IND vs ENG: आम्ही कधीच हार मानणार नाही', हेड कोच गौतम गंभीरची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया

मुंबई: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांची प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे. गंभीर यांनी 'X' वर एक पोस्ट करून आपल्या भावना व्यक्त केल्या.


गंभीर यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, "आम्ही काही सामने जिंकू, काही हरू... पण आम्ही कधीच हार मानणार नाही!" त्यांनी संघाच्या कामगिरीचे कौतुक करताना "वेल डन बॉईज!" असे म्हटले आहे.


 


गंभीर यांची ही प्रतिक्रिया त्यांचा संघावर असलेला विश्वास दर्शवते. या विजयाने त्यांच्या रणनीतीचीही पुष्टी झाली आहे. काही क्रिकेट तज्ज्ञांनी गोलंदाजाऐवजी अतिरिक्त फलंदाजाला संधी देण्याच्या त्यांच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, मात्र गंभीर आपल्या निर्णयावर ठाम राहिले. ओव्हल कसोटीतील विजयाने त्यांच्या या भूमिकेला अधिक बळ मिळाले आहे.


३७४ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची धावसंख्या एकवेळ ३ बाद ३०१ इतकी होती. त्यावेळेस हॅरी ब्रूक आणि ज्यो रूट यांच्यात १९५ धावांची भागीदारी झाली होती. असे वाटत होते की सामना त्यांच्या ताब्यात आहे. मात्र यानंतर प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात मोहम्मद सिराजने पाच आणि प्रसिद्ध कृष्णाने चार विकेट मिळवल्या.

Comments
Add Comment

IND vs AUS : फक्त १० धावा करताच रोहित शर्मा रचणार इतिहास

पर्थ/मेलबर्न: शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ १९ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन एकदिवसीय (ODI)

Asia Cup 2025 : बक्षीस मिळालेली कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकत नाही, जाणून घ्या कारण !

मुंबई : आशिया कप २०२५ मध्ये भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा याने चमकदार कामगिरी करत "प्लेअर ऑफ द टूर्नामेंट"चा किताब

IND vs PAK: वेल डन टीम इंडिया, वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानला केले नेस्तनाबूत

कोलंबो: आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये हा रविवार पुन्हा एकदा भारताच्या नावावर राहिला. आजच्या या सामन्यात

पाकिस्तानपुढे २४८ धावांचे आव्हान

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान साखळी सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून

सुपरसंडे : पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात भारताची दमदार सुरुवात

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत पाकिस्तान सामन्याला सुरुवात झाली आहे. नाणेफेक जिंकून

ICC Women's World Cup 2025 भारत-पाकिस्तान महिला विश्वचषक सामन्यात टॉस दरम्यान गोंधळ, मॅच रेफरीकडून गंभीर घोटाळा

कोलंबो : कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियममध्ये सुरू असलेल्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत आणि