NISAR Satellite : सर्वात महागडा आणि शक्तिशाली उपग्रह ‘NISAR’उड्डाणासाठी सज्ज; ISRO आणि NASAचा मोठा पराक्रम

घनदाट जंगलात आणि अंधारातही पाहण्याची क्षमता



नवी मुंबई : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आणि अमेरिकन अंतराळ संस्था (NASA) यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या जगातील सर्वात महागड्या आणि शक्तिशाली पृथ्वी निरीक्षण उपग्रह 'निसार'चे आज ३० जुलै रोजी प्रक्षेपित केलं जाईल. श्रीहरिकोटा (Shriharikota) येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून संध्याकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी GSLV-F१६ रॉकेटद्वारे प्रक्षेपित केला जाणार आहे. हे रॉकेट निसारला सूर्यासोबत ७४३ किमी उंचीवर असलेल्या सूर्य-समकालिक कक्षेत ठेवेल, ज्याचा कल ९८.४ अंश आहे. यास सुमारे १८ मिनिटे लागतील. हा उपग्रह नासा आणि इस्रो यांनी संयुक्तपणे तयार केला आहे. निसार ७४७ किमी उंचीवर ध्रुवीय कक्षेत फिरेल. ध्रुवीय कक्षा ही एक अशी कक्षा आहे ज्यामध्ये उपग्रह पृथ्वीच्या ध्रुवांवरून (उत्तर आणि दक्षिण) जातो. या मोहिमेचा कालावधी ५ वर्षे आहे.



आता निसार उपग्रह म्हणजे काय?


निसार हा एक उच्च-तंत्रज्ञानाचा उपग्रह आहे. त्याचे पूर्ण नाव नासा-इस्रो सिंथेटिक एपर्चर रडार आहे. हे उपग्रह अमेरिकन अंतराळ संस्था नासा आणि भारतीय संस्था इस्रो यांनी संयुक्तपणे बांधला आहे. या मोहिमेवर १.५ अब्ज डॉलर्स किंवा सुमारे १२,५०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. हा उपग्रह ९७ मिनिटांत एकदा पृथ्वीभोवती फिरेल. १२ दिवसांत १,१७३ वेळा प्रदक्षिणा घालून, तो पृथ्वीच्या जमिनीच्या जवळजवळ प्रत्येक इंचाचा नकाशा काढेल. त्यात ढग, घनदाट जंगले, धूर आणि अंधारातही पाहण्याची क्षमता आहे. ते पृथ्वीच्या पृष्ठभागावरील अगदी लहान बदल देखील पाहू शकते.




निसार मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट काय आहेत?


NISAR मोहिमेचा मुख्य उद्देश पृथ्वी आणि तिच्या पर्यावरणाचा सखोल अभ्यास करणे आहे. हा उपग्रह विशेषतः खालील तीन गोष्टींवर लक्ष ठेवणार आहे:


१. जमीन आणि बर्फातील बदल: पृथ्वीच्या पृष्ठभागावर किंवा हिमनद्यात (उदा. ग्लेशियर) होणारे बदल, जसे की जमिनीचे खचणे किंवा बर्फ वितळणे, यांचे निरीक्षण करणे.

२. जमिनीवरील परिसंस्था: जंगल, शेतजमीन आणि इतर नैसर्गिक परिसरांची स्थिती समजून घेण्यासाठी त्यांचे निरीक्षण करणे.

३. समुद्री भाग: समुद्रातील लाटा, त्यातील बदल आणि सागरी पर्यावरण यांचे परीक्षण करणे.




दर १२ दिवसांनी हे निरीक्षण होणार


निसार मिशनचा मुख्य उद्देश पृथ्वीवरील भूभाग आणि हिमनद्या यांच्यातील हालचाली, भू-संरचना, समुद्र किनारे, बेटं, समुद्रातील बर्फ आणि विशिष्ट महासागर क्षेत्रांमध्ये होणाऱ्या बदलांचा अत्याधुनिक रडार प्रणालीद्वारे अभ्यास करणे हा आहे. दर १२ दिवसांनी हे निरीक्षण केले जाणार आहे, त्यामुळे पृथ्वीच्या हवामान बदलांचा, भूकंप, वाळवंटीकरण यांसारख्या प्रक्रियांवर संशोधनासाठी महत्त्वपूर्ण माहिती मिळणार आहे.




पारंपरिक उपग्रहांपेक्षा NISAR कसा वेगळा आहे?


पृथ्वीवरील वेगवान बदल पारंपरिक उपग्रहांद्वारे अचूकपणे टिपता येत नाहीत. NISAR हा हा तुटवडा भरून काढतो. तो पृथ्वीवरील लहानात लहान आणि मोठ्यात मोठा असा प्रत्येक हालचालींचा जवळजवळ रिअल-टाईम मागोवा घेईल.




NISAR उपग्रह कसा कार्य करतो?


NISAR मध्ये १२ मीटर व्यासाचा सोनेरी पत्र्याने आच्छादलेला रडार अँटेना असून, तो ९ मीटर लांबीच्या बूमला जोडलेला आहे. हा अँटेना पृथ्वीवर मायक्रोवेव्ह सिग्नल पाठवतो आणि त्याचे परावर्तन परत आल्यावर माहिती मिळवली जाते. विशेष म्हणजे, याला सूर्यप्रकाशाची आवश्यकता नसते.



उपग्रह उड्डाणानंतर अवकाशात १८ मिनिटांत सोडला जाईल. त्यानंतर हे मिशन चार टप्प्यांमध्ये काम करणार आहे


१. लॉन्च (उड्डाण)


२. डिप्लॉयमेंट (उपग्रह विस्तार) – यामध्ये नासाने तयार केलेला १२ मीटरचा रडार परावर्तक ९ मीटरच्या बूमच्या सहाय्याने उघडला जाईल.


३. कमिशनिंग (परीक्षण) – ९० दिवस चालणाऱ्या या टप्प्यात सर्व यंत्रणांची तपासणी आणि चाचण्या केल्या जातील.


४. सायन्स ऑपरेशन्स (वैज्ञानिक निरीक्षण) – कमीशनींग टप्प्यानंतर NISAR आपले वैज्ञानिक कार्य सुरू करेल आणि पृथ्वीचे सातत्याने निरीक्षण करेल. यामध्ये नियमित रडार निरीक्षण, कक्षाबदल आणि इस्रो-नासा समन्वयातून डेटा संकलन होईल.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला