India Post Payments बँकेकडून मोठी बातमी आता डिजिटल बँकिंगसाठी फिंगरप्रिंटची गरजच नाही!

प्रतिनिधी: इंडिया पोस्ट पेमेंट बँक (India Payments Bank) आपल्या ग्राहकांसाठी मोठे पाऊल उचलले आहे. आता ग्राहकांना आपल्या मोबाईलमधून डिजिटल बँकिंग व्यवहार करताना फिंगरप्रिंट अथवा बायोमेट्रिकची गरज लागणार नाही ते केवळ फेसव्हे रिफिकेशन (Face Authentication) आधारे पैसे ट्रान्स्फर करू शकतील. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी व्यवहार सोपा, सरळ, सुटसुटीत तसेच सुरक्षित होणार आहे. त्यामुळे हे मोठे पाऊल पोस्ट पेमेंट बँक (Post Payments Bank) उचलल्याचे म्हटले जाते.


सर्वाधिक फायदा दिव्यांग, वयस्कर ज्येष्ठ नागरिक यांना होणार असल्याचे बँकेने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.या उपक्रमाविषयी बोलताना,'आयपीपीबीमध्ये, आमचा असा विश्वास आहे की बँकिंग केवळ सुलभ नसून सन्माननीय देखील असले पाहिजे.आधा र आधारित फेस ऑथेंटिकेशनसह, आम्ही बायोमेट्रिक फिंगरप्रिंट्स किंवा ओटीपी पडताळणीच्या मर्यादांमुळे कोणताही ग्राहक मागे राहणार नाही याची खात्री करत आहोत. मोठ्या प्रमाणात आर्थिक समावेशनाची पुनर्व्याख्या करण्याच्या दिशेने हे एक पाऊल आ हे' असे आयपीपीबीचे कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आर विश्वेश्वरन म्हणाले आहेत.


हे ओटीपी किंवा फिंगरप्रिंट सेन्सरवर अवलंबून न राहता आधार प्रमाणीकरण सुरक्षित करेल तसेच आरोग्य आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षित बँकिंग सक्षम करेल, जिथे शारीरिक संपर्क धोकादायक असू शकतो, असेही निवेदनात पुढे म्हटले आहे.

Comments
Add Comment

उपराष्ट्रपती निवडणुकीत सी. पी. राधाकृष्णन यांचा दणदणीत विजय; विरोधकांची मते फुटली?

नवी दिल्ली: भारताला नवे उपराष्ट्रपती म्हणून सी. पी. राधाकृष्णन मिळाले आहेत. उपराष्ट्रपती निवडणुकीत एनडीएचे

शिक्षक भरतीवेळी महाविद्यालयाच्या आवारात दिसले महाकाय अजगर

अलवर : राजस्थानमधील अलवर येथे अनुदानीत वाणिज्य महाविद्यालयात वरिष्ठ शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होती. ही

नेपाळच्या कम्युनिस्ट सरकारचा पाडाव; रस्त्यावर आली तरुणाई, कम्युनिस्ट सरकारला खेचले खाली

काठमांडू : आधी सोशल मीडिया बंदी विरोधात रस्त्यावर आलेल्या तरुणाईने नंतर भ्रष्टाचाऱ्यांच्या विरोधात हिंसक

सियाचीनमध्ये भीषण हिमस्खलन : तीन भारतीय जवान शहीद !

नवी दिल्ली : लडाखमधील सियाचीन बेस कॅम्पवर झालेल्या हिमस्खलनात तीन भारतीय लष्करी जवान शाहिद झाले आहेत . बचाव

‘नमो शेतकरी योजने’चा सातवा हप्ता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरित

मुंबई : "शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘नमो शेतकरी महासन्मान किसान योजने’चा सातवा

नेपाळच्या पंतप्रधानांचा राजीनामा, दुबईला पळून जाण्याची शक्यता

काठमांडू : भारताचा शेजारी असलेल्या नेपाळमध्ये भ्रष्टाचाराविरोधात तरुणाईने हिंसक आंदोलन सुरू केले आहे. याआधी