स्कूल व्हॅनसाठी राज्य शासन तयार करणार नवी नियमावली

मुंबई : स्कूल व्हॅनसाठी महाराष्ट्र शासन नवी नियमावली तयार करणार आहे. रा आसनांपर्यंत विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांना स्कूल व्हॅनचा दर्जा देण्याची तरतूद या नियमावलीत असेल.

राज्याच्या गृह विभागाने महाराष्ट्र मोटार वाहने शालेय बस नियम, २०११ मध्ये सुधारणा केली आहे. त्यानुसार, बारा प्रवाशांपर्यंत बसण्याची क्षमता असलेले वाहन जे विशेषतः शाळेत जाणाऱ्या मुलांन वाहून नेण्यासाठी तयार केले आहे आणि चाचणी संस्थेने जारी केलेल्या प्रकारातील मान्यता प्रमाणपत्र प्राप्त आहे अशा वाहनांन स्कूल व्हॅनचा दर्जा देण्यात येणार आहे. तेरा आणि त्याहून अधिक विद्यार्थ्यांची बसण्याची क्षमत असलेल्या वाहनाला स्कूल बसचा दर्जा देण्यात येणार आहे. स्कूल व्हॅनची व्याख्या आणि सुरक्षा नियमावली निश्चित झाल्यावर राज्यातील हजारो वाहनांना अधिकृत विद्यार्थी वाहनांचा दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

स्कूल व्हॅन आणि स्कूल बस यांच्या मालकांची संघटना तसेच शाळा प्रशासन, वाहतूक पोलीस या सर्व यंत्रणांशी समन्वय साधून नियम निश्चित करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. या व्यवस्थेतून एक ठोस नियमावली केली जाईल. यामुळे विद्यार्थ्यांचा घर ते शाळा आणि शाळा ते घर हा प्रवास सुरक्षित आणि आरामदायी होण्यास मदत होणार आहे.
Comments
Add Comment

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण