आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा लवकरच, गिल, जायसवाल आणि सुदर्शनला संधी मिळण्याची शक्यता

मुंबई : बीसीसीआय ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात आशिया कप २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा करण्याची शक्यता आहे. यशस्वी जायसवाल, शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांना संघात स्थान मिळणार असल्याची चर्चा आहे. जायसवाल आणि गिल व्यस्त वेळापत्रकामुळे गेल्या काही टी-२० सामन्यांमध्ये खेळले नव्हते. पण आता इंग्लंडमधील ५ कसोटी सामन्यांनंतर त्यांच्याकडे १ महिन्याचा कालावधी आहे. साई सुदर्शनने आयपीएलमध्ये आपल्या कामगिरीने साऱ्यांचेच लक्ष वेधले होते.त्यामुळे त्याच्या नावाचा विचारही केला जाऊ शकतो.


भारतीय क्रिकेट संघाचा आशिया कपच्या ‘अ’ गटामध्ये समावेश आहे. या गटात पाकिस्तान, ओमान आणि यूएई हे संघ आहेत. भारताचा पहिला सामना १० सप्टेंबर रोजी यूएई बरोबर असेल. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना १४ सप्टेंबर रोजी दुबई येथे खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते.


यशस्वी जायसवाल, शुभमन गिल आणि साई सुदर्शन हे आशिया चषक स्पर्धेतील आघाडीच्या फळीतील महत्त्वाचे क्रिकेटपटू ठरू शकतात. पण जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांची उपलब्धता हा एक मोठा मुद्दा आहे. संघ निवडीपूर्वी या दोघांनाही फिटनेस सिद्ध करावा लागणार आहे. तर साई सुदर्शनने आयपीएल २०२५ चा हंगामात चांगली कामगिरी केली होती. त्याने १५ सामन्यांमध्ये १५६.१७ च्या स्ट्राईक रेटने ७५९ धावा केल्या होत्या. यामध्ये एक शतक आणि ६ अर्धशतकांचा समावेश आहे. त्यामुळे त्याचा विचार निवड समिती करण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

IPL 2026: लखनौचा कमबॅक, KKR अजूनही पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत

मुंबई : आयपीएल २०२६ मधील रंगतदार सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सवर 3 विकेटने या सामन्याला रंग

IPL 2026 : सामना न खेळणाऱ्या खेळाडूंसाठी बीसीसीआयने जाहीर केली नवीन नियमावली; नियमांचे पालन न केल्यास होणार कारवाई

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने आयपीएलसाठी अनेक कठोर नियम लागू केले आहेत. या नवीन

Bangladesh Cricket Board : अखेर बांगलादेश नरमला; बांग्लादेश क्रिकेट बोर्डाकडून भारताला आमंत्रण

बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) (Bangladesh Cricket Board) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसी) पत्र लिहून कळवले आहे की,

IPL 2026 Sunil Gavaskar : सुनील गावस्करांची अनफिट क्रिकेटपटूंवर टीका

मुंबई : भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी पुन्

IPL 2026 : गुवाहाटीवर पावसाचे सावट! MI vs RR थरार रंगणार की सामना होणार रद्द?

IPL 2026: मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने; विजयासाठी दोन्ही संघ सज्ज

मुंबई : आयपीएल 2026 मधील आजचा सामना क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स