जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमध्ये गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसावर खटला

मुंबई : जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेस रेल्वेत गोळीबार आणि हत्या प्रकरणात बडतर्फ कॉन्स्टेबल चेतनसिंह चौधरी याच्याविरोधातील खटल्याची सुनावणी मागील पाच महिने स्थगित होती. ही सुनावणी आता पुन्हा सुरू झाली आहे. चौधरीचा सहकारी नरेंद्र परमार याची साक्ष नोंदवण्यात आली.

चौधरीवर ३१ जुलै २०२३ रोजी पहाटे या गाडीत सेवेवर असताना सर्व्हिस रायफलमधून गोळीबार करून वरिष्ठ सहकारी (सहायक उपनिरीक्षक) टिकाराम मीना यांना तसेच तीन प्रवाशांना ठार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी दिंडोशी सत्र न्यायालयात खटला सुरू झाल्यानंतर, आपण मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त नसल्याचा दावा चौधरीने वकिलांमार्फत केला होता. या प्रकरणी वैद्यकीय अहवाल आला आहे. चौधरी हा मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यानंतर बडतर्फ कॉन्स्टेबल चेतनसिंह चौधरी याच्याविरोधातील खटल्याची सुनावणी पुन्हा सुरू झाली आहे. घटनेचे प्रत्यक्षदर्शी असलेले आरपीएफचे बडतर्फ हेड कॉन्स्टेबल नरेंद्र परमार यांची सहावे साक्षीदार म्हणून साक्ष नोंदवण्यात आली.

जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसच्या एस सहा या डब्यात चौधरीने गोळीबार केला. तो कोणत्या तरी कारणामुळे चिडलेला दिसत होता. त्यावेळी त्याला थांबवावे असे वाटले होते. मात्र तसा प्रयत्न केला तर तो आणखी प्रवाशांवर गोळीबार करेल, अशी भीती वाटत होती; असे आरपीएफचे बडतर्फ हेड कॉन्स्टेबल नरेंद्र परमार यांनी सांगतले.
Comments
Add Comment

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Minister Nitesh Rane : राज्यातील जलवाहतूक सेवा होणार डिजिटल

 मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील