यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची चमक दाखवत शानदार शतक झळकावले . हे त्याचे कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक होते, आणि त्यापैकी चार शतके त्याने इंग्लंडविरुद्धच केली आहेत. या शतकासह जायसवालने माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांचा विक्रम मोडीत काढला, तसेच टीम इंडियानेही एक खास विक्रम आपल्या नावावर केला.



जायसवालने रवी शास्त्रींना मागे टाकले


२३ वर्षांपेक्षा कमी वयात सर्वाधिक कसोटी शतके झळकावण्याच्या बाबतीत यशस्वी जायसवालने रवी शास्त्रींना मागे टाकले आहे. शास्त्रींच्या नावावर २३ वर्षांपेक्षा कमी वयात ५ कसोटी शतके होती, तर जायसवालने आता ६ शतके पूर्ण केली आहेत.


जागतिक स्तरावर, २३ वर्षांपेक्षा कमी वयात कसोटी शतक झळकावणाऱ्या सलामीवीरांमध्ये जायसवालने दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज ग्रेम स्मिथने या वयात ७ शतके झळकावली होती, जो या यादीत पहिल्या स्थानावर आहे.



टीम इंडियाने रचला खास विक्रम


या मालिकेत भारतीय संघानेही एक विशेष विक्रम प्रस्थापित केला आहे. इंग्लंडविरुद्धच्या या कसोटी मालिकेत आतापर्यंत भारतीय फलंदाजांनी एकूण १२ शतके झळकावली आहेत. कसोटी मालिकेतील भारतीय संघासाठी हा एक नवा विक्रम आहे. यापूर्वी, एका कसोटी मालिकेत भारताने इतकी शतके कधीच केली नव्हती.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत