IND vs ENG: आम्ही कधीच हार मानणार नाही', हेड कोच गौतम गंभीरची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया

  19

मुंबई: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांची प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे. गंभीर यांनी 'X' वर एक पोस्ट करून आपल्या भावना व्यक्त केल्या.


गंभीर यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, "आम्ही काही सामने जिंकू, काही हरू... पण आम्ही कधीच हार मानणार नाही!" त्यांनी संघाच्या कामगिरीचे कौतुक करताना "वेल डन बॉईज!" असे म्हटले आहे.


 


गंभीर यांची ही प्रतिक्रिया त्यांचा संघावर असलेला विश्वास दर्शवते. या विजयाने त्यांच्या रणनीतीचीही पुष्टी झाली आहे. काही क्रिकेट तज्ज्ञांनी गोलंदाजाऐवजी अतिरिक्त फलंदाजाला संधी देण्याच्या त्यांच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, मात्र गंभीर आपल्या निर्णयावर ठाम राहिले. ओव्हल कसोटीतील विजयाने त्यांच्या या भूमिकेला अधिक बळ मिळाले आहे.


३७४ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची धावसंख्या एकवेळ ३ बाद ३०१ इतकी होती. त्यावेळेस हॅरी ब्रूक आणि ज्यो रूट यांच्यात १९५ धावांची भागीदारी झाली होती. असे वाटत होते की सामना त्यांच्या ताब्यात आहे. मात्र यानंतर प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात मोहम्मद सिराजने पाच आणि प्रसिद्ध कृष्णाने चार विकेट मिळवल्या.

Comments
Add Comment

DSP सिराजला पोलीस विभागाने केला या खास अंदाजात सलाम, मोठ्या कामगिरीसाठी दिल्या शुभेच्छा

मुंबई: मोहम्मद सिराजला DSP सिराज यासाठी म्हटले जाते कारण तेलंगणा पोलीसमध्ये तो डीएसपी पदावर आहे. या मोहम्मद

सकाळी उठल्यावर वॉलपेपर लावले Believe आणि ठरवले देशासाठी जिंकायचे, ओव्हल विजयानंतर सिराजची प्रतिक्रिया

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या

IND vs ENG : चक दे इंडिया! ओव्हल कसोटीत टीम इंडियाने रचले अनेक विक्रम, इतिहासात होईल नोंद

लंडन: लंडनच्या ओव्हल मैदानावर पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने केवळ इंग्लंडला पराभूतच केले नाही तर अनेक

उत्कंठावर्धक सामन्यात मोहम्मद सिराजनं तारलं

लंडन : केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये रंगलेल्या भारत - इंग्लंड कसोटी सामन्यात भारत जिंकला. या उत्कंठावर्धक

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची