उपराष्ट्रपतीपदाबाबत निवडणूक आयोगाने केली मोठी घोषणा

नवी दिल्ली : जगदीप धनखड यांनी तब्येतीचे कारण देत उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला. यानंतर उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. धनखड यांनी २१ जुलै रोजी राजीनामा दिला. यानंतर निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तारखी जाहीर केली.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी उपराष्ट्रपती या पदासाठी ९ सप्टेंबर रोजी मतदान होणार असल्याचे सांगितले. याआधी ९ ऑगस्टच्या शनिवारपासून उपराष्ट्रपती या पदासाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची मुदत २१ ऑगस्ट रोजी संपणार आहे.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अधिसूचना गुरुवार ७ ऑगस्ट २०२५ रोजी प्रसिद्ध होणार आहे. उपराष्ट्रपती या पदासाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचा शेवटचा दिवस हा गुरुवार २१ ऑगस्ट २०२५ हा असेल. उमेदवारी अर्जांची छाननी शुक्रवार २२ ऑगस्ट २०२५ रोजी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस हा सोमवार २५ ऑगस्ट २०२५ हा असेल. आवश्यकता असल्यास मतदान मंगळवार ९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत होणार आहे. मतमोजणी आवश्यकता असल्यास मंगळवार ९ सप्टेंबर २०२५ रोजी मतदान पूर्ण झाल्यानंतर होणार आहे.



उपराष्ट्रपती या पदासाठी आवश्यक पात्रता

उमेदवार भारतीय नागरिक असणे आवश्यक
उमेदवाराचे वय किमान ३५ वर्षे असावे
उमेदवार राज्यसभा सदस्य होण्यास पात्र असावा
उमेदवाराने कोणत्याही राज्य किंवा केंद्र सरकारच्या अंतर्गत कोणतेही लाभाचे पद (जसे की सरकारी नोकरी) धारण करू नये.

उपराष्ट्रपती या पदासाठी कशी होते निवडणूक ?

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करतात. मतदान करणाऱ्यांमध्ये राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेल्या सदस्यांचाही समावेश असतो. गुप्त पद्धतीने मतदान होते. खासदार उमेदवारांना त्यांच्या प्राधान्यानुसार रँकिंग देतात. प्रथम पहिल्या पसंतीची मते मोजतात यातून विजयी उमेदवार निश्चित झाला नाही तर दुसऱ्या पसंतीची मते मोजली जातात. दुसऱ्या पसंतीची मते मोजूनही विजयी उमेदवार निश्चित झाला नाही तर तिसऱ्या पसंतीची मते मोजली जातात. ही प्रक्रिया विजयी उमेदवाराची घोषणा होईपर्यंत सुरू राहते. निवडणूक निकालाविषयी वाद झाल्यास निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येते. आयोगाने दिलेला निर्णय अमान्य असल्यास सर्वोच्च न्यायालय हा शेवटचा पर्याय उपलब्ध आहे.
Comments
Add Comment

Women’s Reservation Bill : काय आहे 'नारी शक्ती वंदन' कायदा ? जाणून घ्या महिला आरक्षणाचे संपूर्ण स्वरूप आणि फायदे

तीन प्रमुख घटनादुरुस्ती विधेयके सादर नवी दिल्ली : आज, १६ एप्रिल २०२६ रोजी, केंद्र सरकारने महिला आरक्षणाच्या

Nari Shakti Vandan : ही मोदींची गॅरंटी... महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींचे विरोधकांना भर सभागृहात खडेबोल

नवी दिल्ली : सध्या संसदेच्या विशेष अधिवेशनात 'नारी शक्ती वंदन अधिनियमा'वर (महिला आरक्षण विधेयक) ऐतिहासिक चर्चा

India France Relations : फ्रान्स हा भारताच्या सर्वात विश्वासू आणि मैत्रीपूर्ण भागीदारांपैकी एक - लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला

फ्रान्स हा भारताचा सर्वात विश्वासार्ह आणि मैत्रीपूर्ण भागीदारांपैकी एक आहे असे सांगत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला

CBSE Class 10 2026 : CBSE १० वी निकाल जाहीर! आता दुसऱ्या बोर्ड परीक्षेसाठी नोंदणी सुरू; जाणून घ्या महत्त्वाचे नियम आणि तारखा

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) २०२६ च्या इयत्ता १० वीच्या मुख्य परीक्षेचा निकाल बुधवारी

Amarnath Yatra 2026 : भाविकांसाठी आनंदाची बातमी! 'या' तारखेपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात; घरबसल्या नोंदणी प्रक्रियाही सुरू

श्रीनगर : देशातील सर्वात कठीण आणि तितकीच श्रद्धास्थान असलेली अमरनाथ यात्रा यंदा लवकरच सुरू होत आहे. हिमालयातील

'Jag Vikram' LPG Ship : होर्मुज तणावात दिलासा; ‘जग विक्रम’ एलपीजी जहाज सुरक्षित कांडला बंदरात दाखल

होर्मुज सामुद्रधुनीत सुरू असलेल्या अमेरिकेच्या नाकेबंदीच्या पार्श्वभूमीवर भारतीय एलपीजी जहाज ‘जग विक्रम’