कामानिमित्त मंत्रालयात येत असाल तर हे आधी वाचा...

ऑफलाइन पास देणाऱ्या खिडक्या स्वातंत्र्यदिनापासून बंद


मंत्रालय प्रवेशासाठी सर्वसामान्यांना आता ' डीजी' नोंदणी बंधनकारक


मुंबई (प्रतिनिधी) : कामानिमित्त मंत्रालयात येत असाल तर 'डीजी अ‍ॅप'वर नोंदणी करणे बंधनकारक असणार आहे. 'डीजी अ‍ॅप'वर नोंदणी असणाऱ्या अभ्यागतांनाच आता मंत्रालयात प्रवेश मिळणार आहे.


कामानिमित्त राज्यभरातील लोक मंत्रालयात धाव घेतात. मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी अभ्यागतांसह वकील, राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना गार्डन गेटजवळील खिडकीवर ऑफलाइन पास काढणे बंधनकारक आहे. मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी गार्डन गेट जवळ ऑफलाइन पाससाठी ९ खिडक्या, तर नवीन प्रशासकीय इमारतीत १ खिडकी अशा एकूण १० खिडक्यांवर ऑफलाइन पास उपलब्ध होतो. मात्र मंत्रालयाच्या सुरक्षेच्या दृष्टीने १५ ऑगस्टपासून खिडक्यांवर ऑफलाइन पास देणे बंद करण्यात येणार आहे.


मंत्रालयात येणाऱ्या व्हीव्हीआयपीची सुरक्षा व गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मार्च २०२५ मध्ये फेस डिटेक्शन व 'डीजी अ‍ॅप' प्रणाली अमलात आणली आहे. त्यामुळे आता ऑफलाइन पास पद्धत बंद करण्यात येणार असून अभ्यागतांना आता 'डीजी अ‍ॅप' वरच मंत्रालयात प्रवेश मिळणार आहे, असे गृह विभागाचे उपसचिव चेतन निकम यांनी सांगितले.


कामानिमित्त मंत्रालयात येणाऱ्यांची गर्दी लक्षात घेता गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासनाने फेस डिटेक्शन व डीजी प्रवेश अ‍ॅप प्रणाली अमलात आणली. या दोन्ही प्रणालीमुळे मंत्रालयातील गर्दीवर नियंत्रण मिळवणे शक्य होणार असल्याचे निकम यांनी सांगितले.



असा डाऊनलोड करा 'डीजी अ‍ॅप'


डीजी प्रवेश अ‍ॅप हे मोबाइल अ‍ॅप अण्ड्राईड आणि आयओएस अ‍ॅप या दोन्ही प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. आपल्या मोबाइलच्या प्रणालीनुसार अँड्राईडमध्ये प्ले स्टोअरवर, तर आयओएस अ‍ॅपल स्टोअरवर डीजी प्रवेश (digi pravesh) हे सर्च केल्यास हे अ‍ॅप विनामूल्य डाऊनलोड करता येते. या अ‍ॅपवर सुरुवातीला केवळ एकदाच नोंदणी करणे आवश्यक राहील. नोंदणी झाल्यानंतर आधार क्रमांकावर आधारित यंत्रणेद्वारे छायाचित्राची ओळख पटवून नोंदणी पूर्ण केल्यानंतर ज्या विभागात काम आहे, त्याचा स्लॉट बुक करून रांगेशिवाय प्रवेश मिळतो.

Comments
Add Comment

Santosh Deshmukh Massajog Sarpanch Election Result : बीड - मस्साजोगच्या निवडणुकीचा निकाल झाला जाहीर

बीड : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मस्साजोगच्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा निकाल आज अखेर जाहीर झाला, अत्यंत

BMC News : मुंबईत १७४ धोकादायक इमारती, ७२ इमारती केल्या रिक्त

रेल्वे लगतच्या इमारतींवरही विशेष लक्ष मुंबई : मुंबईत एकूण १७४ इमारती या अति धोकादायक जागा झाल्या असून त्यात १४१

BMC News : मुंबईतील १७४० किलोमीटर रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण

मुंबईतील ७५ टक्क्यांपेक्षा अधिक झालेले रस्ते ३१ मेपर्यंत पूर्ण करणार मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या

Water Cut In Mumbai : मुंबईत येत्या १५ मे पासून दहा टक्के पाणीकपात

महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी केले घोषणा अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस लांबणीवर, महापालिकेचे १७

BMC News : मुंबईतील नालेसफाईचे काम सुमारे ३९ टक्के

यंदा मध्य रेल्वेच्या रुळांवर पाणी साचण्याचे प्रमाण होणार कमी दादर, माटुंगा रोड येथीलही तुंबई होणार कमी मुंबई

Ashwini Bhide : महापालिका आयुक्त आश्विनी भिडे सकाळीच पोहोचल्या रस्त्यावर स्वच्छतेच्या कामाचा घेतला आढावा

मुंबई : मुंबई महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी मुंबई शहर विभागातील वडाळा आणि पूर्व उपनगरे विभागातील