"अल्पसंख्याकांचे लांगून चालन करण्यासाठी भगव्या दहशतवादाचा खोटा प्रचार केला" मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची काँग्रेसवर टीका

मुंबई: मालेगावात २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष एएनआयए न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर त्यावेळी सत्तेत असलेल्या काँग्रेसवर आता जोरदार टीका करण्यात येत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याप्रकरणी काँग्रेसवर टीका केली असून, मतांच्या राजकारणासाठी  “हिंदू टेरर” आणि “भगवा दहशतवाद” या शब्दांचा वापर करत, काँग्रेसने हिंदूंना दहशतवादी ठरवण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे.



काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका करताना म्हंटले की, "तुम्हाला माहित असेल की, संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणात दहशतवादी हल्ले होत होते, तेव्हा इस्लामिक दहशतवाद चर्चेत होता. यामुळे आम्हाला जे मत देणारे लोक आहेत, त्यांचा रोष ओढवू नये म्हणून हिंदू दहशतवाद ही थेअरी त्यावेळच्या सरकारने निर्माण केली. लोकांना अटक करण्यात आली.  हिंदुत्ववादी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना टार्गेट करण्याचे हे षड्यंत्र होते. पण अनेक प्रयत्न करूनही त्यांच्याविरोधात ठोस पुरावे मिळू शकले नाहीत. काही स्वयंसेवक असे होते की, ज्यांच्यावर मोठ्या प्रमाणात दबाव टाकण्यात आला होता. ते पुढे असे देखील म्हणाले की, “इस्लामिक दहशतवाद त्यावेळीही होता आणि आजही आहे. पण असे कोणी म्हटलेले नाही की, सर्व मुस्लिम दहशतवादी आहेत. तरीही हिंदूंना दहशतवादी ठरवण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात आला होता.”


 

“काँग्रेस प्रणित यूपीए सरकारने हिंदू दहशतवादाचा, भगव्या दहशतवादाचा नरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता, निवडणुकीत अल्पसंख्याकांचे लांगून चालन करण्यासाठी हिंदू दहशतवाद आहे, भगवा दहशतवाद आहे, अशा प्रकारचा प्रचार केला होता, तो प्रचार किती खोटा होता हे आज उघड झालं आहे. ज्या प्रकारे षडयंत्र रचून भगवा दहशतवाद दाखवण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. मात्र, तो प्रयत्न किती खोटा होता हे न्यायालयाने पुराव्यानिशी सांगितलं आहे.”



उद्धव ठाकरे यांना टोला 


देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “हा बॉम्बस्फोट कोणी केला? हे पोलीस सांगतील. तसेच त्या वेळच्या तपास यंत्रणांनी काय तपास केला? हे विचारावं लागेल. आता सर्वांना कल्पना आहे की उद्धव ठाकरे आता ज्यांच्याबरोबर बसलेले आहेत. त्यांचं सरकार (काँग्रेस) त्यावेळी होतं. त्यामुळे त्यांच्याच पोलिसांनी हे केलेलं आहे. भगव्या दहशतवादाचा नरेटीव्ह पसरवण्याचा हा प्रयत्न अयशस्वी झालेला आहे. त्यामुळे त्याबाबत उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन करायला पाहिजे होतं. पण आता तेही लांगून चालन करण्याच्याबरोबर गेलेले आहेत. त्यामुळे ते असं अभिनंदन करणार नाहीत”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Comments
Add Comment

Eknath Shinde : मणिपूरमध्ये सिद्धिविनायक मंदिराची प्रतिकृती उभारणार

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह 'ईशान सेतू' उपक्रमात सहभागी मुंबई

Kurla Incident : कुर्ल्यातील शितल तलावात १९ वर्षीय युवक बुडाला; शोधकार्य सुरू

मुंबई : मुंबईतील कुर्ला (Kurla) पश्चिम येथील शितल तलावात (Sheetal Talao) शुक्रवारी (१७ जुलै) एका १९ वर्षीय तरुण बुडाल्याची (Drowning)

BMC : धारावी, काळा किल्ला बेस्ट बस आगाराची जागा धारावी विकास प्रकल्पासाठीसाठी हस्तांतरीत

महापालिका सभागृहात बहुमताने प्रस्ताव मंजूर मुंबई : धारावी (Dharavi) बस डेपोची जागा पीपीपी तत्त्वावर धारावी विकास

BMC News : तातडीच्या कामकाजाच्या प्रस्तावावरून सलग दुसऱ्यांदा महापौरांकडून चूक

सत्ताधारी पक्ष दुसऱ्यांदा आला अडचणीत घाटकोपरमधील रस्ता रेषेसंदर्भातील प्रस्ताव मंजूर करण्याची महापौरांना

Chembur Tree Collapse : चेंबूरच्या झाड दुर्घटनेच्या अहवाल सत्ताधाऱ्यांनाच अमान्य

अहवालाची फेर चौकशी करून अहवाल सादर करण्याचे महापौरांचे निर्देश सभागृहनेत्यांनी अहवालाची प्रतच सभागृहात फाडत

FDA : मुंबईच्या प्रसिद्ध पारशी डेअरी फार्मवर अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; परवाना निलंबित

मुंबई : राज्यभर सुरू असलेल्या 'सेफ फूड, सेफ महाराष्ट्र' (Safe Food, Safe Maharashtra) या विशेष मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (FDA)