अजून पाऊस संपलेला नाही...ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये जोरदार बरसणार मान्सून

नवी दिल्ली: भारतीय हवामान विभागाने भारतासाठी मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यासाठी (ऑगस्ट आणि सप्टेंबर) चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या काळात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

कशी असेल ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाची स्थिती


हवामान विभागाचे प्रमुख डॉ. मृत्युंजय महापात्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यात देशाच्या बहुतांश भागांत सरासरी (सामान्य) पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल, असा अंदाज आहे.

काही भागांत कमी पावसाची शक्यता


डॉ. महापात्रा यांनी हे देखील स्पष्ट केले की, ईशान्य भारत, त्याला लागून असलेला पूर्व भारत मध्य भारताचा काही भाग आणि दक्षिण-पश्चिम द्वीपकल्पीय भागांमध्ये मात्र सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे.

एकंदरीत, मान्सूनच्या उत्तरार्धात भारतभर चांगला पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे, ज्यामुळे शेती आणि जलसाठ्यांसाठी दिलासा मिळेल.
Comments
Add Comment

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना