WTC Points Tableमध्ये इंग्लंडला हरवून भारत तिसऱ्या क्रमांकावर

मुंबई: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीतील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय क्रिकेट संघाने ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) २०२५-२७ च्या गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. रोमहर्षक ६ धावांनी विजय मिळवल्यानंतर भारताने गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले आहे.



गुणतालिकेत भारत तिसऱ्या क्रमांकावर


ओल्ड ट्रॅफर्ड येथे झालेल्या चौथ्या कसोटीनंतर भारत चौथ्या स्थानावर होता. पण ओव्हल कसोटीतील विजयामुळे त्यांनी थेट तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. दरम्यान, भारताकडून पराभव पत्करल्यानंतर इंग्लंडचा संघ चौथ्या स्थानावर घसरला आहे.


गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर, तर श्रीलंका दुसऱ्या स्थानावर आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने २०२५-२७ च्या सायकलमध्ये आतापर्यंत ५ सामने खेळले आहेत. यापैकी २ सामने जिंकले, २ गमावले आणि १ सामना अनिर्णित राहिला.
भारताची गुण टक्केवारी ४६.६७% आहे.


WTC च्या नियमांनुसार, प्रत्येक विजयासाठी १२ गुण, अनिर्णित सामन्यासाठी ४ गुण, टाय (tie) झालेल्या सामन्यासाठी ६ गुण, तर पराभवासाठी ० गुण मिळतात. भारताच्या विजयामुळे त्यांच्या गुणसंख्येत मोठी वाढ झाली आहे.

Comments
Add Comment

शुभमन गिलच्या तब्येतीमध्ये सुधारणा, मात्र दुसरा कसोटी सामना खेळणार का?

कोलकाता: कोलकातामधील ईडन गार्डन्सवर झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय

गुवाहाटीत पहिल्यांदाच होणार कसोटी सामना! दक्षिण आफ्रिकेच्या पराभवासाठी काय असणार भारताची रणनीती ?

गुहावटी: भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून हार पत्कारावी लागली. फिरकीपटूंसाठी फायदेशीर

केशव महाराजने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली तरी हॅटट्रिक नाही ! का जाणून घ्या

कोलकाता : गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर २२ नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा

गुवाहाटी कसोटीपूर्वी भारतावर दबाव; दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या तपासणीने वाढली चर्चा

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतला पहिला सामना भारताने गमावला.

'महा-देवा’ उपक्रमाद्वारे ग्रामीण खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास

टायगर श्रॉफ पाच वर्षांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील फुटबॉल

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा! भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले

दोहा : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप एमर्जिंग स्पर्धेतील कालच्या (१६ नोव्हेंबर) सामन्यात एका कॅचमुळे