WTC Points Tableमध्ये इंग्लंडला हरवून भारत तिसऱ्या क्रमांकावर

मुंबई: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीतील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय क्रिकेट संघाने ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) २०२५-२७ च्या गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. रोमहर्षक ६ धावांनी विजय मिळवल्यानंतर भारताने गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले आहे.



गुणतालिकेत भारत तिसऱ्या क्रमांकावर


ओल्ड ट्रॅफर्ड येथे झालेल्या चौथ्या कसोटीनंतर भारत चौथ्या स्थानावर होता. पण ओव्हल कसोटीतील विजयामुळे त्यांनी थेट तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. दरम्यान, भारताकडून पराभव पत्करल्यानंतर इंग्लंडचा संघ चौथ्या स्थानावर घसरला आहे.


गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर, तर श्रीलंका दुसऱ्या स्थानावर आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने २०२५-२७ च्या सायकलमध्ये आतापर्यंत ५ सामने खेळले आहेत. यापैकी २ सामने जिंकले, २ गमावले आणि १ सामना अनिर्णित राहिला.
भारताची गुण टक्केवारी ४६.६७% आहे.


WTC च्या नियमांनुसार, प्रत्येक विजयासाठी १२ गुण, अनिर्णित सामन्यासाठी ४ गुण, टाय (tie) झालेल्या सामन्यासाठी ६ गुण, तर पराभवासाठी ० गुण मिळतात. भारताच्या विजयामुळे त्यांच्या गुणसंख्येत मोठी वाढ झाली आहे.

Comments
Add Comment

शेवट गोड झाला, ऑस्ट्रेलियाचा ओमान विरूद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात मोठा विजय

पल्लेकेले : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप स्पर्धेतील शेवटच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाने ओमानचा पराभव

R Ashwin : 'भारतीय संघाला हरवणे कठीण'; रविचंद्रन अश्विनने केले सूर्या ब्रिगेडच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे कौतुक

भारतीय संघाने टी-२० वर्ल्ड कपच्या गट टप्प्यात अपराजित राहून सुपर-८ मध्ये प्रवेश केला आहे. भारतीय संघ सध्या

T20 World Cup 2026: ऑस्ट्रेलियन खेळाडूंना रिकी पॉन्टिंग कडून घरचा आहेर

आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेतून ऑस्ट्रेलिया संघ पहिल्या फेरीतच बाहेर पडल्याने त्यांच्यावर प्रचंड टीका होत

अफगाणिस्तानचा कॅनडाविरुद्धच्या सामन्यात मोठा विजय

चेन्नई : इब्राहिम झद्रानच्या वादळी फलंदाजीनंतर मोहम्मद नबीने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर अफगाणिस्तानने

झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियानंतर श्रीलंकेचेही उडवली दाणादाण

कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप स्पर्धेत झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियानंतर श्रीलंकेचेही दाणादाण उडवली.

सलग तीन शून्यांनंतर गावस्कर यांचा अभिषेकला सल्ला

मुंबई : टी-२० विश्वचषकाच्या साखळी फेरीत सलग तीन सामन्यांत शून्यावर बाद होणाऱ्या भारतीय सलामीवीर अभिषेक शर्माला