IND vs ENG : भारताच्या गोलंदाजांचा भेदक मारा, इंग्लंडचा पहिला डाव २४७ धावांवर संपुष्टात

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडच्या संघाचा टिकाव लागू शकलेला नाही. इंग्लंडचा पहिला डाव केवळ २४७ धावांवर संपुष्टात आला. इंग्लंडकडे केवळ २३ धावांची आघाडी आहे. मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी ४ बळी घेत इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडले. भारताच्या गोलंदाजांनी कमाल केली आहे. दुसऱ्या दिवशी लंचनंतर भारतीय गोलंदाजांनी पुनरागमन केले आणि इंग्लंडला एकामागोमाग एक झटके दिले.


सगळ्यात आधी प्रसिद्ध कृष्णाने जॅक क्राऊलीला पॅव्हेलियनला पाठवले. क्राऊलीने ५७ बॉलमध्ये ६४ धावा केल्या. त्यानंतर मोहम्मद सिराजने कर्णधार ओली पोपला, ज्यो रूट आणि जॅकब बेथेल या तिघांना एलबीडब्लू केले. बेथेल बाद झाल्यावेळेस इंग्लंडची धावसंख्या ५ बाद १९५ होती. यानंतर प्रसिद्ध कृष्णाने जेमी स्मिथ आणि जेमी ओवर्टनला एकाच षटकांत बाद केले.


हा सामना भारतीय संघासाठी करो वा मरोचा आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वातील भारतीय संघ हा सामना जिंकल्यास ते या सामन्यात बरोबरी करू शकतील. जर हा सामना अनिर्णीत राहिला अथवा इंग्लंडने विजय मिळवल्यास टीम इंडिया ही मालिका गमावतील.


पहिल्या डावात इंग्लंडची सुरूवात धमाकेदार झाली. बेन डकेट आणि जॅक क्राऊलीने भारतीय गोलंदाजांची लय बिघडवली. दोघांनी वनडे स्टाईलमध्ये बॅटिंग करताना १२.५ षटकांत ९२ धावांची भागीदारी केली. आकाशदीपने डकेटला बाद करत ही भागीदारी तोडली. डकेटने ५ चौकार आणि दोन षटकाराच्या मदतीने ३८ बॉलमध्ये ४३ धावा केल्या. डकेट बाद झाल्यानंतर काही वेळाने क्राऊलीने ४२ धावांवर आपले अर्धशतक पूर्ण केले.


याआधी भारताने पहिल्या डावात सर्वबाद २२४ धावा केल्या. भारताकडून करुण नायरने सर्वाधिक ५७ धावा केल्या.भारताला ३८ अवांतर चेंडूंचा फायदा मिळाला. यशस्वी जयस्वाल २, केएल राहुल १४, साई सुदर्शन ३८, कर्णधार शुभमन गिलने (धावचीत) २१, रविंद्र जडेजाने ९, यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलने १९, वॉशिंग्टन सुंदरने २६ धावांचे योगदान दिले. मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा शून्य धावा करुन बाद झाले तर आकाशदीप शून्य धावांव नाबाद राहिला. भारताकडून करुण नायर आणि साई सुदर्शन हे दोनच फलंदाज दीर्घकाळ मैदानावर पाय रोवून उभे होते. इंग्लंडकडून गस अ‍ॅटकिन्सन पाच, जोश टंगने तीन आणि ख्रिस वोक्सने एक बळी बळी घेतला.
Comments
Add Comment

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण

सिडनी ODI मध्ये ऑस्ट्रेलिया ऑलआऊट

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. ही मालिका ऑस्ट्रेलियाने आधीच २ - ०

ऑस्ट्रेलियाच्या भारताविरुद्धच्या एकदिवसीय टी-२० संघात मोठे फेरबदल! ग्लेन मॅक्सवेल आणि बेन ड्वार्शुइस अखेरच्या टप्प्यात संघात परतणार

मुंबई: भारताविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेसह आगामी टी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात अनेक

षटकारांचा राजा उपाधीपासून रोहित सहा पावले दूर

मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा माजी कर्णधार रोहित