Dadar Kabutar Khana Controversy: कबुतर खानाच्या राड्यानंतर देवेंद्र फडणविसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले "लोकांचे आरोग्य..."

मुंबई: मुंबईतील दादरमधील कबुतरखाना बंद करण्यावरून जैन समाज आज आक्रमक झाल्याचे दिसून आले. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेकडून हा कबूतरखाना बंद करण्यात आला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासनाने ताडपत्री टाकून कबुतरखाना पूर्णपणे बंद केला. ज्यामुळे आंदोलककर्ते भडकले आणि त्यांनी थेट आक्रमक पवित्रा घेत कबुतर खान्याची ताडपत्री काढण्याचा प्रयत्न केला. यात महिलांचा देखील मोठ्या संख्येने सहभाग होता. यावेळी आंदोलकांची पोलिसांसोबत झटापट देखील झाली. हा राडा व्हिडिओ आणि फोटोच्या मध्यमातून सोशल मिडियावर तूफान व्हायरल होत असताना, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.


आज सकाळपासून दादर येथील कबुतरखाना वाचवण्यासाठी जैन समाजाने केलेल्या राड्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.  ते म्हणले, "जैन समाजाच्या धार्मिक भावना आणि लोकांचे आरोग्य यांची सांगड घालावी लागेल, यासाठी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल." देवेंद्र फडणवीस हे छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते.



"एकीकडे धार्मिक आस्था आहे आणि दुसरीकडे लोकांचे आरोग्य देखील आहे": देवेंद्र फडणवीस 


आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. या दरम्यान एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी आपली प्रतिकिया दिली. दादरच्या कबुतरखान्याच्या मुद्द्यावरुन बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एकीकडे धार्मिक आस्था आहे, लोकभावना आहे आणि दुसरीकडे लोकांचे आरोग्य देखील आहे. या दोघांची सांगड आपल्याला घालावी लागेल. धार्मिक भावना जपण्याच्या दृष्टीने आपल्याला काय करता येईल आणि त्यातून आरोग्याला कुठलाही धोका होणार नाही अशा प्रकारचा मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोतयावर काही मार्ग आम्हाला सुचलेले देखील आहे. ते आम्ही कोर्टासमोर मांडू, जेणेकरून इतक्या वर्षाची जी परंपरा आहे, तीदेखील खंडित होणार नाही आणि आरोग्याचेही प्रश्न निर्माण होणार नाहीत असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.


दरम्यान, दादरच्या कबुतरखान्यावर महापालिकेने जी ताडपत्री टाकली होती. ती जैन समूदायाच्या आंदोलकांनी काढली, त्याचे बांबूही तोडण्यात आले. त्यानंतर हा कबुतरखाना न्यायालयाच्या विरोधात जाऊन पुन्हा सुरू करण्यात आला आहे.


 
Comments
Add Comment

BMC सभागृहनेत्यांचा पुन्हा आवाजावरून त्रागा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सभागृहातील ध्वनी यंत्रणेतील दोष निवारण करण्यास अद्यापही

Mumbai : भटक्या श्वानांची नसबंदी करण्यासाठी BMC ने केला ७० हजार कोटींचा खर्च, एमआयएमच्या नगरसेवकाने मारला हवेत बाण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील भटक्या श्वानांची नसबंदी करण्यासाठी संस्थांच्या नेमणुकीला स्थायी समितीने

Mumbai : सायकल ट्रॅक नाही, उद्यानही नाही आणि तरी कोट्यवधींचा देखभालीवर खर्च

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीभोवतीचा विळखा काढून दहा मीटर परिसर मोकळा करण्यात

Mithi नदीचा गाळ काढण्याच्या प्रस्तावांना मंजुरी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मिठी नदीमधील गाळ काढण्याच्या कंत्राट कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर

BMC स्थायी समिती अध्यक्ष करणार मुंबईतील रस्त्यांची पाहणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : पावसाळा जवळ आला असून अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे तसेच इतर प्रकल्पांची कामे सुुरु

BMC च्या तक्रारींचे होणार जलद निवारण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकर नागरिकांना नागरी सेवा-सुविधा पुरविताना नागरिकांचा सहभाग वाढवून त्यांच्या