सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती देताना सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना कडक शब्दात फटकारले. सच्चा भारतीय असं बोलणार नाही, या शब्दात सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले.

राहुल गांधी म्हणाले होते की चिनी सैन्य सीमेवर भारतीय सैनिकांना मारत आहे. हे वक्तव्य भारतीय सैन्याची मानहानी करणारे आहे असा आक्षेप घेत राहुल गांधींविरुद्ध एक खटला दाखल झाला होता. याच प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले. जर तुम्ही खरे भारतीय असाल तर तुम्ही असे बोलू शकत नाही, असेही सर्वोच्च न्यायालय म्हणाले.

तुम्हाला जे बोलायचे होते ते संसदेत का बोलला नाही ? असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना विचारला. चीनने भारतीय भूभाग ताब्यात घेतला असे म्हणता मग त्याचे पुरावे का सादर करत नाही ? असाही प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना विचारला. जेव्हा सीमेवर अशांतता असते तेव्हा दोन्ही बाजूंचे नुकसान होत असते; असेही सर्वोच्च न्यायालय म्हणाले. सर्वोच्च न्यायालयात राहुल गांधींच्या वतीने अभिषेक मनु संघवी वकील म्हणून उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींचे वकील म्हणून अभिषेक मनु संघवी वकील यांना फटकारले.

न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती एजी मसीह यांच्या खंडपीठाने खटल्याला स्थगिती देऊन राहुल गांधींना दिलासा दिला. खंडपीठाने तोंडी टिप्पणीत राहुल गांधींना गंभीर आरोप करताना ठोस पुरावा सादर करण्याचा सल्ला दिला.
Comments
Add Comment

तब्बल ५ हजार ५०० किलो वजनाची सोन्याची बुद्ध मूर्ती!

बुद्धांचे अनुयायी जगभरात अब्जावधींच्या संख्येने आहेत, जे अनेक देशांमध्ये पसरलेले आहेत. भगवान बुद्धांना भगवान

देशभरात पुढील आठवड्यापासून मतदार याद्यांची सखोल छाननी

पुढील वर्षी पश्चिम बंगालसह ५ राज्यांत निवडणुका निवडणूक आयोग पुढील आठवड्यात देशभरातील मतदार याद्यांचे विशेष

महिलेने अंतर्वस्त्रात लपवले लाखोंचे सोने! दिल्ली विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर

नवी दिल्ली: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानतळावरील

अरे बापरे! देशभरात २२ बनावट विद्यापीठे

यूजीसीकडून देशातील २२ बनावट विद्यापीठांची यादी जाहीर नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) देशातील २२ बनावट

फक्त ६ वर्षांच्या मुलांनाच पहिलीत प्रवेश

दिल्ली सरकारने पहिलीच्या प्रवेशासाठी वयोमर्यादा केली निश्चित नवी दिल्ली  : दिल्ली सरकारने शालेय शिक्षणात एक

अयोध्येतील राम मंदिरावर पंतप्रधान मोदी फडकवणार धर्म ध्वज

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत प्रमुख पाहुणे अयोध्या  : अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर होणाऱ्या