खारेपाट भागाला आजही गढूळ पाणीपुरवठा

साथीचे आजार पसरण्याची भीती


पेण : पेण तालुक्याच्या खारेपाटातील अनेक गावांना, वाड्यांना नेहमीच पाणीटंचाईचा व गढूळ पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. येथील पाणीप्रश्न सुटण्यासाठी विविध प्रकारची स्थानिकांनी आंदोलने केली. तरीही खासदारांसह स्थानिक आमदारांना पाझर फुटला नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे स्थानिक ग्रामस्थ संताप व्यक्त करीत असून, पाणीप्रश्न कधी सुटून स्वच्छ आणि नियमीत पिण्याचे पाणी मिळणार या प्रतीक्षेत ग्रामस्थ आहेत.


शहापाडा धरणाची साठवण क्षमता ८३५ दश लक्ष मीटर असून, ४० उंच, ७२० फूट लांबीचे हे शहापाडा धरण आहे, तर ३६० फुटाचा सांडवा या आराखड्यात धरणाची साठवण क्षमता ८३५ दशलक्ष मीटर एवढी आहे.


मात्र गेली कित्येक वर्षांपासून धरणातील साचलेला गाळ न उपसल्याने धरण संपूर्ण गाळाने भरलेले आहे. पाण्याची साठवण क्षमता गाळामुळे कमी झालेली असल्याने लवकरच हे धरण पाण्याने भरले जाते, तसेच शहापाडा धरणावर असलेले फिल्टरेशन प्लांट फक्त नावाला आहे. हा प्लांट कित्येक वर्षे बंद अवस्थेत आहे. त्यामुळे या धरणातून स्थानिकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होऊ शकत नाही.


परिणामी स्थानिकांना गढूळ व अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून येथील पाणीप्रश्न सुटू न शकल्याने राजकीय दृष्टीकोनातून या प्रश्नावर श्रेयाच्या लढाईत स्थानिक नागरिक व खारेपाट नागरिक पिण्याच्या पाण्याची वाट पाहात आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून वाशी विभागातील ग्रामस्थांना सध्या लालसर व दुर्गंधीयुक्त दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे वाशी विभागातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.


जोपर्यंत सदर जलवाहिनीचे लिकेज सापडून त्याचे काम होत नाही, तोवर ग्रामस्थांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची व्यवस्था करावी, अन्यथा या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी सांडपाणी मिश्रीत पाणी संबंधीत जिपच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना सदर पाणी पिण्यासाठी भेट देण्याचे लक्षवेधी आंदोलन खारेपाट विकास संकल्प संघटनेच्या माध्यमातून केले जाईल असा इशारा स्थानिकांनी
दिला आहे.

Comments
Add Comment

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत विमानतळाचे होणार उद्घाटन; नवी मुंबईत वाहतुकीत बदल

रायगड : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नवी मुंबई

ठाणे, नवी मुंबई, रायगडमधील कोळी बांधवांचे आर्थिक गणित कोलमडले

ठाणे (प्रतिनिधी) : यंदा पावसाळी मासेमारीबंदी संपुष्टात आल्यानंतर १ ऑगस्टपासून सुरू झालेल्या मासेमारीच्या नव्या

पन्हळघर झोरेवाडीत ढगफुटी सदृश्य पाऊस; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

माणगाव : रायगड जिल्ह्याला 'शक्ती' वादळाचा इशारा देण्यात आलेला असतानाही संपूर्ण जिल्ह्यात दिवसभर कडक ऊन जाणवत

रायगड जिल्हा परिषदेत २ हजार ६०९ पदे रिक्त

अलिबाग (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील विकासाला गती देण्याचे काम रायगड जिल्हा परिषदेचे असले, तरी जिल्हा परिषदेत

पनवेल महापालिकेचा ९ वा वर्धापन दिन उत्साहात

पनवेल : पनवेल महापालिकेने ९ वर्षामध्ये देशपातळीवरती विविध सन्मान प्राप्त केले. महापालिकेची वास्तू जशी आयकॉनीक

मुंबई-काशिद रो-रो सेवा रखडली

वादळ, वारे, उसळणाऱ्या लाटांमुळे कामात अडथळा नांदगाव मुरुड : मुंबई-काशिद रो-रो सेवेचे गेल्या पाच वर्षांपासून संथ