आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा लवकरच, गिल, जायसवाल आणि सुदर्शनला संधी मिळण्याची शक्यता

  25

मुंबई : बीसीसीआय ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात आशिया कप २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा करण्याची शक्यता आहे. यशस्वी जायसवाल, शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांना संघात स्थान मिळणार असल्याची चर्चा आहे. जायसवाल आणि गिल व्यस्त वेळापत्रकामुळे गेल्या काही टी-२० सामन्यांमध्ये खेळले नव्हते. पण आता इंग्लंडमधील ५ कसोटी सामन्यांनंतर त्यांच्याकडे १ महिन्याचा कालावधी आहे. साई सुदर्शनने आयपीएलमध्ये आपल्या कामगिरीने साऱ्यांचेच लक्ष वेधले होते.त्यामुळे त्याच्या नावाचा विचारही केला जाऊ शकतो.


भारतीय क्रिकेट संघाचा आशिया कपच्या ‘अ’ गटामध्ये समावेश आहे. या गटात पाकिस्तान, ओमान आणि यूएई हे संघ आहेत. भारताचा पहिला सामना १० सप्टेंबर रोजी यूएई बरोबर असेल. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना १४ सप्टेंबर रोजी दुबई येथे खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते.


यशस्वी जायसवाल, शुभमन गिल आणि साई सुदर्शन हे आशिया चषक स्पर्धेतील आघाडीच्या फळीतील महत्त्वाचे क्रिकेटपटू ठरू शकतात. पण जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांची उपलब्धता हा एक मोठा मुद्दा आहे. संघ निवडीपूर्वी या दोघांनाही फिटनेस सिद्ध करावा लागणार आहे. तर साई सुदर्शनने आयपीएल २०२५ चा हंगामात चांगली कामगिरी केली होती. त्याने १५ सामन्यांमध्ये १५६.१७ च्या स्ट्राईक रेटने ७५९ धावा केल्या होत्या. यामध्ये एक शतक आणि ६ अर्धशतकांचा समावेश आहे. त्यामुळे त्याचा विचार निवड समिती करण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

भारतात परतल्यावर मोहम्मद सिराजचे भव्य स्वागत

हैदराबाद : इंग्लंडमधील जबरदस्त प्रदर्शनानंतर स्टार गोलंदाज मोहम्मद सिराज बुधवार(दि.६) रोजी हैदराबादमध्ये परतले

भारत, विंडीज-आफ्रिकेसोबत कसोटी मालिका खेळणार

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार सामने नवी दिल्ली : भारताने इंग्लंडसोबत पाच कसोटी सामन्यांची मालिका बरोबरीत

नोवाक जोकोविचची ‘सिनसिनाटी ओपन’मधून माघार

नवी दिल्ली : ग्रँडस्लॅम विजेता नोवाक जोकोविचला आगामी यूएस ओपनपूर्वी आणखी एक धक्का बसला आहे. त्याने सिनसिनाटी

Team india: इंग्लंड मालिका संपली, आता पुढे टीम इंडियाचे असणार हे वेळापत्रक

मुंबई: इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ २०२५ च्या उर्वरित वर्षासाठी सज्ज झाला

WTC Points Tableमध्ये इंग्लंडला हरवून भारत तिसऱ्या क्रमांकावर

मुंबई: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीतील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय क्रिकेट संघाने ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप

IND vs ENG: आम्ही कधीच हार मानणार नाही', हेड कोच गौतम गंभीरची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया

मुंबई: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam