सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती देताना सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना कडक शब्दात फटकारले. सच्चा भारतीय असं बोलणार नाही, या शब्दात सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले.

राहुल गांधी म्हणाले होते की चिनी सैन्य सीमेवर भारतीय सैनिकांना मारत आहे. हे वक्तव्य भारतीय सैन्याची मानहानी करणारे आहे असा आक्षेप घेत राहुल गांधींविरुद्ध एक खटला दाखल झाला होता. याच प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले. जर तुम्ही खरे भारतीय असाल तर तुम्ही असे बोलू शकत नाही, असेही सर्वोच्च न्यायालय म्हणाले.

तुम्हाला जे बोलायचे होते ते संसदेत का बोलला नाही ? असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना विचारला. चीनने भारतीय भूभाग ताब्यात घेतला असे म्हणता मग त्याचे पुरावे का सादर करत नाही ? असाही प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना विचारला. जेव्हा सीमेवर अशांतता असते तेव्हा दोन्ही बाजूंचे नुकसान होत असते; असेही सर्वोच्च न्यायालय म्हणाले. सर्वोच्च न्यायालयात राहुल गांधींच्या वतीने अभिषेक मनु संघवी वकील म्हणून उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींचे वकील म्हणून अभिषेक मनु संघवी वकील यांना फटकारले.

न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती एजी मसीह यांच्या खंडपीठाने खटल्याला स्थगिती देऊन राहुल गांधींना दिलासा दिला. खंडपीठाने तोंडी टिप्पणीत राहुल गांधींना गंभीर आरोप करताना ठोस पुरावा सादर करण्याचा सल्ला दिला.
Comments
Add Comment

बिहारमध्ये नव्या सरकारच्या हालचालींना वेग; २२ नोव्हेंबरपूर्वी शपथविधीची शक्यता

पटना : बिहारमध्ये नवं सरकार येत्या २२ नोव्हेंबरपूर्वी स्थापन होईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री आणि एलजेपीचे

Mumbai CNG Cut : मुंबईत CNGचा मोठा तुटवडा, रिक्षा-टॅक्सी वाहतूक ठप्प; मुंबईकरांचे प्रवास नियोजन कोलमडण्याची शक्यता

वडाळ्यातील गेल पाईपलाईन बिघाडामुळे मुंबईत सीएनजी टंचाई मुंबई : वडाळा परिसरातील गेल गॅसच्या मुख्य

लाल किल्ला स्फोट प्रकरणाचा कट रचणाऱ्या दहशतवाद्याला अटक! कोण आहे आमिर रशीद अली?

दिल्ली: दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात झालेल्या कार बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेला मोठे यश

केएफसी आणि मॅकडोनाल्डसारखे फूड ब्रॅण्ड रेल्वेस्थानकांवर उघडणार

रेल्वेने त्यांच्या केटरिंग धोरणात केला मोठा बदल नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने त्यांच्या केटरिंग धोरणात एक मोठा

पुन्हा नितीशकुमारच मुख्यमंत्री

बिहारमध्ये रालोआचे मंत्रिमंडळ स्थापनेबाबत एकमत; भाजपला जास्त प्रतिनिधित्व नवी दिल्ली : बिहार विधानसभा

नवी दिल्ली लाल किल्ला कार स्फोट प्रकरणात तपासात नवे धक्कादायक खुलासे!

नवी दिल्ली : ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबर रोजी घडलेल्या कार स्फोट प्रकरणात तपासाला मोठा वळण आले आहे.