मुंबईकरांची तहान भागविणा-या सातही धरणात मुबलक पाणीसाठा

धरणांतील पाणीसाठा ८८.३८ टक्क्यांवर


मुंबई (वार्ताहर) : मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या सातही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची रिमझीम सुरू असून तानसा आणि मोडकसागर यापूर्वीच ओसंडून वाहू लागले आहेत. सातही धरणांमधील पाणीसाठा हा ८८.३८ टक्क्यांवर पोहोचला असून मागील दोन वर्षांच्या तुलनेत पाणीसाठा अधिक आहे.


मुंबईकरांना उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांमध्ये प्रतिदिन ३९०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. मार्च-एप्रिलमध्ये सातही धरणांनी तळ गाठायला सुरुवात केली होती. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या जलअभियंता विभाग चिंताग्रस्त होता. मात्र पावसाने मे महिन्यामध्ये दमदार हजेरी लावल्यामुळे धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.


सातही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची रिमझिम सुरू आहे. जलअभियंता विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार २९ जुलै रोजी सकाळी ६ च्या नोंदीनुसार उर्ध वैतरणामध्ये ३७ मिमी, मोडकसागरमध्ये ३८ मिमी, तानसामध्ये १६ मिमी, मध्य वैतरणामध्ये ४० मिमी, भातसामध्ये २२ मिमी, विहारमध्ये ६ मिमी, तुलशीमध्ये ३५ मिमी. पावसाची नोंद झाली. या सातही धरणांमधील वापरायोग्य पाण्याची पातळी अनुक्रमे ८१.८९, १०० टक्के, ९८.४१ टक्के, ९५.९५ टक्के, ८५ टक्के, ७१.०९ टक्के आणि ८०.२७ टक्के इतकी आहे.



मागील दोन वर्षांच्या तुलनेत पाणीसाठी अधिक


सातही धरणांमध्ये आता ८८.३८ टक्के म्हणजे १२ लाख ७९ हजार १७९ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. मागील वर्षी (२०२४) याच दिवशी धरणांमध्ये ७३.७७ टक्के म्हणजेच १० लाख ६७हजार ७०३ दशलक्ष लिटर, तर २०२३ मध्ये याच दिवशी ७१.८४ टक्के म्हणजे १० लाख ३९ हजार ८२५ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध होता. सातही धरणांची पाणीसाठवण क्षमता १४ लाख ४७हजार ३६३ दशलक्ष लिटर इतकी आहे.

Comments
Add Comment

राज्यात आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई  : राज्य शासनाने प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल केले असून, राज्यातील ८ वरिष्ठ सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांच्या

ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये मंत्री नितेश राणेंच्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा डंका

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तीपत्र मुंबई  : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक,

महाराष्ट्रात १ एप्रिलपासून वीजदरात कपात

मुंबई : राज्यातील लाखो वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी असून, येत्या १ एप्रिलपासून वीजदरात कपात लागू होणार आहे.

राष्ट्रीय महामार्गांतील प्रकल्पग्रस्तांसाठी ऐतिहासिक निर्णय

राज्यातील २८ हजार प्रलंबित दावे जलद मार्गी लावण्यासाठी ५७ लवादांची नियुक्ती फडणवीस सरकारचा शेतकरी हिताचा

मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्या, मध्य, आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक; वेळ पाहूनच बाहेर पडा

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर

राज्यात ‘वन स्टेट, वन पोर्टल’ संकल्पनेला गती; महा सारथी पोर्टलचे मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई : राज्यात डिजिटल गव्हर्नन्स अधिक सक्षम व नागरिककेंद्रित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘वन स्टेट, वन