युगेंद्र पवारांचा साखरपुडा, मुंबईत पवार कुटुंब एकत्र

मुंबई : काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या पुण्यात साखरपुडा झाला. आता अजित पवार यांचे भाऊ श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार यांचा साखरपुडा झाला. मुंबईतील प्रभादेवी येथे युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा सारखपुडा झाला. या निमित्ताने संपूर्ण पवार कुटुंबीय एकत्र आले.

साखरपुडा परंपरागत पद्धतीने झाला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा खासदार सुनेत्रा अजित पवार, अजित पवारांचे दोन्ही मुलगे, राशपचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार तसेच पवार कुटुंबातील इतर सदस्य आणि आप्तेष्ट उपस्थित होते.

कोण आहेत युगेंद्र श्रीनिवास पवार ?

अजित पवार यांचे भाऊ श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्याच्या राजकारणात पदार्पण झाले. युगेंद्र पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तिकिटावर बारामती मतदारसंघातून अजित पवार यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत युगेंद्र पवार यांचा पराभव झाला आणि अजित पवार विजयी झाले होते. निवडणुकीत पराभव झाला तरी युगेंद्र पवार पक्ष कार्यातून राजकारणात सक्रीय आहेत. त्यांचा साखरपुडा रविवार ३ ऑगस्ट २०२५ रोजी प्रभादेवी येथील इंडिया बुल्स बिल्डिंग तनिष्का कुलकर्णी यांच्या घरीच आहे.
Comments
Add Comment

राष्ट्रीय महामार्ग ६१ च्या चौपदरीकरणामुळे वाशी APMC ला फायदा होणार, मुंबईकरांना दूध भाजीपाला आणखी ताजा मिळणार

मुंबई : दररोज मुंबईला प्रामुख्याने कल्याण-मुरबाड-अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरुन दूध आणि

मुंबई मेट्रो वनचे तिकीट उबर ॲपवरही उपलब्ध

तिकीट खरेदीचा लागणारा वेळ होणार कमी मुंबई : आता घाटकोपर - अंधेरी - वर्सोवा या मेट्रो-१ मार्गिकेवर प्रवास अधिक

वडाळ्यात उबाठासाठी कठिण परिस्थती; ठाकरे बंधूंची युती झाल्यास मनसेला जागा कुठे सोडायची हा प्रश्न

मुंबई (सचिन धानजी): दक्षिण मध्य मुंबईतील वडाळा विधानसभा हा कोणे एकेकाळी शिवसेना बालेकिल्ला मानला जात होता, परंतु

गोव्यातील नाईटी क्लबला आग, मुंबई अग्निशमन झाले सतर्क

नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर २२ ते २८ डिसेंबर दरम्यान दलाची ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ हॉटेल्स्,

कचरा खासगीकरणाची फेरनिविदा की वाटाघाटी? अंदाजित दरापेक्षा ३९ ते ६३ टक्के अधिक दराने लावली कंपन्यांनी बोली

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने कचरा उचलून वाहून नेण्यासाठी वाहन आणि मनुष्यबळ पुरवण्याकरता

महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

मुंबई : राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदला होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा गेला असूनही