दहिवडमध्ये बिबट्या जेरबंद

  52

नागरिकांमध्ये भीती कायम; आणखी पिंजऱ्यांची मागणी


देवळा : देवळा तालुक्यातील दहिवड येथील लवखाड मळ्यामध्ये अनेक दिवसांपासून दहशत माजवणारा बिबट्या अखेर वन विभागाच्या प्रयत्नांमुळे जेरबंद झाला आहे. तुकाराम दाजीबा वाघ यांच्या शेतशिवारात बिबट्याचा मुक्त संचार वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात सोमवार, २८ जुलै रोजी रात्री ९.३० वाजता हा बिबट्या अडकला. बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी विजय पगार, जी. जी. पवार, ठाकरे आणि भदाणे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी नागरिकांना सावधगिरीचा इशारा देत बिबट्याला ताब्यात घेतले.

जेरबंद बिबट्यानंतरही परिसरात बिबट्याचा वावर


एक बिबट्या जेरबंद झाल्यानंतरही दहिवड येथील लवखाड मळ्यात बिबट्याचा वावर कायम असल्याचे समोर आले आहे. मंगळवार, २९ जुलै रोजी सकाळी १० च्या सुमारास त्याच परिसरात एका बिबट्याने डाळिंब बागेत डरकाळी फोडून एका शेतकऱ्यावर चाल केली. भयभीत झालेल्या शेतकऱ्याने तातडीने घराच्या दिशेने पळ काढल्याने तो सुदैवाने बचावला.
ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या मते, या परिसरात अजून दोन ते तीन बिबटे वास्तव्यास असून, यामुळे दहशतीचे वातावरण कायम आहे. भविष्यात कोणताही अनर्थ घडण्याआधी वन विभागाने पुन्हा पिंजरा लावण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

वन विभागाचे नागरिकांना आवाहन


दरम्यान, मौजे दहिवड, लवखाड मळा आणि परिसरातील शेतकऱ्यांसाठी वन विभागाने एक विशेष आवाहन केले आहे.
आपल्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांनी, विशेषतः लहान मुलांची काळजी घ्यावी आणि दक्षता घेऊन शेतीची कामे करावीत, असे वन विभागाने म्हटले आहे. परिसरात काही संशयास्पद हालचाल किंवा बिबट्याचे अस्तित्व आढळल्यास सुरक्षित मार्गक्रमण करावे. तसेच, कोणत्याही वन्यजीवाला डिवचण्याचा किंवा त्रास देण्याचा प्रयत्न करू नये, असेही आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले आहे.
Comments
Add Comment

केळ्यांचा भाव घसरला; उत्पादकांना मोठा आर्थिक फटका

जळगाव: काही दिवसापूर्वी २ हजाराच्या वर गेलेला केळीचा भाव आता १२०० रूपयांपर्यंत घसरल्यामुळे केळी उत्पादकांना

त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षारक्षकांकडून भाविकांना मारहाण

त्रंबकेश्वर : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे बाहेरगावहून येणाऱ्या

मुंबईत मुसळधार पाऊस, मुंबईसह कोकणात रेड अलर्ट, पुढील 3 – 4 तास महत्वाचे, सखल भागात पाणी साचलं, रेल्वे वाहतुकीवर परिणाम

राज्यात मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांना तडका दिला असून पुढील ३ ते ४ तासांत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड,

‘सुखोई’च्या आवाजाने दिडोंरी थरथरली

घरांच्या काचा फुटल्या २५ किमी परिसरात आवाजाचे पडसाद स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण तलाठी, तहसीलदारांकडून

छगन भुजबळांनी दिला ध्वजारोहणाला नकार? हे आहे कारण

नाशिक: १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी झेंडा कोण फडकवणार? यावरून राज्यात वातावरण पेटलेले आहे. नाशिक आणि रायगड या दोन

इगतपुरीच्या रिसोर्टमधील कॉल सेंटरवर CBI चा छापा

अमेरिका, कॅनडासह परदेशी नागरिकांची फसवणूक नाशिक: इगतपुरी येथील रिसोर्टमधून विदेशी नागरिकांना फोन करून