ठाणेकरांनो, पाण्याचा जपून वापरा करा

मंगळवारी ८ तास पाणीपुरवठा बंद


डोंबिवली  : केडीएमसीच्या कल्याण (पूर्व) परिसरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतील देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे बारावे जलशुद्धीकरण केंद्रामधून मंगळवारी ५ ऑगस्टला ८ तासासाठी महानगरपालिका क्षेत्रातील कल्याण पूर्व परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यावेळी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत पाणी बंद ठेवण्यात येणार आहे.


ऐन पावसाळ्यात पाण्याच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. कल्याण डोंबिवली पालिकेतील पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घोडे यांनी सांगितल्यानुसार, पाणी पुरवठा करणाऱ्या वितरण व्यवस्थेचे देखभाल दुरुस्तीचे काम पालिका प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. यामुळे बारावे जलशुद्धीकरण केंद्रामधून नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवावा व पाणी जपून वापरावे असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


मोहिली जलशुध्दीकरण केंद्रातून पाणी पुरवठा होणाऱ्या मांडा, टिटवाळा, बल्याणी, बनेली, आंबिवली, शहाड, अटाळी आणि परिसरातील ग्रामीण भागातील काही गावे, याशिवाय कल्याण पश्चिमेतील ब प्रभाग हद्दीतील मिलिंदनगर, योगीधाम, चिकनघर, बिर्ला महाविद्यालय परिसर, म्हाडा कॉलनी परिसर, मुरबाड रस्ता, सिंडिकेट परिसराला होणारा पाणी पुरवठा मंगळवारी बंद राहणार आहे.


तर कल्याण पूर्व, डोंबिवली शहराचा पाणी पुरवठा सुरळीत राहणार असल्याचे पालिकेने म्हटले आहे. मंगळवारी दुरुस्तीच्या कामाच्यावेळी महावितरणकडून मोहिली जलशुध्दीकरण मीटर युनिट बसवण्यात येणार आहेत. तसेच दिवसभरात किती पाणी उचलले, शुध्द केले याची मोजणी या मीटरच्या माध्यमातून केली जाणार आहे. ही अत्यावश्यक कामे मोहिली जलशुध्दीकरण केंद्रात करावयाची असल्याने मंगळवारी कल्याण शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.


आठ तास पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी एक दिवस पुरेल इतका पाणीसाठा करून ठेवावा आणि पालिकेला सहकार्य करावे असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

Comments
Add Comment

ठाणे जिल्ह्यात पमी गुरुचा दबदबा, व्हायरल झाले अनेक रील

ठाणे : नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात अशोक खरात नावाच्या भोंदू बाबाने धुमाकूळ घातला. या भोंदू बाबाला पोलिसांनी

बदलापूर ते नवी मुंबई थेट लोकलचा प्रस्ताव

बदलापूर : बदलापूर येथून थेट नवी मुंबईपर्यंत लोकल सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने मोठी हालचाल सुरू झाली आहे.

कडोंमपाचा ३ हजार १८६ कोटींचा शिलकी अर्थसंकल्प

कोणतीही कर आणि दरवाढ नाही राज्य सरकारच्या अनुदानावर मदार कल्याण : चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

ठाणे : डोंबिवली आणि ठाकुर्ली या दोन स्थानकांदरम्यान सिग्नल यंत्रणेत झालेल्या बिघाडामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य

विकासकामांना वेग; डोंबिवलीत वाहतुकीच्या मार्गांमध्ये बदल; जाणून घ्या हे पर्यायी मार्ग

मुंबई : डोंबिवली शहरातील काही भागात सुरू असलेल्या रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामामुळे वाहतुकीत बदल करण्यात आले

ठाण्यात पुलाच्या कामामुळे वाहतुकीत बदल; ३० एप्रिलपर्यंत काही मार्गांवर निर्बंध, जाणून घ्या हे पर्यायी मार्ग

ठाणे : ठाणे शहराचा कायापालट केला जात आहे. त्यासाठी अनेक पुलांचे डागडुजीचे काम चालू आहे. त्यामुळे ठाणेकरांना