काँग्रेसचे कैलास गोरंट्याल आता भाजपवासी

मुंबई : जालना जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते आणि तीन टर्मचे आमदार आणि सध्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण माजी खासदार रावसाहेब दानवे, मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. कैलास गोरंट्याल यांनी तीन वेळा जालना विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. पण २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या अर्जुन खोतकर यांनी गोरंट्याल यांचा ३१ हजार ६५१ मतांनी पराभव केला. या पराभवाचे खापर गोरंट्याल सातत्याने काँग्रेसवर फोडत होते. उमेदवारी देण्यास खूप वेळ घेतला यामुळे प्रचाराला पुरेसा कालावधीच मिळाला नाही, असे त्यांचे म्हणणे होते. आता त्यांनी काँग्रेस सोडून थेट भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

काही दिवसांपूर्वीच कैलास गोरंट्याल यांनी भाजपमध्ये जाणार असल्याचे संकेत दिले होते. अखेर त्या शक्यतेवर गुरुवार ३१ जुलै रोजी शिक्कामोर्तब झाले.

जालना विधानसभा मतदारसंघाने मागील तीन दशकात कधी कैलास गोरंट्याल तर कधी अर्जुन खोतकर यांनाच आमदार केले. खोतकर चारवेळा तर गोरंट्याल तीनवेळा आमदार झाले. आता भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे गोरंट्याल यांची बाजू मजबूत झाली आहे. तसेच जालन्यात भाजपची ताकद वाढली आहे. भाजपची शत प्रतिशतच्या दिशेने जालन्यात ताकदीने वाटचाल सुरू आहे. यामुळे शिवसेनेच्या चिंतेत भर पडली आहे. मित्रपक्षांचे आमदार असलेल्या मतदारसंघांमध्ये भाजप चतुराईने ताकद वाढवण्यावर भर देत आहे. साताऱ्यातील पाटणमध्ये सत्यजीत पाटणकर, भोरमध्ये संग्राम थोपटे, पुरंदरमध्ये संजय जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या तिन्ही मतदारसंघांमध्ये सध्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार आहेत. यामुळे भाजपच्या वाढत्या ताकदीने शिवसेना चिंतेत असल्याचे चित्र आहे.
Comments
Add Comment

कृषी योजनांसाठी ८ महिन्यांत ३५ टक्के निधी खर्च; विधान परिषदेत दत्ता भरणे यांची माहिती

मुंबई : राज्यातील कृषी विभागाच्या राज्य पुरस्कृत योजनांसाठी गेल्या आठ महिन्यांत एकूण ८०९८.४१ कोटी रुपयांची

बदलापूर प्रकरणाची विधान परिषदेत दखल; स्कूल बस नियमावलीच्या कडक अंमलबजावणीचे आदेश

मुंबई : बदलापूर येथील एका शाळेत घडलेल्या विनयभंग प्रकरणाचे विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले असून, राज्य सरकारने

विधिमंडळ हेही विनोदांना जन्म देणारे व्यासपीठ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधान भवनात 'जावे विनोदाच्या गावा' विशेष

पिंजऱ्यातील बिबट्यांचे दात आता राहणार सुरक्षित! लोखंडी गजांना आता 'प्लास्टिक कोटिंग' करणार; वनमंत्र्यांची घोषणा

मुंबई : मानवी वस्तीत शिरलेल्या बिबट्यांना पकडल्यानंतर पिंजऱ्यात त्यांना होणाऱ्या शारीरिक जखमा आणि त्यातून

शेतकरी आणि मजुरांना बिबट्यांपासून मिळणार सुरक्षा; विधान परिषदेत सरकारचा मास्टर प्लॅन

मुंबई : राज्यात वाढलेला बिबट्यांचा वावर आणि त्यामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी राज्य सरकारने अत्याधुनिक

एआय तंत्रज्ञानाने रोखणार वाघ-बिबट्यांचे हल्ले; प्रवीण दरेकरांच्या सूचनेवर सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्रप्रकल्पात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (AI) सहाय्याने राबवण्यात आलेला