Monsoon Disease: मुंबईकरांनो सावधान! शहरात ‘या’ ३ रोगांचा कहर

मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनियाचे रुग्णसंख्या वाढल्याने महानगरपालिका सतर्क


मुंबई:  शहरात गेली अनेक दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे साथीच्या आजारांनी देखील डोकं वर काढलं आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनियासारख्या साथीच्या आजाराचे रुग्ण झपाट्याने वाढत चालले आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेचे आरोग्य विभाग सतर्क झाले आहेत. शिवाय, नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असा इशारा पालिकेकडून देण्यात आला आहे.


पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचल्याने मच्छरवाढीस अनुकूल वातावरण तयार झाले आहे, हेच या साथीमागील मुख्य कारण मानले जात आहे.


मुंबई महानगरपालिकेने नागरिकांसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. यामध्ये घरात आणि आजूबाजूला साचलेलं पाणी हटवणं, मच्छरदाणीचा वापर, उकळलेलं पाणी पिणं, रस्त्यावरील अन्नपदार्थ टाळणं आणि ताप आल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घेणं अशा बाबींचा समावेश आहे.



मागील वर्षाच्या तुलनेत यंदा साथीच्या आजाराचे प्रकरण दुप्पटीने वाढले


मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य अहवालानुसार, यावर्षी मलेरियाचे रुग्ण ४,१५१ पर्यंत पोहोचले आहेत, जे मागील वर्षी याच कालावधीत २,८५२ होते. डेंग्यूचे रुग्णदेखील ९६६ वरून १,१६० पर्यंत वाढले असून, फक्त जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यातच ४२६ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर कनगुनियाचे (Chikungunya Cases) प्रमाण देखील चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे. गेल्या वर्षी फक्त ४६ रुग्ण होते, मात्र यावर्षी २६५ रुग्णांची नोंद झाली आहे. यातील ८६ रुग्ण फक्त मागील पंधरवड्यात आढळले आहेत.


याशिवाय, हॅपेटायटीस ए आणि ई या आजारांचं प्रमाण देखील वाढले आहे. जानेवारी ते जुलै २०२५ या कालावधीत हॅपेटायटीसचे ६१३ रुग्ण आढळले आहेत. लेप्टोस्पायरोसिस आणि गॅस्ट्रोएन्टेरिटिसचे प्रमाण काहीसे कमी झाले असले, तरी नागरिकांनी काळजी घेणे अत्यावश्यक आहे.



महानगरपालिकेकडून आरोग्यविषयक सूचना आणि ‘आपली चिकित्सा योजना’


महानगरपालिकेने ‘आपली चिकित्सा योजना’ पुन्हा सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सामान्य रक्त तपासणी, लघवी तपासणी, ताप व संसर्गजन्य आजारांवरील चाचण्या कमी किमतीत उपलब्ध आहेत. तपासणीचे निकाल व्हॉट्सॲपवरही उपलब्ध होतील, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.



 
Comments
Add Comment

व्हॉट्अ‍ॅपवर नंबर नाही; आता दिसेल ‘युजरनेम’

मुंबई (प्रतिनिधी) : प्रायव्हसीची (गोपनीयतेची) काळजी घेणाऱ्यांसाठी एक मोठी आणि चांगली बातमी आहे. लवकरच व्हॉट्अ‍ॅप

गुरुवारी राज्यातील ओला, उबर सेवा बंद

कॅब-रिक्षाचालक जाणार संपावर मुंबई (प्रतिनिधी) : परिवहन विभागाच्या गलथान कारभाराकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी

तळोजा एमआयडीसीचा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद

डोंबिवली : अंबरनाथ तालुक्यातील जांभुळ जलशुद्धीकरण केंद्र आणि बारवी गुरूत्व वाहिनी देखभाल दुरुस्तीची कामे

मुंबई ते नवी मुंबई विमानतळांदरम्यानचा प्रवास होणार जलद

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील सर्वात मोठी २ विनातळे एकमेकांना जोडली जाणार आहेत. मुंबई ते नवी मुंबई विमानतळापर्यंत

ऐरोली ते काटई नाका प्रकल्पाच्या कामाला आणखी सहा महिने लागणार

मुंबई (प्रतिनिधी) : कल्याण-डोंबिवली-नवी मुंबई भागातील प्रवास जलद होण्यासाठी आणखी सहा महिने जाणार आहेत. हे अंतर

मेट्रो ९ मार्गिका १५ डिसेंबर पर्यंत, मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा - सरनाईक

मुंबई : ठाणे आणि मीरा-भाईंदर क्षेत्रातील रहिवाशांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या मेट्रो ९ मार्गिका १५