India Post Payments बँकेकडून मोठी बातमी आता डिजिटल बँकिंगसाठी फिंगरप्रिंटची गरजच नाही!

प्रतिनिधी: इंडिया पोस्ट पेमेंट बँक (India Payments Bank) आपल्या ग्राहकांसाठी मोठे पाऊल उचलले आहे. आता ग्राहकांना आपल्या मोबाईलमधून डिजिटल बँकिंग व्यवहार करताना फिंगरप्रिंट अथवा बायोमेट्रिकची गरज लागणार नाही ते केवळ फेसव्हे रिफिकेशन (Face Authentication) आधारे पैसे ट्रान्स्फर करू शकतील. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी व्यवहार सोपा, सरळ, सुटसुटीत तसेच सुरक्षित होणार आहे. त्यामुळे हे मोठे पाऊल पोस्ट पेमेंट बँक (Post Payments Bank) उचलल्याचे म्हटले जाते.


सर्वाधिक फायदा दिव्यांग, वयस्कर ज्येष्ठ नागरिक यांना होणार असल्याचे बँकेने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.या उपक्रमाविषयी बोलताना,'आयपीपीबीमध्ये, आमचा असा विश्वास आहे की बँकिंग केवळ सुलभ नसून सन्माननीय देखील असले पाहिजे.आधा र आधारित फेस ऑथेंटिकेशनसह, आम्ही बायोमेट्रिक फिंगरप्रिंट्स किंवा ओटीपी पडताळणीच्या मर्यादांमुळे कोणताही ग्राहक मागे राहणार नाही याची खात्री करत आहोत. मोठ्या प्रमाणात आर्थिक समावेशनाची पुनर्व्याख्या करण्याच्या दिशेने हे एक पाऊल आ हे' असे आयपीपीबीचे कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आर विश्वेश्वरन म्हणाले आहेत.


हे ओटीपी किंवा फिंगरप्रिंट सेन्सरवर अवलंबून न राहता आधार प्रमाणीकरण सुरक्षित करेल तसेच आरोग्य आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षित बँकिंग सक्षम करेल, जिथे शारीरिक संपर्क धोकादायक असू शकतो, असेही निवेदनात पुढे म्हटले आहे.

Comments
Add Comment

महाशिवरात्रीनिमित्त भाविकांसाठी प्रशासनाकडून जादा बसेसची सोय? बस कुठून कुठे धावणार जाणून घ्या..

पुणे : महाशिवरात्रीनिमित्त पुणे महानगर परिवहन मंडळाकडून भाविकांसाठी विशेष जादा बसेसची सोय ही कऱण्यात आली आहे.

Assam Emergency Landing Highway: पंतप्रधान मोदींच्या हस्ते देशातील पहिल्या विशेष 'इमर्जन्शी लँडिंग' सुविधेची सुरुवात

आसाम: यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आसाममध्ये राजकारण तापले आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार

Maharashtra Congress: स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दारुण पराभवानंतर काँग्रेसला जाग; संघटनात्मक बदल करणार

राज्यभरातील ३६ जिल्हाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत

मुक्त जागतिक व्यापार करारात भारताच्या हिताशी कोणतीही तडजोड नाही! केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयुष गोयल यांची ग्वाही

मुंबई : आत्मनिर्भर भारताच्या संकल्पपूर्तीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देश आज प्रचंड,

Ambulance Network: महाराष्ट्रात ‘अॅम्बुलन्स’चे जाळे मजबूत होणार; १०० कोटींचा अतिरिक्त निधी

अत्याधुनिक उपकरणांसह रुग्णसेवेचा वेग वाढणार मुंबई : आपत्कालीन वैद्यकीय सेवेचा प्रतिसाद अधिक जलद, अचूक आणि

Startup India FoF 2.0 : मोदी सरकारचा 'मास्टरस्ट्रोक'! स्टार्टअप्ससाठी १०,००० कोटींचा 'फंड ऑफ फंड्स २.०' मंजूर; टर्नओव्हरची मर्यादाही वाढवली

नवी दिल्ली : भारतीय स्टार्टअप्सना जागतिक स्तरावर नेण्यासाठी आणि स्वदेशी गुंतवणुकीला बळ देण्यासाठी केंद्र