Water Cut in Mumbai: गुरुवारी वांद्रे, खार भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद

मुंबई: आवश्यक देखभाल आणि दुरूस्तीच्या कामासाठी उद्या ३१ जुलै रोजी मुंबई उपनगरातील वांद्रे आणि खार भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.


बीएमसीने वांद्रे येथील पाली हिल जलाशयाच्या इनलेट आणि आउटलेटवरील चार व्हॉल्व्ह बदलण्याचे काम हाती घेतले आहे. हे काम गुरुवारी सकाळी ९ ते रात्री ११ वाजेपर्यंत चालणार आहे, जे एकूण १४ तास चालेल. या काळात, वांद्रे आणि खारमधील काही भागात पाणीपुरवठा तात्पुरता बंद राहील, तर इतर भागात पाण्याचा दाब कमी होऊ शकतो.



वांद्रे आणि खार येथील अनेक भागात पाणीकपात


आवश्यक देखभाल आणि दुरूस्तीच्या कामासाठी हनुमान नगर, लक्ष्मी नगर, युनियन पार्क (रस्ते क्रमांक १ ते ४), पाली हिल, चुईम गावातील काही भागांमध्ये नियमित पुरवठा वेळेत पाणीपुरवठा तात्पुरता बंद राहील. याव्यतिरिक्त, कांतवाडी, पाली नाका, पाली गावठाण, शेर्ली आणि राजन आणि माला गावे, खार दांडा कोळीवाडा, दांडपाडा, चुईम गावठाण, गजधरबंध झोपडपट्टीचा काही भाग आणि पश्चिम खार भागातील काही भागांमध्ये चालू कामकाजाच्या समायोजनांमुळे नियमित वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.



रहिवाशांना पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन


मुंबई महानगरपालिकेने उद्या वांद्रे आणि खार परिसरातील राहिवाश्यांना पुरेसे पाणी साठवून ठेवण्याचा सल्ला दिला आहे, पुरवठा बंद असताना पाण्याचा काटकसरीने वापर करावा, तसेच पुढील ४ ते ५ दिवस वापरण्यापूर्वी पाणी उकळून आणि गाळून पिण्याच आवाहन दिले आहे.

Comments
Add Comment

Mantralaya Water : 'मंत्रालयातील पाणी पूर्णपणे सुरक्षित'; टाक्यांची स्वच्छता, वॉटर प्युरिफायर सर्व्हिसिंग पूर्ण, BMCचा अहवाल दिलासा देणारा

मुंबई : मंत्रालयातील पाणीपुरवठ्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनंतर सार्वजनिक बांधकाम

Monsoon Update : राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा; कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात अलर्ट

मुंबई(Mumbai) : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचे स्वरूप विस्कळीत राहिले होते. मात्र आता राज्यातील अनेक

Chandrashekar Bawankule : नायब तहसीलदार ते अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा

 महसूल विभागाच्या सेवा नियमांत ५० वर्षांनी बदल; मुख्यमंत्र्यांकडून प्रस्तावाला मान्यता मुंबई : महसूल

MIDC Maharashtra : वैभववाडी 'MIDC'ला मूर्त रूप, पायाभूत सुविधांची कामे तातडीने सुरू करण्याचे मंत्री उदय सामंतांचे निर्देश

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत मंत्रालयात बैठक मुंबई :

Mumbai Police : CJPच्या आंदोलनानंतर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; ८ पोलीस ठाण्यांत ९०० हून अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील CJP आंदोलनानंतर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत शहरातील आठ वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

NITI Aayog Investment Index : नीती आयोगाच्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांकात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

५६.६ गुणांसह गुजरात पहिले; तामिळनाडूचा तिसरा क्रमांक मुंबई(Mumbai) : देशातील राज्यांमध्ये गुंतवणुकीला पोषक वातावरण,