एनएमएमटी बस कर्जत पूर्वेकडून सुटण्यास सुरुवात

शहरातील प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार


विजय मांडे
कर्जत : कर्जत पूर्वेकडील प्रवाशांसाठी आात बसची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. शहरातून एनएमएमटी बस पूर्वेकडून सुटण्यास प्रारंभ झाला असून आता पूर्वेकडील प्रवाशांनाही पूर्वेकडून पश्चिमेकडचा प्रवास सुखकर होणार आहे.


नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन विभागाने कर्जतच्या प्रवशांसाठी बसची सुविधा सुरू केली. या बस कर्जतच्या पश्चिम भागातून सुटत असल्याने प्रवाशांना अडचणीचे ठरत होते. याबाबत किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे यांनी नवी मुंबई महापालिकेकडे पाठपुरावा केला. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले आणि आज पासून या बस पूर्वेकडून अग्निशमन केंद्रापासून सुटण्यास सुरुवात झाली.


सकाळी १० वाजता या बस पूर्वेकडून सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. याचा शुभारंभ सोहळा कर्जत येथील अग्निशमन केंद्रा जवळ करण्यात आला होता. बस सोडण्याचा शुभारंभ किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे यांनी हिरवा झेंडा दाखवून केला. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष राजेश लाड, नवी मुंबई परिवहनचे मुख्य वाहतूक अधिकारी सुनील साळुंखे, मुख्य नियोजन अधिकारी उमाकांत जंगले, सहाय्यक वाहतूक अधीक्षक धर्मराज भगत, श्रमिक सेना युनियन सरचिटणीस चरण जाधव, वाहतूक निरीक्षक बळीराम झुगरे, भानुदास पाटील, सहाय्यक वाहतूक निरीक्षक बजरंग परदेशी, अरविंद केदार, रमेश मुंढे, विजय बेडेकर, राजीव देशपांडे, शंकर थोरवे, मिनेश मसणे, कल्पना दास्ताने, शर्वरी कांबळे, स्मिता औरंगाबादकर, आदी उपस्थित होते. रमाकांत जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले.


यावेळी बोलताना सुनील गोगटे यांनी, 'आता प्रवाशांची गैरसोय खऱ्या अर्थाने दूर झाली असून, कर्जतकरांना चांगली सुविधा उपलब्ध झाल्याचे स्पष्ट केले. नवी मुंबई परिवहन विभागाने अवघ्या पंधरा दिवसांत मागणी मान्य करूनही सुविधा प्रत्यक्षात आणली, असे स्पष्ट केले. कोरोना काळात ही सुविधा सुरु करण्यात आली. मात्र आता कर्जत शहरातील व परिसरातील प्रवाशांची चांगली सोय होऊन वेळ व पैसाही वाचणार असल्याचे सांगितले.

Comments
Add Comment

पनवेल–कळंबोली दरम्यान पॉवर ब्लॉक

पनवेल : डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन (डीएफसीसी) प्रकल्पाच्या अनुषंगाने, किमी ६३/१८ ते ६३/२४ दरम्यान ११०

जिल्ह्यातील १८१ आदिवासी वाड्या रस्त्याविना

अलिबाग : आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहासोबत आणण्याचा आणि त्यांचा सर्वांगीण विकास घडवून यावा, या उद्देशाने

अवचित गडाचा मार्ग आता होणार सुखकर

खारापटीतील तरुणांनी केली रस्ता दुरुस्ती रोहा : ऐतिहासिक वारसा असलेल्या अवचित गडावर जाणाऱ्या रस्त्याची

लोकअदालतीतून वर्षभरात १९ संसारांचे पुनर्मिलन

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे समुपदेशन; तुटणाऱ्या नात्यांना नवसंजीवनी अलिबाग: बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव,

रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा आधारवड

८ महिन्यांत ६० रुग्णांना मिळाली मदत अलिबाग:रायगड जिल्ह्यातील गरीब, गरजू रुग्णांसाठी जिल्हास्तरीय मुख्यमंत्री

वर्षभरात ६२७ अपघातात २५८ जणांचा मृत्यू

रस्ते बनलेत मृत्यूचा सापळा; अपघातांना कारणीभूत धोकादायक वळणे, रस्त्यांची दुरवस्था वाहनांची वाढलेली वर्दळ,