IND vs ENG: आम्ही कधीच हार मानणार नाही', हेड कोच गौतम गंभीरची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया

मुंबई: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांची प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे. गंभीर यांनी 'X' वर एक पोस्ट करून आपल्या भावना व्यक्त केल्या.


गंभीर यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, "आम्ही काही सामने जिंकू, काही हरू... पण आम्ही कधीच हार मानणार नाही!" त्यांनी संघाच्या कामगिरीचे कौतुक करताना "वेल डन बॉईज!" असे म्हटले आहे.


 


गंभीर यांची ही प्रतिक्रिया त्यांचा संघावर असलेला विश्वास दर्शवते. या विजयाने त्यांच्या रणनीतीचीही पुष्टी झाली आहे. काही क्रिकेट तज्ज्ञांनी गोलंदाजाऐवजी अतिरिक्त फलंदाजाला संधी देण्याच्या त्यांच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, मात्र गंभीर आपल्या निर्णयावर ठाम राहिले. ओव्हल कसोटीतील विजयाने त्यांच्या या भूमिकेला अधिक बळ मिळाले आहे.


३७४ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची धावसंख्या एकवेळ ३ बाद ३०१ इतकी होती. त्यावेळेस हॅरी ब्रूक आणि ज्यो रूट यांच्यात १९५ धावांची भागीदारी झाली होती. असे वाटत होते की सामना त्यांच्या ताब्यात आहे. मात्र यानंतर प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात मोहम्मद सिराजने पाच आणि प्रसिद्ध कृष्णाने चार विकेट मिळवल्या.

Comments
Add Comment

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे