आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा लवकरच, गिल, जायसवाल आणि सुदर्शनला संधी मिळण्याची शक्यता

मुंबई : बीसीसीआय ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात आशिया कप २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा करण्याची शक्यता आहे. यशस्वी जायसवाल, शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांना संघात स्थान मिळणार असल्याची चर्चा आहे. जायसवाल आणि गिल व्यस्त वेळापत्रकामुळे गेल्या काही टी-२० सामन्यांमध्ये खेळले नव्हते. पण आता इंग्लंडमधील ५ कसोटी सामन्यांनंतर त्यांच्याकडे १ महिन्याचा कालावधी आहे. साई सुदर्शनने आयपीएलमध्ये आपल्या कामगिरीने साऱ्यांचेच लक्ष वेधले होते.त्यामुळे त्याच्या नावाचा विचारही केला जाऊ शकतो.


भारतीय क्रिकेट संघाचा आशिया कपच्या ‘अ’ गटामध्ये समावेश आहे. या गटात पाकिस्तान, ओमान आणि यूएई हे संघ आहेत. भारताचा पहिला सामना १० सप्टेंबर रोजी यूएई बरोबर असेल. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना १४ सप्टेंबर रोजी दुबई येथे खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते.


यशस्वी जायसवाल, शुभमन गिल आणि साई सुदर्शन हे आशिया चषक स्पर्धेतील आघाडीच्या फळीतील महत्त्वाचे क्रिकेटपटू ठरू शकतात. पण जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांची उपलब्धता हा एक मोठा मुद्दा आहे. संघ निवडीपूर्वी या दोघांनाही फिटनेस सिद्ध करावा लागणार आहे. तर साई सुदर्शनने आयपीएल २०२५ चा हंगामात चांगली कामगिरी केली होती. त्याने १५ सामन्यांमध्ये १५६.१७ च्या स्ट्राईक रेटने ७५९ धावा केल्या होत्या. यामध्ये एक शतक आणि ६ अर्धशतकांचा समावेश आहे. त्यामुळे त्याचा विचार निवड समिती करण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

CSK New Jersey : चेन्नई सुपर किंग्जच्या नव्या जर्सीचे अनावरण

पाच वेळा विजेत्या चेन्नई सुपर किंग्जने म्हणजेच सीएसकेने आयपीएल २०२६ च्या आधी त्यांची नवीन जर्सीचे अनावरण केले

T20 World Cup 2026 Ind vs WI : वेस्ट इंडिज विरुद्धच्या विजयी खेळीनंतर संजू सॅमसन भावुक

टी-२० विश्वचषकामध्ये सुपर ८ च्या एका महत्त्वाच्या सामन्यात वेस्ट इंडिजला पाच विकेट्सनी पराभूत करत भारताने

IND vs WI: एका ओव्हरमध्येच सगळंच बदललं; भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात सर्वात मोठा टर्निंग पॉईंट कधी झाला?

मुंबई : भारताने दक्षिण आफ्रिका संघाचा पाच विकेटने पराभव करत सेमी फायनलमध्ये आपली जागा निश्चित केली आहे.

संजूची बॅट तळपली, टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहोचली

कोलकाता : ईडन गार्डनवर झालेल्या सुपर आठ फेरीतल्या वेस्ट इंडिज विरूद्धच्या सामन्यात भारत पाच विकेट राखून जिंकला.

बुमराहसमोर वेस्ट इंडिजचा हेटमायर हतबल

कोलकाता : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये सुपर एट फेरीत आज भारत विरुद्ध वेस्ट इंडिज हा निर्णायक सामना

द. आफ्रिकेचा झिम्बाब्वेवर ५ गडी राखून विजय

नवी दिल्ली : टी-२० विश्वचषकातील सुपर आठ फेरीत दक्षिण आफ्रिकेने झिम्बाब्वेचा ५ गडी राखून पराभव केला. झिम्बाब्वेचा