अजून पाऊस संपलेला नाही...ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये जोरदार बरसणार मान्सून

नवी दिल्ली: भारतीय हवामान विभागाने भारतासाठी मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यासाठी (ऑगस्ट आणि सप्टेंबर) चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या काळात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

कशी असेल ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाची स्थिती


हवामान विभागाचे प्रमुख डॉ. मृत्युंजय महापात्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यात देशाच्या बहुतांश भागांत सरासरी (सामान्य) पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल, असा अंदाज आहे.

काही भागांत कमी पावसाची शक्यता


डॉ. महापात्रा यांनी हे देखील स्पष्ट केले की, ईशान्य भारत, त्याला लागून असलेला पूर्व भारत मध्य भारताचा काही भाग आणि दक्षिण-पश्चिम द्वीपकल्पीय भागांमध्ये मात्र सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे.

एकंदरीत, मान्सूनच्या उत्तरार्धात भारतभर चांगला पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे, ज्यामुळे शेती आणि जलसाठ्यांसाठी दिलासा मिळेल.
Comments
Add Comment

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी