एनएमएमटी बस कर्जत पूर्वेकडून सुटण्यास सुरुवात

शहरातील प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार


विजय मांडे
कर्जत : कर्जत पूर्वेकडील प्रवाशांसाठी आात बसची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. शहरातून एनएमएमटी बस पूर्वेकडून सुटण्यास प्रारंभ झाला असून आता पूर्वेकडील प्रवाशांनाही पूर्वेकडून पश्चिमेकडचा प्रवास सुखकर होणार आहे.


नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन विभागाने कर्जतच्या प्रवशांसाठी बसची सुविधा सुरू केली. या बस कर्जतच्या पश्चिम भागातून सुटत असल्याने प्रवाशांना अडचणीचे ठरत होते. याबाबत किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे यांनी नवी मुंबई महापालिकेकडे पाठपुरावा केला. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले आणि आज पासून या बस पूर्वेकडून अग्निशमन केंद्रापासून सुटण्यास सुरुवात झाली.


सकाळी १० वाजता या बस पूर्वेकडून सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. याचा शुभारंभ सोहळा कर्जत येथील अग्निशमन केंद्रा जवळ करण्यात आला होता. बस सोडण्याचा शुभारंभ किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे यांनी हिरवा झेंडा दाखवून केला. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष राजेश लाड, नवी मुंबई परिवहनचे मुख्य वाहतूक अधिकारी सुनील साळुंखे, मुख्य नियोजन अधिकारी उमाकांत जंगले, सहाय्यक वाहतूक अधीक्षक धर्मराज भगत, श्रमिक सेना युनियन सरचिटणीस चरण जाधव, वाहतूक निरीक्षक बळीराम झुगरे, भानुदास पाटील, सहाय्यक वाहतूक निरीक्षक बजरंग परदेशी, अरविंद केदार, रमेश मुंढे, विजय बेडेकर, राजीव देशपांडे, शंकर थोरवे, मिनेश मसणे, कल्पना दास्ताने, शर्वरी कांबळे, स्मिता औरंगाबादकर, आदी उपस्थित होते. रमाकांत जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले.


यावेळी बोलताना सुनील गोगटे यांनी, 'आता प्रवाशांची गैरसोय खऱ्या अर्थाने दूर झाली असून, कर्जतकरांना चांगली सुविधा उपलब्ध झाल्याचे स्पष्ट केले. नवी मुंबई परिवहन विभागाने अवघ्या पंधरा दिवसांत मागणी मान्य करूनही सुविधा प्रत्यक्षात आणली, असे स्पष्ट केले. कोरोना काळात ही सुविधा सुरु करण्यात आली. मात्र आता कर्जत शहरातील व परिसरातील प्रवाशांची चांगली सोय होऊन वेळ व पैसाही वाचणार असल्याचे सांगितले.

Comments
Add Comment

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन या दिवशी होणार पहिले उड्डाण ?

पनेवल : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० सप्टेंबर २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. यानंतर

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता

विजयाने पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जल्लोष गौसखान पठाण सुधागड-पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली

रस्त्यावर खड्डेच खड्डे, मग पोलिसांनी असं काही केलं की...

रायगड : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पनवेलजवळील पळस्पे फाटा परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय करत

कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी फेऱ्या बंद

खेडोपाड्यातील प्रवाशांचे प्रचंड हाल महाड : गणेशोत्सव संपताच कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून,

मध्यरात्री CNG दरवाढीनंतर पंप अर्धा तास बंद, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रायगड : मध्यरात्री अचानक सीएनजी दरवाढीचा फटका बसल्याने रायगड जिल्ह्यासह मुंबई–गोवा महामार्गावरील विविध सीएनजी

पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना नवी मुंबईत प्रवेश बंदी

पनवेल (वार्ताहर):मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईकडे जाणारे सगळेच महामार्ग