एनएमएमटी बस कर्जत पूर्वेकडून सुटण्यास सुरुवात

शहरातील प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार


विजय मांडे
कर्जत : कर्जत पूर्वेकडील प्रवाशांसाठी आात बसची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. शहरातून एनएमएमटी बस पूर्वेकडून सुटण्यास प्रारंभ झाला असून आता पूर्वेकडील प्रवाशांनाही पूर्वेकडून पश्चिमेकडचा प्रवास सुखकर होणार आहे.


नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन विभागाने कर्जतच्या प्रवशांसाठी बसची सुविधा सुरू केली. या बस कर्जतच्या पश्चिम भागातून सुटत असल्याने प्रवाशांना अडचणीचे ठरत होते. याबाबत किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे यांनी नवी मुंबई महापालिकेकडे पाठपुरावा केला. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले आणि आज पासून या बस पूर्वेकडून अग्निशमन केंद्रापासून सुटण्यास सुरुवात झाली.


सकाळी १० वाजता या बस पूर्वेकडून सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. याचा शुभारंभ सोहळा कर्जत येथील अग्निशमन केंद्रा जवळ करण्यात आला होता. बस सोडण्याचा शुभारंभ किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे यांनी हिरवा झेंडा दाखवून केला. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष राजेश लाड, नवी मुंबई परिवहनचे मुख्य वाहतूक अधिकारी सुनील साळुंखे, मुख्य नियोजन अधिकारी उमाकांत जंगले, सहाय्यक वाहतूक अधीक्षक धर्मराज भगत, श्रमिक सेना युनियन सरचिटणीस चरण जाधव, वाहतूक निरीक्षक बळीराम झुगरे, भानुदास पाटील, सहाय्यक वाहतूक निरीक्षक बजरंग परदेशी, अरविंद केदार, रमेश मुंढे, विजय बेडेकर, राजीव देशपांडे, शंकर थोरवे, मिनेश मसणे, कल्पना दास्ताने, शर्वरी कांबळे, स्मिता औरंगाबादकर, आदी उपस्थित होते. रमाकांत जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले.


यावेळी बोलताना सुनील गोगटे यांनी, 'आता प्रवाशांची गैरसोय खऱ्या अर्थाने दूर झाली असून, कर्जतकरांना चांगली सुविधा उपलब्ध झाल्याचे स्पष्ट केले. नवी मुंबई परिवहन विभागाने अवघ्या पंधरा दिवसांत मागणी मान्य करूनही सुविधा प्रत्यक्षात आणली, असे स्पष्ट केले. कोरोना काळात ही सुविधा सुरु करण्यात आली. मात्र आता कर्जत शहरातील व परिसरातील प्रवाशांची चांगली सोय होऊन वेळ व पैसाही वाचणार असल्याचे सांगितले.

Comments
Add Comment

Nitesh Rane : रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांच्या समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करा

मुंबई,  : रायगड जिल्ह्यातील आरसीएफ कंपनीच्या मरीन आउटफॉल लाईनमुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक

Ashish Shelar : रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी समन्वित कृती आराखडा तयार करून कामांना गती द्या

मुंबई,: रायगड किल्ल्याच्या संवर्धन व विकासासाठी राज्य शासनाकडून निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही.

Raigad Accident : रत्नागिरीत जयगड जेसडब्ल्यू पोर्टवर ४५ मीटर उंचीवरून कोसळून कामगाराचा मृत्यू

रत्नागिरी : जयगड येथील जेएसडब्ल्यू पोर्टवर काम करणाऱ्या एका ३७ वर्षीय कामगाराचा ४५ मीटर उंचीवरून खाली पडून

Raigad Crime : पत्नी व दोन मुलींच्या मृत्यूप्रकरणी पतीला अटक; माणगाव पोलिसांची कारवाई

रायगड : माणगाव तालुक्यातील खरवली आदिवासीवाडी येथे घडलेल्या धक्कादायक कौटुंबिक दुर्दैवी घटनेप्रकरणी माणगाव

Raigad Accident : जेएनपीटी परिसरात भीषण स्फोट; दोन कामगारांचा मृत्यू

रायगड : जेएनपीटी परिसरातील जेएसडब्ल्यू ऑइल जेट्टीवर रविवारी सकाळी झालेल्या भीषण स्फोटात दोन कामगारांचा

Raigad News: आईने चार मुलांना विषारी थंडपेय पाजून स्वतःही केले विषप्राशन; तिघांचा मृत्यू, दोन मुलांची प्रकृती गंभीर

रायगड : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण