Monsoon Disease: मुंबईकरांनो सावधान! शहरात ‘या’ ३ रोगांचा कहर

मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनियाचे रुग्णसंख्या वाढल्याने महानगरपालिका सतर्क


मुंबई:  शहरात गेली अनेक दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे साथीच्या आजारांनी देखील डोकं वर काढलं आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनियासारख्या साथीच्या आजाराचे रुग्ण झपाट्याने वाढत चालले आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेचे आरोग्य विभाग सतर्क झाले आहेत. शिवाय, नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असा इशारा पालिकेकडून देण्यात आला आहे.


पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचल्याने मच्छरवाढीस अनुकूल वातावरण तयार झाले आहे, हेच या साथीमागील मुख्य कारण मानले जात आहे.


मुंबई महानगरपालिकेने नागरिकांसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. यामध्ये घरात आणि आजूबाजूला साचलेलं पाणी हटवणं, मच्छरदाणीचा वापर, उकळलेलं पाणी पिणं, रस्त्यावरील अन्नपदार्थ टाळणं आणि ताप आल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घेणं अशा बाबींचा समावेश आहे.



मागील वर्षाच्या तुलनेत यंदा साथीच्या आजाराचे प्रकरण दुप्पटीने वाढले


मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य अहवालानुसार, यावर्षी मलेरियाचे रुग्ण ४,१५१ पर्यंत पोहोचले आहेत, जे मागील वर्षी याच कालावधीत २,८५२ होते. डेंग्यूचे रुग्णदेखील ९६६ वरून १,१६० पर्यंत वाढले असून, फक्त जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यातच ४२६ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर कनगुनियाचे (Chikungunya Cases) प्रमाण देखील चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे. गेल्या वर्षी फक्त ४६ रुग्ण होते, मात्र यावर्षी २६५ रुग्णांची नोंद झाली आहे. यातील ८६ रुग्ण फक्त मागील पंधरवड्यात आढळले आहेत.


याशिवाय, हॅपेटायटीस ए आणि ई या आजारांचं प्रमाण देखील वाढले आहे. जानेवारी ते जुलै २०२५ या कालावधीत हॅपेटायटीसचे ६१३ रुग्ण आढळले आहेत. लेप्टोस्पायरोसिस आणि गॅस्ट्रोएन्टेरिटिसचे प्रमाण काहीसे कमी झाले असले, तरी नागरिकांनी काळजी घेणे अत्यावश्यक आहे.



महानगरपालिकेकडून आरोग्यविषयक सूचना आणि ‘आपली चिकित्सा योजना’


महानगरपालिकेने ‘आपली चिकित्सा योजना’ पुन्हा सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सामान्य रक्त तपासणी, लघवी तपासणी, ताप व संसर्गजन्य आजारांवरील चाचण्या कमी किमतीत उपलब्ध आहेत. तपासणीचे निकाल व्हॉट्सॲपवरही उपलब्ध होतील, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.



 
Comments
Add Comment

BMC : मुंबई महानगरपालिका मुख्यलयात मंत्रालयाच्या धर्तीवर प्रवेश

मुंबई  : मुंबई महापालिका मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा महापालिका

BMC मुख्यालय उडवून देण्याची धमकी, महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ

महापािलका मुख्यालय उडवून देण्याची धमकी ; महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ अशा धमक्यांना मी मुळीच घाबरत नाही-

अवकाळी पावसाने बाधित फळपिकांचे पंचनामे पूर्ण करा, कृषिमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : 'राज्यात मे आणि जून २०२६ या कालावधीत अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या

Verification of Street Vendors : मुंबईत २० हजार फेरीवाल्यांची पडताळणी पूर्ण

येत्या २६ जून पर्यंत पडताळणी न झालेल्यांना मिळणार नाही क्यू आर कोड ओळखपत्र मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : उच्‍च

Devendra Fadnavis : समर्थ भारत ते विकसित भारत’ पंतप्रधान मोदींमुळेच शक्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र राज्याच्या वतीने पत्र लिहून केले अभिनंदन मुंबई : देशाच्या इतिहासात

Panvel-Karjat Corridor : रेल्वेला नवी लाइफलाइन! लवकरच धावणार उपनगरी रेल्वे; पनवेल-कर्जत कॉरिडॉरचे ९८ टक्के काम पूर्ण

MUMBAI : मुंबई उपनगरी रेल्वे नेटवर्कसाठी महत्त्वाचा ठरणारा बहुप्रतीक्षित पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉर आता