बदलापूरकरांवर पाणीकपातीचे संकट

बदलापूर : दरवर्षीच्या तुलनेत यंदा मान्सून वेळेअगोदर दाखल झाल्याने पाणीटंचाईचा सामना बदलापूरकरांना करावा लागणार नाही, असे वाटले होते. मात्र यावर्षी तर ऐन पावसाळ्यात ‘पाण्याचीही आठवडा सुट्टी’ होणार आहे, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पत्रक काढून जाहीर केले आहे.


बदलापूर शहरात महावितरणाचा वेळीअवेळी होणाऱ्या विजेच्या लपंडावाचा फटका शहरातील पाणी व्यवस्थेलाही बसला आहे. बदलापूर आणि अंबरनाथ पाणीपुरवठा योजना १०० वर्षे जुनी असून अजूनही ती कार्यरत आहे. त्यातच शहरात महानगर गॅस, एमआयडीसी, सिग्नल यंत्रणा, सीसीटीव्ही, महावितरणचे आणि इतर कामांसाठी रस्ता खोदताना पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइन कधी कधी फुटत असतात, त्यामुळे कुठे तरी पाणी गळती होतच असते. तसेच गेल्या वर्षभरात १००० नवीन पाण्याचे कनेक्शन देण्यात आले आहेत.


तसेच अजून ५०० नवीन कनेक्शन प्रस्तावित आहेत. त्यासाठी जवळजवळ २.५ द.ल.लि. पाणी अतिरिक्त लागत आहे. तसेच नवीन योजना अजून सुरू झालेली नाही. यावर्षी मे महिन्यापासून अवकाळी पाऊस पडल्याने बडोदा एक्सप्रेस मार्गाची माती पहिल्याच पावसात पाइपमध्ये जाऊन कार्यक्षमता कमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे रोज २०% पर्यंत पाणीपुरवठा कमी होत असल्याने टाक्यांची क्षमता ठरलेल्या वेळेत पूर्ण होत नाही. परिणामी, वेळेच्या नियोजनामुळे कमी दाबात पाणी सोडण्यात येते. पावसामुळे पाण्याच्या गढूळतेचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे दिवसातून किमान ३ ते ४ वेळा ट्रिपिंग होत असल्याने पंपिंग बंद होऊन याचा पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे.


पाटबंधारे विभागाकडून अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांना १४० एमएलडी इतका पाण्याचा कोटा २०२७ पर्यंत आहे. बडोदा मार्गाची माती पाइपमध्ये गेल्याने प्रत्यक्षात १२० एमएलडी पाणी वापरात येते.


म्हणजे एका शहराला ६० एमएलडी पाणी वापरता येते, असे जरी गृहीत धरले तरी, विविध कामांमुळे रस्ते खोदताना किवा इतर काही कारणामुळे पाइपलाइन कुठे ना कुठे फुटत असल्याने बदलापूर शहराला प्रत्यक्ष ५० एमएलडी पाणी सद्यस्थितीत मिळत आहे. अतिरिक्त २.५ एमएलडी पाणी देण्यास यंत्रणेवर ताण येत आहे. हे टाळण्यासाठी आठवड्यातून एक दिवस त्या त्या भागात पाणीकपात तर उरलेल्या ८०% भागाला योग्य पाणीपुरवठा करता येईल.


हे नियोजन अंबरनाथमध्ये सुरू असून बदलापूर शहरासाठी देखील असेच नियोजन केल्यास कमीत कमी ८०% भागांना आठवड्यातून किमान ६ दिवस तरी सुरळीत पाणीपुरवठा करता येईल. सध्या चाचणी स्वरूपात साधारणतः २ आठवडे पाणीपुरवठा कपात करण्याचे प्रस्तावित असून गरज पडल्यास हा कालावधी वाढू शकतो असे मजीप्रा बदलापूरचे उपविभागीय अधिकारी सुरेश खाद्री यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Kalyan News : कल्याण रेल्वे स्थानकात RPF जवानावर तिघांचा हल्ला; प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकात रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) जवानावर तिघांकडून हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर

Kalyan Crime News : कल्याणमध्ये टवाळखोरांचा हैदोस! गार्डनमध्ये बसलेल्या तरुण-तरुणीला बेदम मारहाण, डोक्यात बाटल्या फोडल्या

कल्याण: कल्याण पूर्व परिसरात पुन्हा एकदा टवाळखोरांची दहशत समोर आली आहे. गार्डनमध्ये बसून गप्पा मारत असलेल्या

Thane Murder Case : ठाण्यात थरारक हत्याकांड; प्रियकराची हत्या करून मृतदेह ड्रममध्ये लपवला!

ठाणे : उत्तर प्रदेशातील मेरठ ड्रम हत्याकांडासारखीच एक धक्कादायक घटना ठाण्यातील मुंब्रा परिसरात समोर आली आहे.

Deputy Chief Minister Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ईव्ही गाडीचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रतिसाद पंतप्रधान

Bhiwandi Water Cut : भिवंडीकरांनो पाणी जपून वापरा! शहरात उद्यापासून २४ तास पाणीपुरवठा बंद; 'या' भागात होणार परिणाम

ठाणे : भिवंडी शहराला पाणीपुरवठा (Bhiwandi Water Cut) करणाऱ्या यंत्रणेमध्ये तातडीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

Kalyan : लोकलच्या छतावर जीवघेणा स्टंट; कल्याण रेल्वे स्थानकावर गोंधळ

कल्याण : ऐन गर्दीच्या वेळी कामावर जाण्याची वेळ आणि कल्याण ते विठ्ठलवाडी दरम्यानची रेल्वे वाहतूक खोळंबली, कारण