युगेंद्र पवारांचा साखरपुडा, मुंबईत पवार कुटुंब एकत्र

मुंबई : काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या पुण्यात साखरपुडा झाला. आता अजित पवार यांचे भाऊ श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार यांचा साखरपुडा झाला. मुंबईतील प्रभादेवी येथे युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा सारखपुडा झाला. या निमित्ताने संपूर्ण पवार कुटुंबीय एकत्र आले.

साखरपुडा परंपरागत पद्धतीने झाला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा खासदार सुनेत्रा अजित पवार, अजित पवारांचे दोन्ही मुलगे, राशपचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार तसेच पवार कुटुंबातील इतर सदस्य आणि आप्तेष्ट उपस्थित होते.

कोण आहेत युगेंद्र श्रीनिवास पवार ?

अजित पवार यांचे भाऊ श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्याच्या राजकारणात पदार्पण झाले. युगेंद्र पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तिकिटावर बारामती मतदारसंघातून अजित पवार यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत युगेंद्र पवार यांचा पराभव झाला आणि अजित पवार विजयी झाले होते. निवडणुकीत पराभव झाला तरी युगेंद्र पवार पक्ष कार्यातून राजकारणात सक्रीय आहेत. त्यांचा साखरपुडा रविवार ३ ऑगस्ट २०२५ रोजी प्रभादेवी येथील इंडिया बुल्स बिल्डिंग तनिष्का कुलकर्णी यांच्या घरीच आहे.
Comments
Add Comment

खोकल्याच्या सिरपमुळे बालकांचा मृत्यू; खबरदारीसाठी राज्याने 'हा' टोल-फ्री क्रमांक केला जारी!

मुंबई: मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशातील काही राज्यांमध्ये 'कोल्ड्रिफ' (Coldrif) नावाच्या खोकल्याच्या सिरपमुळे काही

लाडक्या बहिणींची 'ई केवायसी'तील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार, मंत्री आदिती तटकरेंचे आश्वासन

मुंबई(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक केली आहे.

ठाकरे बंधूंची मात्रोश्रीवर भेट, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय,

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात