बदलापूरकरांवर पाणीकपातीचे संकट

बदलापूर : दरवर्षीच्या तुलनेत यंदा मान्सून वेळेअगोदर दाखल झाल्याने पाणीटंचाईचा सामना बदलापूरकरांना करावा लागणार नाही, असे वाटले होते. मात्र यावर्षी तर ऐन पावसाळ्यात ‘पाण्याचीही आठवडा सुट्टी’ होणार आहे, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पत्रक काढून जाहीर केले आहे.


बदलापूर शहरात महावितरणाचा वेळीअवेळी होणाऱ्या विजेच्या लपंडावाचा फटका शहरातील पाणी व्यवस्थेलाही बसला आहे. बदलापूर आणि अंबरनाथ पाणीपुरवठा योजना १०० वर्षे जुनी असून अजूनही ती कार्यरत आहे. त्यातच शहरात महानगर गॅस, एमआयडीसी, सिग्नल यंत्रणा, सीसीटीव्ही, महावितरणचे आणि इतर कामांसाठी रस्ता खोदताना पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइन कधी कधी फुटत असतात, त्यामुळे कुठे तरी पाणी गळती होतच असते. तसेच गेल्या वर्षभरात १००० नवीन पाण्याचे कनेक्शन देण्यात आले आहेत.


तसेच अजून ५०० नवीन कनेक्शन प्रस्तावित आहेत. त्यासाठी जवळजवळ २.५ द.ल.लि. पाणी अतिरिक्त लागत आहे. तसेच नवीन योजना अजून सुरू झालेली नाही. यावर्षी मे महिन्यापासून अवकाळी पाऊस पडल्याने बडोदा एक्सप्रेस मार्गाची माती पहिल्याच पावसात पाइपमध्ये जाऊन कार्यक्षमता कमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे रोज २०% पर्यंत पाणीपुरवठा कमी होत असल्याने टाक्यांची क्षमता ठरलेल्या वेळेत पूर्ण होत नाही. परिणामी, वेळेच्या नियोजनामुळे कमी दाबात पाणी सोडण्यात येते. पावसामुळे पाण्याच्या गढूळतेचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे दिवसातून किमान ३ ते ४ वेळा ट्रिपिंग होत असल्याने पंपिंग बंद होऊन याचा पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे.


पाटबंधारे विभागाकडून अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांना १४० एमएलडी इतका पाण्याचा कोटा २०२७ पर्यंत आहे. बडोदा मार्गाची माती पाइपमध्ये गेल्याने प्रत्यक्षात १२० एमएलडी पाणी वापरात येते.


म्हणजे एका शहराला ६० एमएलडी पाणी वापरता येते, असे जरी गृहीत धरले तरी, विविध कामांमुळे रस्ते खोदताना किवा इतर काही कारणामुळे पाइपलाइन कुठे ना कुठे फुटत असल्याने बदलापूर शहराला प्रत्यक्ष ५० एमएलडी पाणी सद्यस्थितीत मिळत आहे. अतिरिक्त २.५ एमएलडी पाणी देण्यास यंत्रणेवर ताण येत आहे. हे टाळण्यासाठी आठवड्यातून एक दिवस त्या त्या भागात पाणीकपात तर उरलेल्या ८०% भागाला योग्य पाणीपुरवठा करता येईल.


हे नियोजन अंबरनाथमध्ये सुरू असून बदलापूर शहरासाठी देखील असेच नियोजन केल्यास कमीत कमी ८०% भागांना आठवड्यातून किमान ६ दिवस तरी सुरळीत पाणीपुरवठा करता येईल. सध्या चाचणी स्वरूपात साधारणतः २ आठवडे पाणीपुरवठा कपात करण्याचे प्रस्तावित असून गरज पडल्यास हा कालावधी वाढू शकतो असे मजीप्रा बदलापूरचे उपविभागीय अधिकारी सुरेश खाद्री यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Eknath Shinde : ठाणे क्लस्टर योजनेला गती देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

वागळे इस्टेट, किसननगर, कोपरी क्लस्टर महाप्रीतकडून एमएसआरडीसीकडे देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे

Central Railway Power Block Update : मध्य रेल्वेवर पॉवर ब्लॉक; ६ जूनला अनेक गाड्या रद्द, वेळापत्रकात बदल, लोकल सेवांवरही परिणाम!

कल्याण (Mumbai Central Railway Block) : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात आटगाव स्थानकावर नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग (Electronic Interlocking)

No-Parking Restrictions Ulhasnagar Roads : ठाणेकरांनो लक्ष द्या! उल्हासनगरमधील 'या' ५ मुख्य रस्त्यांवर २४ तास नो-पार्किंग; वाहतूक पोलिसांचा कडक निर्णय

उल्हासनगर : उल्हासनगर शहरात (Ulhasnagar) दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी ठाणे वाहतूक

Thane News : दिवा येथून ७ वर्षीय चिमुकली बेपत्ता; ३६ तासांच्या प्रयत्नानंतर ठाणे पोलिसांना यश

ठाणे : ठाणे (Thane News) जिल्ह्यातील दिवा परिसरातून बेपत्ता झालेल्या ७ वर्षीय मुलीचा अवघ्या ३६ तासांत शोध घेण्यात ठाणे

Bhiwandi Water : भिवंडीच्या १५ लाख लोकांना २७३ एमएलडी पाणी मिळणार, ४२६ कोटींचा पाणी प्रकल्प

भिवंडी : अमृत अभियान २.० उपक्रमांतर्गत भिवंडी-निझामपूर शहराच्या विस्तारित पाणीपुरवठा योजनेंतर्गत १५ लाख

Actor Sharad Ponkshe : सावरकरांचे विचार विश्व कल्याणाचे - अभिनेते शरद पोंक्षे

ठाणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार कोणीही थांबवू शकत नाही. त्यांचे विचार विश्वकल्याणाचे आहेत. त्यांचे