७१व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा, शाहरुख खान-विक्रांत मेसीला सर्वोत्कृष्ट अभिनेता, तर राणी मुखर्जीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

  100

नवी दिल्ली: भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित समजले जाणाऱ्या ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली आहे. राष्ट्रीय पुरस्कारांच्या ज्युरींनी सूचना आणि प्रसारण मंत्रालयाचे मंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्य मंत्री डॉक्टर एल मुरुगन यांना या संबधी रिपोर्ट सबमिट केली होती. यानंतर ज्युरीने संध्याकाळी ६ वाजता मीडियासाठीच्या पत्रकार परिषदेत विजेत्यांच्या नावांची घोषणा केली.


या पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार राणी मुखर्जीला जाहीर झाला आहे तर शाहरूख खान आणि विक्रांत मेस्सी यांना सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय १२वी फेल या सिनेमाला बेस्ट फीचर फिल्मचा पुरस्कार जाहीर झाला आहे.



फीचर सिनेमे


स्पेशल मेंशन - एनिमल 


सर्वोत्कृष्ट रीजनल फिल्म - पाय तांग 


सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा- श्यामची आई


सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमा - कटहल : अ जैकफ्रूट मिस्ट्री 


सर्वोत्कृष्ट बैकग्राउंड स्कोर - एनिमल के लिए हर्षवर्धन रामेश्वर 


सर्वोत्कृष्ट मेकअप -  सॅम बहादुरसाठी श्रीकांत देसाई 


सर्वोत्कृष्ट कॉस्ट्यूम - सॅम बहादूरसाठी सचिन लोवालेकर, दिव्या गंभीर आणि निधी गंभीर


सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिजाइन - 2018 एवेरीवन इज अ हीरो


सर्वोत्कृष्ट साउंड डिजाइन - एनिमल 


सर्वोत्कृष्ट सिनेमेटोग्राफी - द केरल स्टोरी 


सर्वोत्कृष्ट अभिनेत्री लीडिंग रोल - मिसेज चॅटर्जी वर्सेज नॉर्वे साठी राणी मुखर्जी 


सर्वोत्कृष्ट अभिनेता लीडिंग रोल - जवानसाठी शाहरुख खान आणि 12वी फेलसाठी विक्रांत मेस्सी...


सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन - द केरल स्टोरी के लिए सुदीप्तो सेन 


सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म - 12वी फेल 

Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही