IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

  223

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे खेळ थांबवण्यात आला असून सामन्याचा खेळ पाचव्या दिवसापर्यंत गेला आहे. इंग्लंडचा स्कोर ३३९ इतका झाला आहे. तर त्यांचे ६ विकेट पडले आहेत. जेमी आवर्टन आणि जेमी स्मिथ नाबाद आहेत. इंग्लंडला विजयासाठी ३५ धावा दूर आहे. तर भारताला चार विकेट हव्या आहेत. पावसामुळे खेळ थांबवण्यात आला आहे.


सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला विजयासाठी ३७४ धावांचे आव्हान दिले आहे. भारतीय संघाने आपल्या पहिल्या डावात २२४ आणि इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात २४७ धावा केल्या. इंग्लंडचा पहिल्या डावाच्या आधारावर २३ धावांची आघाडी मिळवली होती. भारतीय संघाने दुसऱ्या डावात ३९६ धावांवर आटोपला.



असा होता इंग्लंडचा दुसरा डाव


धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडची सुरूवात चांगली राहिली. जॅक क्राऊली आणि बेन डकेट यांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी केली. ही भागीदारी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने तोडली. खेळाच्या चौथ्या दिवशी बेन डकेट आणि ओली पोपने सांभाळत सुरूवात केली आणि दुसऱ्या विकेटसाठी ३२ धावा केल्या. डकेटने अर्धशतक ठोकल्यानंतर तो प्रसिद्ध कृष्णाच्या बॉलवर केएल राहुलच्या हाती कॅच देत बाद झाला. डकेटने ८३ बॉलमध्ये ५४ धावा केल्या.



भारताला चमत्कार वाचवणार का?


पाचव्या कसोटीचा खेळ पाचव्या दिवसापर्यंत गेला आहे. त्यामुळे भारताच्या विजयाच्या आशा अजूनही जिवंत आहेत. पाचव्या दिवशी चमत्कार होणार का? भारत हा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवणार का? याचे उत्तर आता पाचव्या दिवशी मिळेल.


शुभमन गिलच्या नेतृत्वातील भारतीय संघासाठी हा सामना करो वा मरोचा आहे. इंग्लंडने या मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारताने हा सामना गमावला तर मालिकाही गमवावी लागेल.

Comments
Add Comment

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये

Bronco Test काय आहे? भारतीय क्रिकेटपटूंना फिटनेसाठी आता द्यावी लागणार ही टेस्ट

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटमध्ये फिटनेसबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांसाठी आता

दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजची पहिल्या स्थानी झेप

नवी दिल्ली : आयसीसीने पुन्हा एकदा क्रमवारी जाहीर केली आहे. गेल्या आठवड्यात एकही कसोटी सामना झाला नाही, त्यामुळे

ICC Rankings : आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीतून रोहित-विराटची नावे गायब

दुबई : भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीची नावे आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतून गायब

Team India Asia Cup 2025: आशिया कप २०२५ साठी टीम इंडियाची घोषणा! सूर्या करणार नेतृत्व; शुभमन गिल उपकर्णधार

Team India T20 Squad for Asia Cup 2025: दिनांक ९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कप २०२५ साठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे.