WTC Points Tableमध्ये इंग्लंडला हरवून भारत तिसऱ्या क्रमांकावर

  38

मुंबई: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीतील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय क्रिकेट संघाने ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) २०२५-२७ च्या गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. रोमहर्षक ६ धावांनी विजय मिळवल्यानंतर भारताने गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले आहे.



गुणतालिकेत भारत तिसऱ्या क्रमांकावर


ओल्ड ट्रॅफर्ड येथे झालेल्या चौथ्या कसोटीनंतर भारत चौथ्या स्थानावर होता. पण ओव्हल कसोटीतील विजयामुळे त्यांनी थेट तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. दरम्यान, भारताकडून पराभव पत्करल्यानंतर इंग्लंडचा संघ चौथ्या स्थानावर घसरला आहे.


गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर, तर श्रीलंका दुसऱ्या स्थानावर आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने २०२५-२७ च्या सायकलमध्ये आतापर्यंत ५ सामने खेळले आहेत. यापैकी २ सामने जिंकले, २ गमावले आणि १ सामना अनिर्णित राहिला.
भारताची गुण टक्केवारी ४६.६७% आहे.


WTC च्या नियमांनुसार, प्रत्येक विजयासाठी १२ गुण, अनिर्णित सामन्यासाठी ४ गुण, टाय (tie) झालेल्या सामन्यासाठी ६ गुण, तर पराभवासाठी ० गुण मिळतात. भारताच्या विजयामुळे त्यांच्या गुणसंख्येत मोठी वाढ झाली आहे.

Comments
Add Comment

IND vs ENG: आम्ही कधीच हार मानणार नाही', हेड कोच गौतम गंभीरची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया

मुंबई: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam

DSP सिराजला पोलीस विभागाने केला या खास अंदाजात सलाम, मोठ्या कामगिरीसाठी दिल्या शुभेच्छा

मुंबई: मोहम्मद सिराजला DSP सिराज यासाठी म्हटले जाते कारण तेलंगणा पोलीसमध्ये तो डीएसपी पदावर आहे. या मोहम्मद

सकाळी उठल्यावर वॉलपेपर लावले Believe आणि ठरवले देशासाठी जिंकायचे, ओव्हल विजयानंतर सिराजची प्रतिक्रिया

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या

IND vs ENG : चक दे इंडिया! ओव्हल कसोटीत टीम इंडियाने रचले अनेक विक्रम, इतिहासात होईल नोंद

लंडन: लंडनच्या ओव्हल मैदानावर पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने केवळ इंग्लंडला पराभूतच केले नाही तर अनेक

उत्कंठावर्धक सामन्यात मोहम्मद सिराजनं तारलं

लंडन : केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये रंगलेल्या भारत - इंग्लंड कसोटी सामन्यात भारत जिंकला. या उत्कंठावर्धक

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे