सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती देताना सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना कडक शब्दात फटकारले. सच्चा भारतीय असं बोलणार नाही, या शब्दात सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले.

राहुल गांधी म्हणाले होते की चिनी सैन्य सीमेवर भारतीय सैनिकांना मारत आहे. हे वक्तव्य भारतीय सैन्याची मानहानी करणारे आहे असा आक्षेप घेत राहुल गांधींविरुद्ध एक खटला दाखल झाला होता. याच प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले. जर तुम्ही खरे भारतीय असाल तर तुम्ही असे बोलू शकत नाही, असेही सर्वोच्च न्यायालय म्हणाले.

तुम्हाला जे बोलायचे होते ते संसदेत का बोलला नाही ? असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना विचारला. चीनने भारतीय भूभाग ताब्यात घेतला असे म्हणता मग त्याचे पुरावे का सादर करत नाही ? असाही प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना विचारला. जेव्हा सीमेवर अशांतता असते तेव्हा दोन्ही बाजूंचे नुकसान होत असते; असेही सर्वोच्च न्यायालय म्हणाले. सर्वोच्च न्यायालयात राहुल गांधींच्या वतीने अभिषेक मनु संघवी वकील म्हणून उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींचे वकील म्हणून अभिषेक मनु संघवी वकील यांना फटकारले.

न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती एजी मसीह यांच्या खंडपीठाने खटल्याला स्थगिती देऊन राहुल गांधींना दिलासा दिला. खंडपीठाने तोंडी टिप्पणीत राहुल गांधींना गंभीर आरोप करताना ठोस पुरावा सादर करण्याचा सल्ला दिला.
Comments
Add Comment

भारत-पाकिस्तान संघर्षामधील मध्यस्थीचा आणखी एक दावेदार, चीनचा दावा भारताने फेटाळला

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत

ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरमधून लागोपाठ दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने

माजी एनआयए प्रमुख सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच