IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

  104

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे खेळ थांबवण्यात आला असून सामन्याचा खेळ पाचव्या दिवसापर्यंत गेला आहे. इंग्लंडचा स्कोर ३३९ इतका झाला आहे. तर त्यांचे ६ विकेट पडले आहेत. जेमी आवर्टन आणि जेमी स्मिथ नाबाद आहेत. इंग्लंडला विजयासाठी ३५ धावा दूर आहे. तर भारताला चार विकेट हव्या आहेत. पावसामुळे खेळ थांबवण्यात आला आहे.


सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला विजयासाठी ३७४ धावांचे आव्हान दिले आहे. भारतीय संघाने आपल्या पहिल्या डावात २२४ आणि इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात २४७ धावा केल्या. इंग्लंडचा पहिल्या डावाच्या आधारावर २३ धावांची आघाडी मिळवली होती. भारतीय संघाने दुसऱ्या डावात ३९६ धावांवर आटोपला.



असा होता इंग्लंडचा दुसरा डाव


धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडची सुरूवात चांगली राहिली. जॅक क्राऊली आणि बेन डकेट यांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी केली. ही भागीदारी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने तोडली. खेळाच्या चौथ्या दिवशी बेन डकेट आणि ओली पोपने सांभाळत सुरूवात केली आणि दुसऱ्या विकेटसाठी ३२ धावा केल्या. डकेटने अर्धशतक ठोकल्यानंतर तो प्रसिद्ध कृष्णाच्या बॉलवर केएल राहुलच्या हाती कॅच देत बाद झाला. डकेटने ८३ बॉलमध्ये ५४ धावा केल्या.



भारताला चमत्कार वाचवणार का?


पाचव्या कसोटीचा खेळ पाचव्या दिवसापर्यंत गेला आहे. त्यामुळे भारताच्या विजयाच्या आशा अजूनही जिवंत आहेत. पाचव्या दिवशी चमत्कार होणार का? भारत हा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवणार का? याचे उत्तर आता पाचव्या दिवशी मिळेल.


शुभमन गिलच्या नेतृत्वातील भारतीय संघासाठी हा सामना करो वा मरोचा आहे. इंग्लंडने या मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारताने हा सामना गमावला तर मालिकाही गमवावी लागेल.

Comments
Add Comment

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल