माणिकराव कोकाटेंना कृषी मंत्री पदावरून हटवले, दत्ता भरणेंकडे कृषी खात्याचा पदभार

ऑनलाइन पत्ते खेळण्याचे प्रकरण माणिकराव कोकाटेंच्या अंगलट


मुंबई: महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल करण्यात आला आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले असून, आता त्यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. एका विधिमंडळ अधिवेशनादरम्यान ऑनलाइन रमी गेम खेळल्याच्या आरोपांनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. दत्ता भरणेंकडे कृषी खात्याचा पदभार सोपवण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत कोकाटे पांचा खातेबदल करण्याचा निर्णय घेण्यात आला.



रमी गेम प्रकरण आणि वाद


आमदार रोहित पवार यांनी कोकाटे यांचा एक व्हिडिओ सार्वजनिक केला होता, ज्यात ते विधिमंडळाच्या सत्रादरम्यान आपल्या मोबाइलवर ऑनलाइन रमी गेम खेळताना दिसत होते. या घटनेनंतर मोठा गदारोळ झाला आणि महाराष्ट्रातील शेतीच्या संकटातही मंत्र्यांच्या या असंवेदनशील कृत्याबद्दल विरोधी पक्ष नेत्यांनी तीव्र टीका केली.


या प्रकरणानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती, परंतु त्यांना केवळ ताकीद देऊन सोडून देण्यात आले होते. या घटनेमुळे आणि कोकाटे यांच्याशी संबंधित मागील काही वादांमुळे सरकारवर सतत टीका होत होती. या सततच्या टीकेमुळेच सरकारने कोकाटे यांच्याकडील महत्त्वाचे कृषी खाते काढून घेतले असून, त्यांना कमी महत्त्वाचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालय दिले असल्याचे मानले जात आहे.

Comments
Add Comment

Helpline : नेपाळच्या पुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या नातलगांसाठी हेल्पलाईन

मुंबई : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात बुधवारी सकाळी भोटे कोशी नदीला अचानक आलेल्या भीषण पुरामुळे किमान ५०० प्रवासी

FDA Inspections : अंगणवाडीतील खिचडी आणि शाळांमधील ‘मिड-डे मील’ची तपासणी होणार; अन्न व औषध प्रशासनाचे निर्देश

शासकीय आणि खासगी यंत्रणांवर कारवाईचा बडगा मुंबई : अन्न सुरक्षेच्या मुद्यावर राज्यभरात धडक मोहीम राबवणारे अन्न

SVKM : मुंबईत क्रीडा सुविधांना नवी दिशा, तीन ठिकाणी SVKM करणार विकास; जागेची मालकी सरकारचीच असल्याचे संस्थेचे स्पष्टीकरण

मुंबई : मुंबईतील क्रीडा पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी श्री विलेपार्ले केळवणी मंडळ (SVKM) शहरातील तीन ठिकाणी

Central Railway : लोकमान्य टिळक टर्मिनस-सूबेदारगंज विशेष ट्रेन आता 'अमृत भारत एक्सप्रेस' म्हणून नियमित सेवेत; प्रवाशांना मिळणार हाय-टेक सुविधा

मुंबई : सामान्य नागरिकांना उच्च-गुणवत्तेचे, आरामदायी आणि खिशाला पूर्णपणे परवडणारे प्रवासाचे पर्याय उपलब्ध करून

Tripartite agreement : राज्यातील २० लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत चष्मे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्रिपक्षीय करार

मुंबई : वाढत्या स्क्रीन टाईममुळे अनेक विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच डोळ्यांच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत.

Bhandup Incident : दहाव्या मजल्यावरून पडली अन् झाडात अडकली; भांडुपच्या घटनेचा VIDEO पाहून धक्का

मुंबई : मुंबईतील भांडुप परिसरातून एक धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. भांडुपमधील सनशाईन SRA इमारतीच्या