अजून पाऊस संपलेला नाही...ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये जोरदार बरसणार मान्सून

नवी दिल्ली: भारतीय हवामान विभागाने भारतासाठी मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यासाठी (ऑगस्ट आणि सप्टेंबर) चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या काळात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

कशी असेल ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाची स्थिती


हवामान विभागाचे प्रमुख डॉ. मृत्युंजय महापात्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यात देशाच्या बहुतांश भागांत सरासरी (सामान्य) पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल, असा अंदाज आहे.

काही भागांत कमी पावसाची शक्यता


डॉ. महापात्रा यांनी हे देखील स्पष्ट केले की, ईशान्य भारत, त्याला लागून असलेला पूर्व भारत मध्य भारताचा काही भाग आणि दक्षिण-पश्चिम द्वीपकल्पीय भागांमध्ये मात्र सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे.

एकंदरीत, मान्सूनच्या उत्तरार्धात भारतभर चांगला पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे, ज्यामुळे शेती आणि जलसाठ्यांसाठी दिलासा मिळेल.
Comments
Add Comment

दिल्लीत ५ रुपयांत मिळेल जेवण अटल कॅन्टीन सुरू

१०० ठिकाणी स्टॉल, प्रत्येक स्टॉलमध्ये ५०० लोकांसाठी जेवणाची सोय नवी दिल्ली : दिल्ली सरकारने माजी पंतप्रधान

ऑनलाइन डिलिव्हरी बंदमुळे देशातील अनेक भागांत ग्राहकांची अडचण

३१ डिसेंबरलाही मिळणार नाही सेवा हैदराबाद : ॲमेझॉन, झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट, स्विगी आणि फ्लिपकार्टसारख्या प्रमुख

मद्यपानाचे अल्प प्रमाणही मुख कर्करोगाला कारण

मुंबई : तंबाखू, गुटखा व सुगंधी सुपारी मुख कर्करोगासाठी कारणीभूत असल्याचे यापूर्वी अनेक संशोधनांतून स्पष्ट झाले

लष्कराच्या जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी

ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट... नवी दिल्ली : भारतीय लष्कराने आपल्या सोशल मीडिया वापराच्या धोरणात महत्त्वाचा बदल केला

'पतीने पत्नीचा फोन फोडणे गैर नाही'

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाकडून घटस्फोटाचा निर्णय कायम जबलपूर : "कोणत्याही पतीला आपली पत्नी व्यभिचारात

ग्रीन टीला यापुढे ‘चहा’ म्हणणे बेकायदा !

भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाचा निर्णय नवी दिल्ली : ग्रीन टीला आता ‘चहा’ म्हणणे बेकायदेशीर आहे, असे