रिकाम्या पोटी चुकूनही खाऊ नका हे 10 पदार्थ, आतड्यांना बसेल पीळ, हार्टपासून डायबिटीजपर्यंत होतील गंभीर आजार!

सकाळची सुरुवात कशी होते, यावर तुमचा संपूर्ण दिवस अवलंबून असतो. सकाळी झोपेतून उठल्यानंतर आपली पचनसंस्था सर्वात संवेदनशील असते. त्यामुळे रिकाम्या पोटी काय खाल्ले जाते, याचा शरीरावर मोठा परिणाम होतो. जर तुम्ही रिकाम्या पोटी काही चुकीचे पदार्थ खाल्ले तर पित्त, अ‍ॅसिडिटी, गॅस, बद्धकोष्ठता, पोटफुगी आणि चयापचय यांसारख्या अनेक समस्या सुरू होऊ शकतात.हे त्रास होऊ नये यासाठी आहारतज्ज्ञ रिकाम्या पोटी दहा पदार्थ खाऊ नका असा सल्ला देतात. जाणून घेऊ कोणते १० पदार्थ रिकाम्या पोटी खाऊ नये....


रिकाम्या पोटी हे पदार्थ खाणे टाळा:


१ आंबट फळे: संत्री, मोसंबी किंवा अननस यांसारखी आंबट फळे रिकाम्या पोटी खाल्ल्यास अ‍ॅसिडिटी वाढू शकते. या फळांमधील जास्त आम्ल पोटाच्या आतील आवरणाला त्रास देते, ज्यामुळे गॅस आणि जळजळ होऊ शकते.


२. टोमॅटो: टोमॅटोमध्ये टॅनिक अॅसिड असते, जे रिकाम्या पोटी खाल्ल्यास अ‍ॅसिडिटी वाढवते. यामुळे पोटाचे त्रास वाढू शकतात आणि अल्सरचा धोकाही वाढतो.


३. केळी: केळी पौष्टिक असली तरी, रिकाम्या पोटी खाल्ल्यास शरीरातील मॅग्नेशियमची पातळी अचानक वाढू शकते. यामुळे हृदयावर परिणाम होण्याची शक्यता असते.


४. थंड पदार्थ: फ्रिजमधील थंड पाणी किंवा थंड रस रिकाम्या पोटी घेतल्यास पचनशक्ती कमी होते. थंड पदार्थांमुळे पचनक्रिया मंदावते आणि दिवसभर जडपणा वाटू शकतो.


५. गोड पदार्थ आणि साखर: सकाळी उठल्याबरोबर साखरयुक्त पदार्थ किंवा मिठाई खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते, ज्यामुळे मधुमेह आणि मेटाबॉलिक विकारांचा धोका वाढतो.


६. चहा आणि कॉफी: रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी घेतल्यास अ‍ॅसिडिटी आणि छातीत जळजळ होऊ शकते. चहामधील टॅनिक अॅसिड पोटाच्या आवरणाला त्रास देऊन पचनावर वाईट परिणाम करतो.


७. दही: रिकाम्या पोटी दही खाल्ल्यास त्यातील उपयुक्त जिवाणू पोटातील आम्लामुळे नष्ट होतात, ज्यामुळे आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.


८. मसालेदार आणि तेलकट पदार्थ: तळलेले किंवा मसालेदार पदार्थ रिकाम्या पोटी खाल्ल्यास पोटाच्या आतील आवरणावर वाईट परिणाम होतो, ज्यामुळे गॅस, अ‍ॅसिडिटी आणि पोटदुखी होऊ शकते.

९. कच्च्या भाज्या: कच्च्या भाज्या पचायला कठीण असतात. रिकाम्या पोटी त्यांचे सेवन केल्यास गॅस, पोट फुगणे किंवा अपचनासारखे त्रास उद्भवतात.सकाळी रिकाम्या पोटी योग्य आहार घेण्याने पचन व्यवस्थित राहते आणि दिवसभर शरीराला ऊर्जा मिळते. त्यामुळे दिवसाची सुरुवात हलक्या, पचायला सोप्या आणि पोषक अन्नाने करणेच आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.


(टीप : वरील सर्व बाबी प्रहार केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. ही माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. हा वैद्यकीय सल्ला, निदान किंवा उपचारांचा पर्याय नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. या लेखातील माहितीची अचूकता, विश्वासार्हता किंवा परिणामकारकतेची जबाबदारी प्रहार घेत नाही आणि कोणताही दावा करत नाही.)
Comments
Add Comment

Holi Safety Tips And Tricks: होळीला बाजारात खरा रंग कसा ओळखायचा?

मुंबई: केमिकल रंगांचा वाढता धोका सगळीकडेच आहे. होळीचा सण म्हणजे आनंदाची उधळण. मात्र बाजारपेठेत सध्या रासायनिक

Valentine's Day Wishes : व्हॅलेंटाइन डे २०२६ निमित्त पाठवा खास मराठी शुभेच्छा संदेश

Happy Valentine's Day 2026 Wishes In Marathi । मुंबई : व्हॅलेंटाइन डे म्हणजे मनातल्या भावना मनमोकळेपणाने व्यक्त करण्याचा दिवस. या दिवशी

यंदाच्या व्हॅलेंटाईन डेला केसांना ब्राऊन रंग देण्यामागील खास कारण जाणून घ्या

यंदाच्या प्रेम व्यक्त करण्याच्या मोसमात सर्वांच्या हृदयाचे ठोके पुन्हा वाढलेले दिसतील. प्रेमाच्या ऋतुमानात

सावधान! व्हॅलेंटाईन डे दिवशी अशाप्रकारे होऊ शकते फसवणूक; सुरक्षित कसे राहायचे?, जाणून घ्या...

मुंबई: व्हॅलेंटाईन डे आता फार दूर नाही. या दिवशी लोक त्यांचे प्रेम व्यक्त करतात आणि त्यांच्या प्रियकरांना

Cancer Fighting Food In Ayurveda: आयुर्वेदातील कोणते पदार्थ कर्करोगावर नियंत्रण ठेवू शकतात, जाणून घ्या

मुंबई: आयुर्वेदानुसार, वात-पित्त-कफ दोषांचे संतुलन राखून कर्करोगासारख्या आजारावर लक्षणीय नियंत्रण मिळवता येते.

तुम्हाला माहित आहे का डार्क चॉकलेट खाण्याचे फायदे ?

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच चॉकलेट खायला आवडतं. सध्या बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट