Water Cut in Mumbai: गुरुवारी वांद्रे, खार भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद

मुंबई: आवश्यक देखभाल आणि दुरूस्तीच्या कामासाठी उद्या ३१ जुलै रोजी मुंबई उपनगरातील वांद्रे आणि खार भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.


बीएमसीने वांद्रे येथील पाली हिल जलाशयाच्या इनलेट आणि आउटलेटवरील चार व्हॉल्व्ह बदलण्याचे काम हाती घेतले आहे. हे काम गुरुवारी सकाळी ९ ते रात्री ११ वाजेपर्यंत चालणार आहे, जे एकूण १४ तास चालेल. या काळात, वांद्रे आणि खारमधील काही भागात पाणीपुरवठा तात्पुरता बंद राहील, तर इतर भागात पाण्याचा दाब कमी होऊ शकतो.



वांद्रे आणि खार येथील अनेक भागात पाणीकपात


आवश्यक देखभाल आणि दुरूस्तीच्या कामासाठी हनुमान नगर, लक्ष्मी नगर, युनियन पार्क (रस्ते क्रमांक १ ते ४), पाली हिल, चुईम गावातील काही भागांमध्ये नियमित पुरवठा वेळेत पाणीपुरवठा तात्पुरता बंद राहील. याव्यतिरिक्त, कांतवाडी, पाली नाका, पाली गावठाण, शेर्ली आणि राजन आणि माला गावे, खार दांडा कोळीवाडा, दांडपाडा, चुईम गावठाण, गजधरबंध झोपडपट्टीचा काही भाग आणि पश्चिम खार भागातील काही भागांमध्ये चालू कामकाजाच्या समायोजनांमुळे नियमित वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.



रहिवाशांना पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन


मुंबई महानगरपालिकेने उद्या वांद्रे आणि खार परिसरातील राहिवाश्यांना पुरेसे पाणी साठवून ठेवण्याचा सल्ला दिला आहे, पुरवठा बंद असताना पाण्याचा काटकसरीने वापर करावा, तसेच पुढील ४ ते ५ दिवस वापरण्यापूर्वी पाणी उकळून आणि गाळून पिण्याच आवाहन दिले आहे.

Comments
Add Comment

BMC News : सहाय्यक आयुक्तांच्या दालनाचे ऑडिट करा; सभागृह नेते गणेश खणकर यांची मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेत पावणे चार वर्षे प्रशासकीय राज्य होते. त्यामुळे समिती अध्यक्षांची दालन

Ranichi Baug : राणीबागेतील वाघ, बिबटयांचा मांस मटणावर ताव; खरेदीला स्थायी समितीने दिली मंजुरी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) राणीबागेतील वाघ, बिबट्यांसह अन्य प्राण्यांना म्हैस व रेड्याचे मांस दिले जात असून या

Mumbai Water Cut : मुंबईवर पाणी संकटाची टांगती तलवार; १ मेपासून १०% पाणी कपात होणार ?

मुंबई : भारतीय हवामान विभागाने यंदाच्या मान्सूनबाबत दीर्घकालीन अंदाज जाहीर केला असून देशात सरासरीपेक्षा कमी

heatstroke in Maharashtra : महाराष्ट्रात उष्माघातामुळे दोन जणांचा मृत्यू

मुंबई : राज्यात सुर्याने रौद्ररूप धारण केले असून मार्च महिन्यातच पारा प्रचंड वाढल्याचे दिसत आहे. वाढत्या

Cab Drivers Strike : शनिवारपासून कॅब चालकांचा संप

मुंबई : कॅब व रिक्षा चालकांच्या प्रलंबित मागण्यांवर गुरूवारी परिवहन आयुक्त राजेश नार्वेकरांशी होणाऱ्या बैठकीत

Mumbai : मुंबईत झाडांच्या फांद्यांची होणार शास्त्रोक्त छाटणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : धोकेदायक ठरू शकणाऱ्या झाडांची पावसाळा सुरू होण्यापूर्वी शास्रोक्त पद्धतीने छाटणी कशी