अन्यायाविरुद्ध समविचारी संघटना एकवटल्या

नाशिक येथे वज्रमुठ राज्यव्यापी दुसरी बैठक; मुख्यमंत्र्यांची आज घेणार भेट


नाशिक : सामाजिक,मराठा,शेतकरी आणि पुरोगामी विचारधारेच्या समविचारी संघटनांची वज्रमुठ राज्यव्यापी दुसरी बैठक नाशिकमध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. महाराष्ट्रातील सर्व सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर चुकीचे गुन्हे दाखल करणे, सामूहिक जमाव करून प्राणघातक हल्ले तसेच राज्यातील वाढत्या अन्याय-अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर एकत्र येऊन या संघटनांनी पुढील आंदोलनात्मक दिशा निश्चित करण्यात आली. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची शिष्टमंडळ बुधवारी ( दिनांक ३०) रोजी भेट घेणार आहेत.


बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. त्यात प्रामुख्याने मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व मंत्री आणि आमदार यांचे दोन दिवशीय मार्गदर्शन शिबिर घ्यावे. त्यामध्ये राज्य शासन कसे चालवता याचे मार्गदर्शन करावे. कारण सध्या अनेक आमदार, मंत्री यांना जनसामान्यांचे सेवा करायची कशी याचा विसर पडल्या चे काही घटनांवरून दिसून येते. त्यामुळे


या शिबिरातून त्यांना त्याची जाणीव करून द्यावी ही मागणी प्रामुख्याने त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट संवाद आणि घटनात्मक मार्गाने न्याय मिळवण्यासाठी असणार आहे. मुख्य मंत्र्यांनी वेळ देण्याची एकमुखी मागणी बैठकीत करण्यात आली. त्यांच्याकडून


वेळ मिळेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला. करण गायकर, सुभाष जावळे, महादेव देवसरकर, विलास पांगारकर,राजेश मोरे, राजू देसले, रामेश्वर शिंदे, प्रफुल वाघ, शिवा तेलंग , आशिष हिरे, विजय वाहुळे, योगेश कापसे, नवनाथ शिंदे, सुभाष गायकर, मनोरमा पाटील सविता वाघ प्रवीण पाटील दिनेश जाधव विजय उगले योगेश गांगुर्डे अश्विनी पाटील प्रताप भोसले भारत पिंगळे नितीन काळे मंगेश पाटील विकी गायधनी गणेश पाटील राहुल राऊत निलेश गायकवाड अमोल शिंदे शुभम महाले अमोल पाटील दादासाहेब जोगदंड नामदेव शिंदे आदी उपस्थित होते.


बैठकीतील ठराव असे...

  • जनसुरक्षा कायद्याप्रमाणे थोर महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी कायदा तयार करावा.

  • मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी पोलिसांनी केलेला लाठीचार्ज हा निषेधार्ह असून त्यामधील जे कोणी आरोपी होते त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.

  • सरपंच कै.संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा आणि उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करावी.

  • इंद्रजित सावंत यांच्यावर केलेल्या शिवीगाळ प्रकरणात दोषींवर कायदेशीर कार्यवाही व्हावी.


लातूरमध्ये छावा संघटनेच्या शांततामय आंदोलनकर्त्यांवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली मारहाण निषेधार्ह असून,यामध्ये सुनील तटकरे यांच्या भूमिकेची चौकशी करावी.

 

 
Comments
Add Comment

Nashik Mumbai : खड्ड्यांचं टेन्शन खल्लास! फक्त १२० मिनिटांत गाठाल मुंबई; नाशिक ते मुंबई प्रवासासाठी सरकारचा 'सुपर प्लॅन' काय आहे?

नाशिक : नाशिककरांसाठी विकासाची एक नवी पहाट उजाडली असून, मुंबई आणि नाशिकमधील प्रवासाचा वेळ आता निम्म्यावर येणार

Nashik News : सावधान! ५-१० रुपयांची कुल्फी पडेल महागात! नाशिकमध्ये केमिकल वापरून कुल्फी बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

नाशिक : अहिल्यानगरमधील भेसळयुक्त दूध रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर आता नाशिकमध्येही अन्नामध्ये भेसळ

4th Vishwa Marathi Sammelan: कुसुमाग्रजांच्या नाशिकमध्ये रंगणार चौथे विश्व मराठी संमेलन

नाशिक: जेष्ठ कवी कुसुमाग्रज यांचे वास्तव्य राहिलेल्या नाशिक शहरात चौथे विश्व मराठी संमेलन भरवण्यात येणार आहे.

Malegaon Mayor Election 2026 : मोठी बातमी! मालेगावमध्ये महापौरपदाची निवडणूक संपताच धक्कादायक घटना, महापालिकेतील लिफ्ट चौथ्या मजल्यावरुन कोसळली अन् थेट...

नाशिक : मालेगावातून एक भयंकर घटना घडली आहे. मालेगावमधील महापालिका इमारतीमध्ये आज एक मोठा अपघात घडला असतानाच

मुंबई, पुण्यानंतर आता नाशिककरही सततच्या वाहतूक कोंडीमुळे होणार हैराण; तब्बल वर्षभर सोसावी लागणार वाहतूक कोंडी

नाशिक : मुंबई पुण्याप्रमाणेच आता नाशिककरांनाही रोजच्या वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागणार आहे. एक - दोन महीने

Nashik 400 Crore Cash Robbery : नाशिकमधील ४०० कोटींच्या कथित रोख लुटीने खळबळ, धक्कादायक खुलासा; ‘लूट झालीच नाही’

नाशिक : नाशिकमध्ये २००० रुपयांच्या नोटांनी भरलेला ट्रक लुटल्याच्या कथित घटनेने राज्यात एकच खळबळ उडवून दिली आहे.