WTC Points Tableमध्ये इंग्लंडला हरवून भारत तिसऱ्या क्रमांकावर

मुंबई: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीतील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय क्रिकेट संघाने ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) २०२५-२७ च्या गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. रोमहर्षक ६ धावांनी विजय मिळवल्यानंतर भारताने गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले आहे.



गुणतालिकेत भारत तिसऱ्या क्रमांकावर


ओल्ड ट्रॅफर्ड येथे झालेल्या चौथ्या कसोटीनंतर भारत चौथ्या स्थानावर होता. पण ओव्हल कसोटीतील विजयामुळे त्यांनी थेट तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. दरम्यान, भारताकडून पराभव पत्करल्यानंतर इंग्लंडचा संघ चौथ्या स्थानावर घसरला आहे.


गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर, तर श्रीलंका दुसऱ्या स्थानावर आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने २०२५-२७ च्या सायकलमध्ये आतापर्यंत ५ सामने खेळले आहेत. यापैकी २ सामने जिंकले, २ गमावले आणि १ सामना अनिर्णित राहिला.
भारताची गुण टक्केवारी ४६.६७% आहे.


WTC च्या नियमांनुसार, प्रत्येक विजयासाठी १२ गुण, अनिर्णित सामन्यासाठी ४ गुण, टाय (tie) झालेल्या सामन्यासाठी ६ गुण, तर पराभवासाठी ० गुण मिळतात. भारताच्या विजयामुळे त्यांच्या गुणसंख्येत मोठी वाढ झाली आहे.

Comments
Add Comment

ॲशेस मालिका : सिडनीच्या मैदानात स्टीव्ह स्मिथची बॅट तळपली

'द वॉल' द्रविडचा विक्रम मोडीत काढून ३७ वे कसोटी शतक पूर्ण सिडनी : ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथने

हरमनप्रीतची झेप; दीप्तीचे अव्वल स्थान निसटले!

आयसीसी टी-२० क्रमवारी जाहीर दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मंगळवारी जाहीर केलेल्या ताज्या महिला टी-२०

श्रेयस अय्यर फिटनेस परीक्षेत उत्तीर्ण

विजय हजारे करंडक : मुंबई, कर्नाटक, सौराष्ट्र उपांत्यपूर्व फेरीत दाखल मुंबई : विजय हजारे करंडक २०२५-२६ स्पर्धेच्या

मुस्तफिजूर रहमानसाठी संपूर्ण बांगलादेश वेठीला!

आयपीएल प्रसारणावरील बंदीमुळे क्रिकेटप्रेमींमध्ये संताप नवी दिल्ली : बीसीसीआयने अलीकडेच आयपीएल फ्रँचायझी

आयसीसी टी-२० वर्ल्डकपचे नवीन वेळापत्रक?

भारतात खेळण्यास नकार देऊन बांगलादेशचा बीसीसीआयला दणका नवी दिल्ली : आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ बांगलादेशमुळे

बीसीसीआयच्या आदेशामुळे KKR ने मुस्तफिजूरला सोडल, ९.२० बसणार फटका ?

मुंबई : आयपीएल २०२६ सुरू होण्याआधीच कोलकाता नाईट रायडर्स संघाला मोठा निर्णय घ्यावा लागला आहे. बीसीसीआयच्या