मुंबई: आवश्यक देखभाल आणि दुरूस्तीच्या कामासाठी उद्या ३१ जुलै रोजी मुंबई उपनगरातील वांद्रे आणि खार भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
बीएमसीने वांद्रे येथील पाली हिल जलाशयाच्या इनलेट आणि आउटलेटवरील चार व्हॉल्व्ह बदलण्याचे काम हाती घेतले आहे. हे काम गुरुवारी सकाळी ९ ते रात्री ११ वाजेपर्यंत चालणार आहे, जे एकूण १४ तास चालेल. या काळात, वांद्रे आणि खारमधील काही भागात पाणीपुरवठा तात्पुरता बंद राहील, तर इतर भागात पाण्याचा दाब कमी होऊ शकतो.
वांद्रे आणि खार येथील अनेक भागात पाणीकपात
आवश्यक देखभाल आणि दुरूस्तीच्या कामासाठी हनुमान नगर, लक्ष्मी नगर, युनियन पार्क (रस्ते क्रमांक १ ते ४), पाली हिल, चुईम गावातील काही भागांमध्ये नियमित पुरवठा वेळेत पाणीपुरवठा तात्पुरता बंद राहील. याव्यतिरिक्त, कांतवाडी, पाली नाका, पाली गावठाण, शेर्ली आणि राजन आणि माला गावे, खार दांडा कोळीवाडा, दांडपाडा, चुईम गावठाण, गजधरबंध झोपडपट्टीचा काही भाग आणि पश्चिम खार भागातील काही भागांमध्ये चालू कामकाजाच्या समायोजनांमुळे नियमित वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.
रहिवाशांना पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन
मुंबई महानगरपालिकेने उद्या वांद्रे आणि खार परिसरातील राहिवाश्यांना पुरेसे पाणी साठवून ठेवण्याचा सल्ला दिला आहे, पुरवठा बंद असताना पाण्याचा काटकसरीने वापर करावा, तसेच पुढील ४ ते ५ दिवस वापरण्यापूर्वी पाणी उकळून आणि गाळून पिण्याच आवाहन दिले आहे.