजार पसरण्याची भीती


पेण : पेण तालुक्याच्या खारेपाटातील अनेक गावांना, वाड्यांना नेहमीच पाणीटंचाईचा व गढूळ पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. येथील पाणीप्रश्न सुटण्यासाठी विविध प्रकारची स्थानिकांनी आंदोलने केली. तरीही खासदारांसह स्थानिक आमदारांना पाझर फुटला नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे स्थानिक ग्रामस्थ संताप व्यक्त करीत असून, पाणीप्रश्न कधी सुटून स्वच्छ आणि नियमीत पिण्याचे पाणी मिळणार या प्रतीक्षेत ग्रामस्थ आहेत.


शहापाडा धरणाची साठवण क्षमता ८३५ दश लक्ष मीटर असून, ४० उंच, ७२० फूट लांबीचे हे शहापाडा धरण आहे, तर ३६० फुटाचा सांडवा या आराखड्यात धरणाची साठवण क्षमता ८३५ दशलक्ष मीटर एवढी आहे.


मात्र गेली कित्येक वर्षांपासून धरणातील साचलेला गाळ न उपसल्याने धरण संपूर्ण गाळाने भरलेले आहे. पाण्याची साठवण क्षमता गाळामुळे कमी झालेली असल्याने लवकरच हे धरण पाण्याने भरले जाते, तसेच शहापाडा धरणावर असलेले फिल्टरेशन प्लांट फक्त नावाला आहे. हा प्लांट कित्येक वर्षे बंद अवस्थेत आहे. त्यामुळे या धरणातून स्थानिकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होऊ शकत नाही.


परिणामी स्थानिकांना गढूळ व अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून येथील पाणीप्रश्न सुटू न शकल्याने राजकीय दृष्टीकोनातून या प्रश्नावर श्रेयाच्या लढाईत स्थानिक नागरिक व खारेपाट नागरिक पिण्याच्या पाण्याची वाट पाहात आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून वाशी विभागातील ग्रामस्थांना सध्या लालसर व दुर्गंधीयुक्त दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे वाशी विभागातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.


जोपर्यंत सदर जलवाहिनीचे लिकेज सापडून त्याचे काम होत नाही, तोवर ग्रामस्थांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची व्यवस्था करावी, अन्यथा या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी सांडपाणी मिश्रीत पाणी संबंधीत जिपच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना सदर पाणी पिण्यासाठी भेट देण्याचे लक्षवेधी आंदोलन खारेपाट विकास संकल्प संघटनेच्या माध्यमातून केले जाईल असा इशारा स्थानिकांनी
दिला आहे.

Comments
Add Comment

Ashok Kharat Case : भोंदू खरातचा उरणमध्ये जमीन खरेदी विक्रीत कोट्यवधींचा झोलझाल

रायगड : अशोक खरात केसमध्ये हे प्रकरण किती खोल आहे याचा अंदाज महाराष्ट्राला येत जात आहे, अशोक खरातचे काळे धंदे करत

Eknath Shinde : 'पात्र लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार नाहीत'

रायगड : बोरीचा माळ सारख्या छोट्या गावात लक्ष्मी नारायणाचे मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे आता तुम्हाला रोज

GI Tag White Onion Production : जीआय टॅग मिळूनही अडचण; पांढऱ्या कांद्याच्या उत्पादनात मोठी घट

रायगड : बदलत्या हवामानाचा मोठा फटका यंदा अलिबाग तालुक्यातील पांढरा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. यावर्षी

Mumbai Goa Expressway : कोकणात विकेंड रश; मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

माणगाव : उन्हाळी सुट्ट्यांची सुरुवात आणि सलग तीन दिवसांचा विकेंड यामुळे कोकणाच्या दिशेने पर्यटकांचा ओघ प्रचंड

मुंबई-गोवा महामार्गावर बस उलटून भीषण अपघात; ३८ प्रवासी जखमी दोघांचा मृत्यू

नागोठणे : शुक्रवारी ( ३ एप्रिल ) मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका खासगी बसचा मुंबई गोवा महामार्गावर अपघात झाला.

कोकणातील दुर्गम भागात ऊर्जेचे नवे पर्व

लघु जलविद्युत विकास योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी अलिबाग : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या