खारेपाट भागाला आजही गढूळ पाणीपुरवठा

साथीचे आजार पसरण्याची भीती


पेण : पेण तालुक्याच्या खारेपाटातील अनेक गावांना, वाड्यांना नेहमीच पाणीटंचाईचा व गढूळ पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. येथील पाणीप्रश्न सुटण्यासाठी विविध प्रकारची स्थानिकांनी आंदोलने केली. तरीही खासदारांसह स्थानिक आमदारांना पाझर फुटला नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे स्थानिक ग्रामस्थ संताप व्यक्त करीत असून, पाणीप्रश्न कधी सुटून स्वच्छ आणि नियमीत पिण्याचे पाणी मिळणार या प्रतीक्षेत ग्रामस्थ आहेत.


शहापाडा धरणाची साठवण क्षमता ८३५ दश लक्ष मीटर असून, ४० उंच, ७२० फूट लांबीचे हे शहापाडा धरण आहे, तर ३६० फुटाचा सांडवा या आराखड्यात धरणाची साठवण क्षमता ८३५ दशलक्ष मीटर एवढी आहे.


मात्र गेली कित्येक वर्षांपासून धरणातील साचलेला गाळ न उपसल्याने धरण संपूर्ण गाळाने भरलेले आहे. पाण्याची साठवण क्षमता गाळामुळे कमी झालेली असल्याने लवकरच हे धरण पाण्याने भरले जाते, तसेच शहापाडा धरणावर असलेले फिल्टरेशन प्लांट फक्त नावाला आहे. हा प्लांट कित्येक वर्षे बंद अवस्थेत आहे. त्यामुळे या धरणातून स्थानिकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होऊ शकत नाही.


परिणामी स्थानिकांना गढूळ व अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून येथील पाणीप्रश्न सुटू न शकल्याने राजकीय दृष्टीकोनातून या प्रश्नावर श्रेयाच्या लढाईत स्थानिक नागरिक व खारेपाट नागरिक पिण्याच्या पाण्याची वाट पाहात आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून वाशी विभागातील ग्रामस्थांना सध्या लालसर व दुर्गंधीयुक्त दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे वाशी विभागातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.


जोपर्यंत सदर जलवाहिनीचे लिकेज सापडून त्याचे काम होत नाही, तोवर ग्रामस्थांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची व्यवस्था करावी, अन्यथा या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी सांडपाणी मिश्रीत पाणी संबंधीत जिपच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना सदर पाणी पिण्यासाठी भेट देण्याचे लक्षवेधी आंदोलन खारेपाट विकास संकल्प संघटनेच्या माध्यमातून केले जाईल असा इशारा स्थानिकांनी
दिला आहे.

Comments
Add Comment

रायगड जिल्ह्यात १५ दिवस ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत सूट

जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे आदेश, शांतता क्षेत्रात सूट लागू नाही रायगड: केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या

पनवेलमध्ये स्कूल बसला अपघात, विद्यार्थी जखमी

पनवेल : भरधाव टेम्पोने समोरुन स्कूल बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन शालेय विद्यार्थी जखमी झाल्याची घटना

मतदानकरून परत येताना महाडमध्ये दरीत कोसळली कार; चौघेजण....

महाड : नुकताच जिल्हा परिषदेची निवडणूकमही पार पडली आहे. आणि आजच त्याचे निकालही लागले आहेत. त्यामुळे मतदानासाठी

अर्थसंकल्पातून कोकणच्या आर्थिक विकासाला नवी दिशा

काजू, नारळ, मत्स्योद्योगाला भरीव निधी सुभाष म्हात्रे अलिबाग : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी

विकास गोगावले पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात

रायगड : राज्यातील राजकारणात लक्षवेधी ठरणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत महाड तालुक्यातील नाडगावतर्फे बिरवाडी

रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत नव्या चेहऱ्यांची कसोटी

१४ माजी सदस्य रिंगणात; ५९ जागांसाठी रंगतदार लढाई अलिबाग : उमेदवारी अर्ज माघारीनंतर रायगड जिल्हा परिषदेच्या