भाऊरायांना राखी पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज, पावसाची चिंता मिटली; राखीसाठी वॉटरप्रूफ लिफाफा

पुणे (वार्ताहर) : दूरगावी असणाऱ्या भावाला आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी सध्या बहिणींची लगबग सुरू आहे. तसेच दरवर्षीप्रमाणे रक्षाबंधनासाठी पोस्ट विभागदेखील लाडक्या बहिणींच्या भाऊरायाला राखी पाठविण्यासाठी सज्ज झाला आहे.


यावर्षदिखील पोस्टाने राखी पाठविण्यासाठी स्वतंत्र काउंटर सुरू केले आहेत. शहरातील ३४ पोस्ट कार्यालयात दररोज हजारो राख्यांच्या पाकिटांचे बुकिंग होत असून, त्या पोस्टातून राख्या विविध ठिकाणी पाठविल्या जातात. येत्या ९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. पोस्टाने राखी स्पेशलचा लिफाफा सादर केला आहे. हा राखी लिफाफा वॉटरप्रूफ आहे. या लिफाफ्यातून पाठवलेली राखी न भिजता भावापर्यंत व्यवस्थित पोहोचवली जाणार आहे.


लिफाफा वॉटरप्रूफ असल्याने राखीचे पाकीट पावसातही सुरक्षित राहील. पार्सल पाठवल्यानंतर ते कुठे पोहोचले आहे, हे जाणून घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही.


इंडियन पोस्टने आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून पोस्ट केली आहे की, लोकांना आपला लिफाफा कुठे पोहोचला आहे हे फक्त एका क्लिकवर कळू शकते. अवघ्या एका क्लिकवर पार्सलशी संबंधित सर्व माहिती तुमच्या स्क्रीनवर दिसेल.


स्पीड पोस्ट, रजिस्टर, सामान्यतः वजनानुसार ५ रुपयाचे तिकीट लावून राखी पाठवू शकतात. ग्राहकांना जशी गरज आहे त्याप्रमाणे राखी पाठवू शकतात. सर्व पोस्ट ऑफिसमध्ये बुकिंग करण्याची सुविधा आहे. रजिस्टरसाठी २२ रुपये, स्पीड पोस्ट पुण्यात १८ रुपये आणि पुण्याच्या बाहेर असेल तर ४१ रुपये आहे वजनाप्रमाणे दर बदलत राहतात. बाय एअर मेल सुविधा उपलब्ध आहे. स्पीड पोस्टने राखी पाठविली तर ट्रॅकिंगची सुविधा आहे. ( जनसंपर्क निरीक्षक, पिपरी) के. एस. पारखी,

Comments
Add Comment

NEET Paper Leak Case : पुण्यात ‘मोटेगावकर’ RCC क्लासवर महापालिकेची मोठी कारवाई; ३.२० कोटींचा कर थकीत, क्लास सील

पुणे : नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात चर्चेत आलेले प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांच्या पुण्यातील प्रसिद्ध

Online Fraud : शेअर मार्केटमध्ये ‘डबल रिटर्न’चं आमिष; अलिबागमधील व्यक्तीची तब्बल ६६ लाखांची ऑनलाइन फसवणूक

रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीवर मोठा

अनुदानित खतांसोबत विना अनुदानित खतांची सक्तीची विक्री बंद

कृषी विभागाचा निर्णय; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार मुंबई : "राज्यात काही खत उत्पादक आणि पुरवठादार

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

Maharashtra Heat Wave : महाराष्ट्रात उष्णतेचा कहर! IMD चा हाय अलर्ट; ‘गरज असेल तरच घराबाहेर पडा’, नागरिकांना इशारा

महाराष्ट्रात पुन्हा एकदा उष्णतेची तीव्र लाट उसळली असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने अक्षरशः

Devendra Fadnavis : पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवा; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “घाबरून खरेदी करू नका, राज्यात...

मुंबई : राज्यात पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवा पसरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी