WCL च्या उपांत्य फेरीत पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास भारताचा नकार, गुरुवारी होणार होती लढत

एजबॅस्टन: भारतीय चॅम्पियन्सनी वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स (WCL) च्या उपांत्य फेरीत पाकिस्तान चॅम्पियन्सविरुद्ध खेळण्यास नकार दिला आहे. हा सामना गुरुवारी होणार होता. भारतीय संघाचे म्हणणे आहे की, त्यांना पाकिस्तानविरुद्ध कोणत्याही प्रकारचा सामना खेळायचा नाही.


भारतीय चॅम्पियन्सने मंगळवारी वेस्ट इंडिज चॅम्पियन्सना फक्त १३.२ षटकांत हरवून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. परंतु त्यांनी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याबाबत आधीच आक्षेप घेतला होता. यापूर्वीही, खेळाडू आणि स्पर्धेच्या एका प्रमुख प्रायोजकाने विरोध केल्याने गट टप्प्यातील भारत-पाकिस्तान सामना रद्द करण्यात आला होता.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्पर्धेचे प्रायोजक असलेल्या EaseMyTrip नावाच्या कंपनीनेही सेमीफायनल सामन्यापासून स्वतःला दूर ठेवले. कंपनीचे सह-संस्थापक निशांत पिट्टी म्हणाले की, भारतीय लोकांच्या भावनांचा आदर करून आम्ही या सामन्यातून माघार घेत आहोत. त्यांच्या मते, "दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र पुढे जाऊ शकत नाहीत."


माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवन यांनीही पाकिस्तानविरुद्ध मॅच न खेळण्याचा पवित्रा घेतला आहे. या स्पर्धेत भारताची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांना पहिल्या तीन सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला. त्यांना दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. पाकिस्तानविरुद्धचा गट सामना पावसामुळे रद्द झाला. मात्र वेस्ट इंडिजविरुद्ध विजय मिळवल्यानंतर भारत उपांत्य फेरीत पोहोचला.


या स्पर्धेच्या गट टप्प्यात भारताने पाकिस्तानविरुद्ध यापूर्वीही एक सामना खेळलेला नाही. कारण पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तान सोबत कोणत्याही प्रकारचा सामना न खेळण्याचे धोरण भारतीय संघातील अनेक खेळाडूंनी अवलंबले. ज्यामुळे अनेक खेळाडूंनी या सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. ज्यात शिखर धवन, हरभजन सिंग आणि युसूफ पठाण या महत्वाच्या खेळाडूंचा देखील समावेश होता. त्यांचे हे बहिष्कार सत्र आताही कायम असून, उपांत्य असो वा अंतिम सामना असो, पाकिस्तान विरुद्ध अजिबात खेळणार नसल्याचे धोरण त्यांनी अवलंबले आहे. धवनने सोशल मीडियावर एक जुना ईमेल शेअर केला होता, ज्यामध्ये त्याने WCL आयोजकांना आधीच कळवले होते की भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावामुळे तो पाकिस्तानविरुद्ध कोणताही सामना खेळणार नाही.

Comments
Add Comment

न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची निराशाजनक सुरुवात

कोलंबो : आर. प्रेमदासा स्टेडियम येथे आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील सुपर ८ फेरीतला श्रीलंका विरुद्ध

...तरच भारत सेमी फायनल खेळू शकेल

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये सुपर ८ फेरीचे सामने सुरू आहेत. ग्रुप एक मध्ये वेस्ट इंडिज (धावगती

फिटनेस स्टार मयांक पवार याचे ३७ व्या वर्षी आकस्मिक निधन

मुंबई : रिअ‍ॅलिटी शोच्या दुनियेतून प्रसिद्धी मिळवलेले आणि फिटनेस क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण करणारे

ICC Women's T20 World Cup : आयसीसी महिला टी२० विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या भारताचा सामना कधी ?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२६ चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. ही

विंडीजचा झिम्बाब्वे विरुद्ध मोठा विजय

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर ८ फेरीत वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाब्वे हा सामना

‘जर-तर’च्या समीकरणावर ठरणार भारताचा सेमीफायनलचा प्रवेश!

धावगती उंचावण्यासाठी दोन्ही सामने फरकाने जिंकावे लागणार नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कपमध्ये सर्वात मजबूत संघ