Monsoon: ऑगस्टमध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

मुंबई: यंदाच्या वर्षी मान्सूनने अपेक्षेपेक्षा आधीच देशात आणि राज्यात प्रवेश करत दमदार सुरुवात केली होती. जून महिन्याच्या मध्यावर काहीसा खंड पडल्यानंतर जुलैमध्ये पावसाने पुन्हा जोर धरला. मात्र, जुलैच्या अखेरीस राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कमी झाला होता. पण आता ऑगस्ट महिन्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.


हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सोशल मीडियावर आयएमडीच्या माहितीचा हवाला देत सांगितले की, "ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांमध्ये देशाच्या बहुतांश भागांत सामान्य ते सामान्यपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे." मात्र, ईशान्य भारत, पूर्व भारताचे काही भाग, मध्य भारताचे तुरळक भाग आणि दक्षिण भारताच्या नैऋत्य भागात पावसाचे प्रमाण तुलनेने कमी असू शकते.


आयएमडीच्या महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनने आतापर्यंत देशातील जवळपास सर्व भाग व्यापले आहेत. हिमाचल प्रदेशात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. ऑगस्ट महिन्यात सरासरीइतकाच पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाची स्थिती वेगवेगळी आहे. विदर्भात आज हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला असून, भंडारा, अमरावती, अकोला, वाशिम, नागपूर, गडचिरोली, गोदिया आणि यवतमाळमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण आणि पुणे विभागातही काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. पुण्यातील खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असून, पावसामुळे धरणांमध्ये चांगला जलसाठा झाला आहे.


मात्र, काही भागांमध्ये अजूनही मान्सूनची प्रतिक्षा आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी आज तुरळक पावसाच्या सरी पडण्याची शक्यता असून, सप्टेंबरमध्ये पावसाचा जोर अधिक वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.


पंढरपूर परिसरात उजनी आणि वीर धरण क्षेत्रात पावसामुळे वाढलेला साठा पाहता भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. उजनी धरणातून ७१,००० क्यूसेक तर वीर धरणातून ३१,००० क्यूसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे.


येत्या काळात गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवातही पावसाचा प्रभाव जाणवण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सणवारांची तयारी करताना हवामानाचा अंदाज लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. पावसाची अनिश्चितता लक्षात घेता, शेती, वाहतूक आणि सार्वजनिक जीवनावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Comments
Add Comment

चित्र साकारताना कल्पनाशक्तीची ज्योत सतत तेवत ठेवा; शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांचा संदेश

मुंबई: चित्रकला म्हणजे मनातील विचारांना कागदावर उतरविण्याचे साधन असते. यात निसर्गातील विविध रंगांसह आपल्या

मुंबई महापालिका रुग्णालयांमधील मिळणार खाटांची माहिती; डॅशबोर्डची सेवा उपलब्ध करून देणार

मुंबई: नागरिकांना महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपलब्ध रुग्णशया व अतिदक्षता विभागातील रुग्णाशय्या इत्यादी

घाटकोपरवासियांचा १० एप्रिल २०२६ पासून पाणीपुरवठा पूर्ववत; पुढील काही दिवस उकळून प्यावे लागणार पाणी

मुंबई: घाटकोपर (पश्चिम) येथील घाटकोपर निम्नस्तरीय जलाशयातील दोन कप्प्याच्या दुरुस्तीचे काम महानगरपालिकेच्या

MLA Amit Satam सीसी रस्त्यांमुळे खड्डे दुरुस्तीवरील खर्चात जवळपास ७० टक्क्याहून अधिक घट — भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम

आमदार अमीत साटम यांनी घेतला सीसी रस्त्यांच्या कामांचा आढावा मुंबई : भाजप-नेतृत्वाखालील महायुती सरकारकडून

Matunga Fire : माटुंगा वर्कशॉपमध्ये ट्रेनच्या डब्यांना भीषण आग; धुरामुळे परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : मुंबईतील माटुंगा रेल्वे वर्कशॉप येथे आज म्हणजेच मंगळवार ७ एप्रिल रोजी दुपारी उभ्या असलेल्या ट्रेनच्या

रंगांमधून उमलणारी स्वप्नं : जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये

दिव्यांग कलाकारांसाठी ‘विविधतेचा उत्सव’ मुंबई : कॅनव्हासवर रंग उमटत होते, पण ते केवळ चित्र