आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा लवकरच, गिल, जायसवाल आणि सुदर्शनला संधी मिळण्याची शक्यता

मुंबई : बीसीसीआय ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात आशिया कप २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा करण्याची शक्यता आहे. यशस्वी जायसवाल, शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांना संघात स्थान मिळणार असल्याची चर्चा आहे. जायसवाल आणि गिल व्यस्त वेळापत्रकामुळे गेल्या काही टी-२० सामन्यांमध्ये खेळले नव्हते. पण आता इंग्लंडमधील ५ कसोटी सामन्यांनंतर त्यांच्याकडे १ महिन्याचा कालावधी आहे. साई सुदर्शनने आयपीएलमध्ये आपल्या कामगिरीने साऱ्यांचेच लक्ष वेधले होते.त्यामुळे त्याच्या नावाचा विचारही केला जाऊ शकतो.


भारतीय क्रिकेट संघाचा आशिया कपच्या ‘अ’ गटामध्ये समावेश आहे. या गटात पाकिस्तान, ओमान आणि यूएई हे संघ आहेत. भारताचा पहिला सामना १० सप्टेंबर रोजी यूएई बरोबर असेल. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना १४ सप्टेंबर रोजी दुबई येथे खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते.


यशस्वी जायसवाल, शुभमन गिल आणि साई सुदर्शन हे आशिया चषक स्पर्धेतील आघाडीच्या फळीतील महत्त्वाचे क्रिकेटपटू ठरू शकतात. पण जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांची उपलब्धता हा एक मोठा मुद्दा आहे. संघ निवडीपूर्वी या दोघांनाही फिटनेस सिद्ध करावा लागणार आहे. तर साई सुदर्शनने आयपीएल २०२५ चा हंगामात चांगली कामगिरी केली होती. त्याने १५ सामन्यांमध्ये १५६.१७ च्या स्ट्राईक रेटने ७५९ धावा केल्या होत्या. यामध्ये एक शतक आणि ६ अर्धशतकांचा समावेश आहे. त्यामुळे त्याचा विचार निवड समिती करण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

श्रीलंकेच्या फिरकीपुढे आयर्लंडची शरणागती

२० धावांनी थरारक विजय मिळवत यजमान संघ सरस कोलंबो : टी-२० विश्वचषक २०२६ च्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात यजमान

नवख्या वाटणाऱ्या संघांनी अनुभवी संघांना रडवले

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक ७ फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. यंदाच्या स्पर्धेत आतापर्यंत पाच सामने

टी ट्वेंटी विश्वचषकात सर्वाधिक बळी घेणाऱ्यांमध्ये शाकिब अव्वलस्थानी

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक ७ फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. स्पर्धा सुरू होताच विश्वचषकात

मुंबई विमानतळावर 'विश्वविजेत्या' युवा सेनेचे शाही स्वागत, स्वागताला चाहत्यांची अलोट गर्दी

मुंबई   : हरारेच्या मैदानावर तिरंगा फडकवून सहाव्यांदा विश्वचषकावर नाव कोरणारा भारताचा युवा संघ आज मायदेशात दाखल

इंग्लंडचा ४ धावांनी निसटता विजय, नेपाळची झुंज अपयशी

मुंबई  : टी-२० विश्वचषकातील एका अत्यंत चुरशीच्या सामन्यात इंग्लंडने नेपाळचा ४ धावांनी पराभव केला. शेवटच्या

'कीवीं'चा अफगाणिस्तानवर दणदणीत विजय, टिम सायफर्ट आणि ग्लेन फिलिप्सची वादळी खेळी

चेन्नई  : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ मधील एका अत्यंत चुरशीच्या सामन्यात न्यूझीलंडने अफगाणिस्तानचे १८३ धावांचे