ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र शासनातर्फे नागपुरातील सुरेश बाभट सभागृहात तिचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी दिव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ३ कोटी रुपयांच्या बक्षीसाचे धनादेश देऊन गौरवण्यात आले.


नागपूरकर असलेल्या दिव्याने ग्रॅन्डमास्टर होण्याचा मान पटकावत महाराष्ट्राची मान उंचावली आहे. तिच्या याच यशाची दखल घेऊन तिचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसोबत क्रीडामंत्री मानिकराव कोकाटे, ॲड. आशिष जयस्वाल, महाराष्ट्र बुद्धीबळ संघटनेचे अध्यक्ष परिणय फुके, तसेच अनेक आमदार व मोठे अधिकारी उपस्थित होते.



शासनाने खेळाडूंना मोठ्या प्रमाणावर रोख बक्षीस देणे सुरू केले


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासन आणि क्रीडा क्षेत्रावर काही मिनिटे भाष्य केले. ते म्हणाले, "महाराष्ट्र शासन क्रीडा क्षेत्राला महत्व देत असल्याने देश पातळीवरील स्पर्धेत महाराष्ट्राचा क्रमांक आता वरचाच राहतो. शासनाकडून आता खेळाडूंना चांगले फिजिओथेरपीस्ट, न्यूट्रेशियनिस्ट, देशी- विदेशी प्रशिक्षकांसह इतरही सोय देण्याचे प्रयत्न आहे. पूर्वी आंतराष्ट्रीय स्पर्धेत खेळायला जाणाऱ्या खेळाडूंसोबत प्रशिक्षकालाही जायची परवानगी नव्हती. तेथे खेळाडू महत्वाचा असतोच. परंतु त्याच्यासोबत प्रसिक्षकासह इतरही सोयी महत्वाच्या असतात. इतर देशातील खेळाडूकडे या सगळ्या सोयी राहत असल्याने आपल्या खेळाडूला अडचणी यायच्या. त्यामुळे शासनाने सर्व नियम बदलले. सोबत शासनाने खेळाडूंना आता मोठ्या प्रमाणावर रोख बक्षीसही देणे सुरू केले.'



होतकरू खेळाडू आता पैशाच्या कमीमुळे खेळापासून वंचित राहणार नाही


प्रत्यक्षात खेळाडूला विविध ठिकाणी स्पर्धेत सहभागी व्हायला गेल्यावर पैसा लागतो. कुटुंबाचीही मुलांवर खर्चाची मर्यादा असते. त्यामुळे पैसे नसलेल्या खेळाडूपुढे अडचणी यायच्या. काही स्पर्धेलाही मुकायचे. शासनाने ही अडचण दूर करण्यासाठी रोख स्वरूपातील बक्षीस वाढवले. त्यामुळे होतकरू खेळाडू आता पैशाच्या कमीमुळे खेळापासून वंचित राहणार नाही. दरम्यान दिव्या देशमुखला मागच्या स्पर्धेतील विजेतेपनानंतर शासनाने १ कोटी रुपयांचे बक्षिस दिले होते. आता ३ कोटी रुपयांचा धनादेश दिला आहे. हा धनादेश नकली दिसत असल्याने आता तो वठणार काय?, हे पैसे केव्हा मिळणार? हा प्रस्न अनेकांच्या मनात उपस्थित राहिल. परंतु प्रत्यक्षात उधारी नाही तर दिव्याच्या खात्यात शासनाने एक दिवसापूर्वी शुक्रवारीच आर. टी. जी. एस.च्या माध्यमातून ३ कोटी रुपये वळवले असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान दिव्या देशमुखनेही सत्काराबाबत महाराष्ट्र शासनासह नागपूरकरांचे आभार मानले.

Comments
Add Comment

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना

रायपूरमध्ये होणार भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना

रायपूर: दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा रांचीतील पहिला सामना जिंकून भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेची दमदार सुरुवात

Vaibhav Suryawanshi : '७ षटकार, ७ चौकार'! वैभव सूर्यवंशीने महाराष्ट्राच्या गोलंदाजीचे मोडले कंबरडे, केली नाबाद १०८ धावांची वादळी खेळी!

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२५ (Syed Mushtaq Ali Trophy Elite 2025) मध्ये सातत्याने अपेक्षेपेक्षा कमी कामगिरी केल्यामुळे युवा फलंदाज

एकदिवसीय मालिकेत भारताची विजयी सुरुवात! केएलने केले रोहीत आणि विराटच्या जोडीचे कौतुक

मुंबई: केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारताने पहिला वनडे सामना जिंकला. पण हा सामना संपल्यावर रोहित शर्मा आणि विराट

Ind beat Sa 1st ODI : थरार शेवटच्या षटकापर्यंत! रांची वनडेत टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेवर १७ धावांनी विजय; विराटचे शतक, कुलदीपचा भेदक मारा

रांची : भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील (ODI Series) पहिला रोमांचक सामना