Malegaon Blast : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी निकाल थोड्याच वेळात येणार, १७ वर्षांनी न्याय मिळणार ?

मुंबई : १७ वर्षे न्यायालयीन सुनावणी, हजारो पुरावे आणि शेकडो साक्षीदार! २९ सप्टेंबर २००८साली मालेगाव शहर हादरवणाऱ्या भीषण बॉम्बस्फोटाला (Malegaon Blast Case Verdict) आज जवळपास १७ वर्षं पूर्ण होत आहेत. भिक्खू चौकात झालेल्या या स्फोटात ६ निरपराध नागरिकांचे प्राण गेले. तर १०० हून अधिक जण गंभीर जखमी झाले होते. आता तब्बल १७ वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल मुंबईच्या एनआयए या विशेष न्यायालयात आज ( दि.३१) लागणार आहे. थोड्याच वेळात हा निकाल समोर येईल. या निकालामुळे कोणतीहा तणाव निर्माण होऊ नये याची खबरदारी पोलीस घेत आहेत. महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष या निकालाकडे खिळलं आहे.



मालेगाव पोलिस अलर्ट मोडवर


मालेगावमध्ये २००८ मध्ये बॉम्बस्फोट झाला होता. मालेगावमध्ये २९ सप्टेंबर २००८ रोजी अंजुमन चौक ते भीकू चौक या दरम्यान असलेल्या शकील गुड्स ट्रान्सपोर्ट कंपनीसमोर स्फोट झाला होता. रात्री ९:३५ मिनिटांनी हा स्फोट झाला होता. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता तर १०१ जण जखमी झाले होते. त्यानंतर आज मुंबईत या खटल्याचा निकाल लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर मालेगावात तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मालेगाववासीयांसह देशाचे लक्ष या खटल्याकडे लागले आहे. चौकाचौकात पोलिसांची नजर असणार आहे. पोलीस अलर्ट मोडवर आहे. अतिरिक्त पोलिस कर्मचारी कुमक लक्ष ठेवणार आहे. २०० पेक्षा जास्त पोलिस कर्मचारी, २० पेक्षा जास्त अधिकारी बंदोबस्त करणार असल्याची माहिती, मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक तेगबीरसिंग संधू यांनी दिली.
Comments
Add Comment

'उबाठा' गटाला पुन्हा खिंडार? निम्म्याहून अधिक खासदार शिवसेनेच्या वाटेवर

- कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच 'धमाका' होणार; एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यांनातर घडामोडींना वेग मुंबई :

महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) विधेयक २०२६ एकमताने मंजूर

मुंबई : राज्यातील पर्यावरण संरक्षण, आर्थिक शिस्त आणि औद्योगिक विकास यांचा समतोल साधण्याच्या दृष्टीने

‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई : ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा

नक्षलग्रस्त भागात सागवान तस्करांचा धुमाकूळ; वनमंत्र्यांकडून सखोल चौकशीचे आदेश

मुंबई : नक्षलग्रस्त भागातील मौल्यवान सागवान लाकडाची तस्करी करणार्‍या संघटित टोळ्यांना राजकीय पाठबळ मिळत आहे,

मालाडमध्ये प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनात घोटाळा- चौकशी समिती गठीत; अहवाल प्राप्त होईपर्यंत प्रकल्पाला स्थगिती

मुंबई : मालाड पूर्वमधील प्रकल्प बाधितांच्या (पीएपी) पुनर्वसनात घोटाळा झाल्याची बाब बुधवारी विधानसभेत चर्चेला

मुंबईतील जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनात त्रुटी ठेवणार नाही; मंत्री पंकजा मुंडेंनी विधान परिषदेत मांडली ठोस भूमिका

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या केईएम (KEM), नायर आणि कूपर या प्रमुख रुग्णालयांमधील जैववैद्यकीय कचऱ्याची