अजून पाऊस संपलेला नाही...ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये जोरदार बरसणार मान्सून

नवी दिल्ली: भारतीय हवामान विभागाने भारतासाठी मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यासाठी (ऑगस्ट आणि सप्टेंबर) चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या काळात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

कशी असेल ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाची स्थिती


हवामान विभागाचे प्रमुख डॉ. मृत्युंजय महापात्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यात देशाच्या बहुतांश भागांत सरासरी (सामान्य) पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल, असा अंदाज आहे.

काही भागांत कमी पावसाची शक्यता


डॉ. महापात्रा यांनी हे देखील स्पष्ट केले की, ईशान्य भारत, त्याला लागून असलेला पूर्व भारत मध्य भारताचा काही भाग आणि दक्षिण-पश्चिम द्वीपकल्पीय भागांमध्ये मात्र सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे.

एकंदरीत, मान्सूनच्या उत्तरार्धात भारतभर चांगला पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे, ज्यामुळे शेती आणि जलसाठ्यांसाठी दिलासा मिळेल.
Comments
Add Comment

पंतप्रधान मोदींच्या आईचा AI व्हिडिओ कोणी बनवला? दिल्ली पोलिसांची कारवाई

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन यांचा डीपफेक व्हिडिओ वादाला मोठे राजकीय

केंद्र सरकार मणिपूरच्या लोकांसोबत खंबीरपणे उभे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मणिपूरमधील लोकांना आश्वासन, केले शांततेचे आवाहन चुराचंदपूर: पंतप्रधान नरेंद्र

Surya VHF : अमेरिकेच्या F 35 आणि चीनच्या J 20 विमानाचा वेध घेण्यास सक्षम असलेले भारताचे रडार

नवी दिल्ली : भारताने पहिल्या स्वदेशी सूर्या व्हीएचएफ (व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी) रडारच्या क्षमतेत वाढ केली आहे. हे

मोदींचा मणिपूरमध्ये दीड तास रस्त्यावरुन प्रवास, मुसळधार पावसातून पीएमचा ताफा सभास्थळी

मणिपूर : कुकी आणि मैतेई समाजाच्या वांशिक हिंसेमुळे मणिपूरमध्ये काही काळ कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे

राज्य स्थापनेनंतर ३८ वर्षांनी मिझोरमला मिळाली रेल्वे

मिझोरम : मिझोरम या राज्याची स्थापना २० फेब्रुवारी १९८७ रोजी झाली. राज्य स्थापनेनंतर जवळपास ३८ वर्षांनी मिझोरम

Pm Modi Mizoram Visit : मिझोरमला मोठी भेट! रेल्वेपासून हेलिकॉप्टरपर्यंत…पंतप्रधान मोदींच्या घोषणांनी मिझोरम गजबजला!

मिझोरम : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे सध्या दोन दिवसांच्या ईशान्य भारत दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यातील सर्वात