IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे खेळ थांबवण्यात आला असून सामन्याचा खेळ पाचव्या दिवसापर्यंत गेला आहे. इंग्लंडचा स्कोर ३३९ इतका झाला आहे. तर त्यांचे ६ विकेट पडले आहेत. जेमी आवर्टन आणि जेमी स्मिथ नाबाद आहेत. इंग्लंडला विजयासाठी ३५ धावा दूर आहे. तर भारताला चार विकेट हव्या आहेत. पावसामुळे खेळ थांबवण्यात आला आहे.


सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला विजयासाठी ३७४ धावांचे आव्हान दिले आहे. भारतीय संघाने आपल्या पहिल्या डावात २२४ आणि इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात २४७ धावा केल्या. इंग्लंडचा पहिल्या डावाच्या आधारावर २३ धावांची आघाडी मिळवली होती. भारतीय संघाने दुसऱ्या डावात ३९६ धावांवर आटोपला.



असा होता इंग्लंडचा दुसरा डाव


धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडची सुरूवात चांगली राहिली. जॅक क्राऊली आणि बेन डकेट यांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी केली. ही भागीदारी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने तोडली. खेळाच्या चौथ्या दिवशी बेन डकेट आणि ओली पोपने सांभाळत सुरूवात केली आणि दुसऱ्या विकेटसाठी ३२ धावा केल्या. डकेटने अर्धशतक ठोकल्यानंतर तो प्रसिद्ध कृष्णाच्या बॉलवर केएल राहुलच्या हाती कॅच देत बाद झाला. डकेटने ८३ बॉलमध्ये ५४ धावा केल्या.



भारताला चमत्कार वाचवणार का?


पाचव्या कसोटीचा खेळ पाचव्या दिवसापर्यंत गेला आहे. त्यामुळे भारताच्या विजयाच्या आशा अजूनही जिवंत आहेत. पाचव्या दिवशी चमत्कार होणार का? भारत हा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवणार का? याचे उत्तर आता पाचव्या दिवशी मिळेल.


शुभमन गिलच्या नेतृत्वातील भारतीय संघासाठी हा सामना करो वा मरोचा आहे. इंग्लंडने या मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारताने हा सामना गमावला तर मालिकाही गमवावी लागेल.

Comments
Add Comment

न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची निराशाजनक सुरुवात

कोलंबो : आर. प्रेमदासा स्टेडियम येथे आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील सुपर ८ फेरीतला श्रीलंका विरुद्ध

...तरच भारत सेमी फायनल खेळू शकेल

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये सुपर ८ फेरीचे सामने सुरू आहेत. ग्रुप एक मध्ये वेस्ट इंडिज (धावगती

फिटनेस स्टार मयांक पवार याचे ३७ व्या वर्षी आकस्मिक निधन

मुंबई : रिअ‍ॅलिटी शोच्या दुनियेतून प्रसिद्धी मिळवलेले आणि फिटनेस क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण करणारे

ICC Women's T20 World Cup : आयसीसी महिला टी२० विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या भारताचा सामना कधी ?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२६ चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. ही

विंडीजचा झिम्बाब्वे विरुद्ध मोठा विजय

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर ८ फेरीत वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाब्वे हा सामना

‘जर-तर’च्या समीकरणावर ठरणार भारताचा सेमीफायनलचा प्रवेश!

धावगती उंचावण्यासाठी दोन्ही सामने फरकाने जिंकावे लागणार नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कपमध्ये सर्वात मजबूत संघ