Malegaon Blast : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी निकाल थोड्याच वेळात येणार, १७ वर्षांनी न्याय मिळणार ?

मुंबई : १७ वर्षे न्यायालयीन सुनावणी, हजारो पुरावे आणि शेकडो साक्षीदार! २९ सप्टेंबर २००८साली मालेगाव शहर हादरवणाऱ्या भीषण बॉम्बस्फोटाला (Malegaon Blast Case Verdict) आज जवळपास १७ वर्षं पूर्ण होत आहेत. भिक्खू चौकात झालेल्या या स्फोटात ६ निरपराध नागरिकांचे प्राण गेले. तर १०० हून अधिक जण गंभीर जखमी झाले होते. आता तब्बल १७ वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल मुंबईच्या एनआयए या विशेष न्यायालयात आज ( दि.३१) लागणार आहे. थोड्याच वेळात हा निकाल समोर येईल. या निकालामुळे कोणतीहा तणाव निर्माण होऊ नये याची खबरदारी पोलीस घेत आहेत. महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष या निकालाकडे खिळलं आहे.



मालेगाव पोलिस अलर्ट मोडवर


मालेगावमध्ये २००८ मध्ये बॉम्बस्फोट झाला होता. मालेगावमध्ये २९ सप्टेंबर २००८ रोजी अंजुमन चौक ते भीकू चौक या दरम्यान असलेल्या शकील गुड्स ट्रान्सपोर्ट कंपनीसमोर स्फोट झाला होता. रात्री ९:३५ मिनिटांनी हा स्फोट झाला होता. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता तर १०१ जण जखमी झाले होते. त्यानंतर आज मुंबईत या खटल्याचा निकाल लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर मालेगावात तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मालेगाववासीयांसह देशाचे लक्ष या खटल्याकडे लागले आहे. चौकाचौकात पोलिसांची नजर असणार आहे. पोलीस अलर्ट मोडवर आहे. अतिरिक्त पोलिस कर्मचारी कुमक लक्ष ठेवणार आहे. २०० पेक्षा जास्त पोलिस कर्मचारी, २० पेक्षा जास्त अधिकारी बंदोबस्त करणार असल्याची माहिती, मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक तेगबीरसिंग संधू यांनी दिली.
Comments
Add Comment

पवईतील एन्काऊंटरवर एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा काय म्हणाले ?

मुंबई : पवईतील स्टुडिओत घडलेल्या ओलीस नाट्य आणि त्यानंतर झालेले आरोपी रोहित आर्य याच्या एन्काऊंटरवर अनेक प्रश्न

'वाचाळवीर' राऊतांना सक्तीची विश्रांती? महापालिका निवडणुकीपूर्वी ‘राजकीय ब्रेक’

प्रकृतीच्या कारणामुळे संजय राऊत दोन महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार; राजकीय वर्तुळात अनेक

Rohit Arya : रोहित आर्या प्रकरणात नवा ट्विस्ट! लहान मुलं बंधक बनवून ठेवण्यात आलेल्या RA स्टुडिओची पहिली प्रतिक्रिया समोर!

मुंबई : मुंबईच्या पवई परिसरात (Powai Area) गुरुवारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अखेर अंधेरी सबवेमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार, मुंबई महानगरपालिकेचा नवीन प्लॅन तयार

मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते आणि त्याचा फटका रस्ते वाहतुकीला बसतो. आता हीच वाहतूक सुरळीत राहावी

रेल्वे प्रशासनचा मोठा निर्णय ! गर्दी नियंत्रणासाठी उभारणार 'पॅसेंजर होल्डिंग एरिया'; मुंबईमध्ये कोणत्या स्थानकांवर असणार ही सुविधा ?

मुंबई : मुंबईतील वाढत्या गर्दीमुळे नागरिकांसाठी असणाऱ्या सोयीसुविधा दिवसेंदिवस अपुऱ्या पडत चालल्या आहेत.

Uddhav Thackeray : 'जामीन वॉरंट'ची टांगती तलवार! दोनदा नोटीस देऊनही प्रतिसाद नाही; महामोर्चापूर्वी उद्धव ठाकरेंना कोरेगाव भीमा आयोगाकडून 'कारणे दाखवा' नोटीस!

मुंबई : महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi), मनसे (MNS) आणि विरोधक (Opposition) उद्या, म्हणजेच १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या 'सत्याच्या