Anil Ambani: अनिल अंबानी यांच्याविरोधात 'लूक आऊट' नोटीस

परवानगी शिवाय देश सोडण्यास मनाई

प्रतिनिधी: अनिल अंबानी यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate ED) लूक आऊट नोटीस काढली आहे. त्यांना देशाबाहेर पळून जाऊ नये म्हणून खबर दारी घेतली जाणार असून देशाबाहेर विना परवानगी जाण्यास म ज्जाव केला आहे. देशातील विमानतळ व ट्रान्सिटच्या जागांवर विशेष 'नाकेबंदी' करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना देशाबाहेर जा ण्याचे मार्ग रोखण्यात आल्याचे सूत्रांनी प्रसारमाध्यमांना म्हटले आहे. या घटनेनंतर रिलायन्सचे अनिल अंबानी यांच्या अडचणी वाढ ल्या आहेत. इतकेच नाही तर अनिल अंबानी यांना ५ तारखेला ईडीने १७००० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावले आहे.

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरकडून काल खुलासा करत ईडीने टाकलेल्या छाप्यानंतर त्याचा कुठलाही परिणाम आपल्या दैनंदिन कामकाजावर अथवा कंपनीवर पडणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. संबंधित प्रकरणात १०००० कोटी फंडाची दुसरीकडेच वळ वणी झाल्याचा आरोप जुना घेतलेल्या कर्जासंबधित असून नव्या येस बँकेच्या कर्ज प्रकाराशी संबंधित त्याचा नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले होते तसेच ६५०० कोटींच्या कर्जासाठी १०००० कोटी वळवले असल्याचा दावा खोटा असल्याचं सांगितले. ही बातमी केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी केला असल्याचा दावा रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने केला होता.

मागील आठवड्यातच अंबानी यांच्या कंपनीशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीने धाडी टाकल्या होत्या. ३० ऑगस्टलाही कंपनीशी संबंधित व्यक्तींच्या ठिकाणावर छापेमारी करण्यात आली होती. त्याचा च परिपाक म्हणून आता येस बँक प्रकरणासह स्टेट बँककडून घे तलेल्या कर्जासंबधित ही एकत्र कारवाई ईडीकडून केली जात आहे. एसबीआयने अनिल अंबानी यांच्यावर 'Fraud' हा शिक्का आ पल्या कागदपत्रात मारला होता असे स्वतः रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने एक्सचेंजला कळवले होते. त्यानंतर मोठ्या गदारोळानंतर अनि ल अंबानी हे प्राधिकरणाकडे दाद मागण्यास गेले जिथे त्यांनी आ पल्याला आपले म्हणणे मांडण्याचा पुरेसा वेळ दिला गेला नाही असे स्पष्ट केले. त्या युक्तिवादानंतर एसबीआयने हा शब्द हटवला. दरम्यान कथित प्रकरण एसबीआयकडून घेतलेले कर्ज वेगळ्या का रणासाठी वापरल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. एसबीआय प्रकरणातही ३००० कोटींचे कर्ज आपल्या हातचालाखीने भलतीकडेच वळवण्यात आल्याचा आरोप नियामक मंडळा ने केला आहे. २०१७ ते २०१९ या कालावधीत ही रक्कम बोगस शेल कंपनीच्या नावावर वळवण्यात आली असा ठपका अंबानींवर आहे.

या प्रकरणात येस बँकेच्या काही अधिकारी वर्गाला कर्ज मंजूर करण्यासाठी 'लाभ' झाल्याचा ठपकाही ठेवण्यात आला. त्यामुळे याविषयीही चौकशी सुरू आहे. तसेच येस बँक व एसबीआय प्रकर णात ' मनी लॉन्ड्रिंग' अंतर्गत अनिल अंबानीची चौकशी होणारआहे. त्यामुळे एकूणच अंबानी यांच्या चौकशी विरोधात अडचणी वाढल्या आहेत.
Comments
Add Comment

Nagpur Crime : लॉजवर घेऊन गेला अन् 30 तास हात पाय बांधून नको ते केलं, नागपूर पोलिसांकडून आरोपीला अटक

नागपूर : नागपुरात (Nagpur) 16 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरण आणि गंभीर अत्याचाराच्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली

Jalgaon : जळगावकरांनो लक्ष द्या ! शिव कॉलनी पुलाच्या कामासाठी वाहतूक वळवणार; 'हे' असतील पर्यायी मार्ग

Jalgaon : जळगाव शहरातील शिव कॉलनीतील रेल्वे मार्गावरील समांतर पूल आणि भुयारी मार्गाच्या रखडलेल्या कामाला अखेर गती

Usha Nadkarni Emotional Story : वडिलांचा कोयत्याने हल्ला, आईने काढले घराबाहेर; पडद्यावर खडूस सासू, पण खऱ्या आयुष्यात... उषा नाडकर्णींची हादरवणारी कहाणी

मुंबई : टेलिव्हिजन विश्वातील अतिशय गाजलेली मालिका ‘पवित्र रिश्ता’ आणि त्यात 'खडूस सासू' म्हणून घराघरांत

State Government : आयुष्यमान भारत आणि जनआरोग्य योजनेतील गैरव्यवहारांप्रकरणी एसआयटी

 १५ हजार ४०७ उपचारांचे दावे संशयास्पद; महिनाभरात अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई : आयुष्मान भारत-पंतप्रधान

Multiple UPI Apps : एकाच मोबाईल नंबरवर चालणार २ किंवा त्याहून अधिक UPI! जाणून घ्या सोपी पद्धत आणि महत्त्वाचे नियम

मुंबई : आजच्या डिजिटल युगात जवळपास प्रत्येक व्यक्ती ऑनलाईन पेमेंटसाठी यूपीआय (UPI) चा वापर करत आहे. मात्र, अनेकदा

Footpath Encroachment : पदपथ अतिक्रमण मुक्तीच्या निर्देशानंतर, याच्या अंमलबजावणीसाठी आयुक्त थेट उतरल्या रस्त्यावर

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील (Mumbai) पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले व अतिक्रमणे तत्काळ हटवून पदपथ अडथळामुक्त