मुंबईकरांची तहान भागविणा-या सातही धरणात मुबलक पाणीसाठा

धरणांतील पाणीसाठा ८८.३८ टक्क्यांवर


मुंबई (वार्ताहर) : मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या सातही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची रिमझीम सुरू असून तानसा आणि मोडकसागर यापूर्वीच ओसंडून वाहू लागले आहेत. सातही धरणांमधील पाणीसाठा हा ८८.३८ टक्क्यांवर पोहोचला असून मागील दोन वर्षांच्या तुलनेत पाणीसाठा अधिक आहे.


मुंबईकरांना उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांमध्ये प्रतिदिन ३९०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. मार्च-एप्रिलमध्ये सातही धरणांनी तळ गाठायला सुरुवात केली होती. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या जलअभियंता विभाग चिंताग्रस्त होता. मात्र पावसाने मे महिन्यामध्ये दमदार हजेरी लावल्यामुळे धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.


सातही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची रिमझिम सुरू आहे. जलअभियंता विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार २९ जुलै रोजी सकाळी ६ च्या नोंदीनुसार उर्ध वैतरणामध्ये ३७ मिमी, मोडकसागरमध्ये ३८ मिमी, तानसामध्ये १६ मिमी, मध्य वैतरणामध्ये ४० मिमी, भातसामध्ये २२ मिमी, विहारमध्ये ६ मिमी, तुलशीमध्ये ३५ मिमी. पावसाची नोंद झाली. या सातही धरणांमधील वापरायोग्य पाण्याची पातळी अनुक्रमे ८१.८९, १०० टक्के, ९८.४१ टक्के, ९५.९५ टक्के, ८५ टक्के, ७१.०९ टक्के आणि ८०.२७ टक्के इतकी आहे.



मागील दोन वर्षांच्या तुलनेत पाणीसाठी अधिक


सातही धरणांमध्ये आता ८८.३८ टक्के म्हणजे १२ लाख ७९ हजार १७९ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. मागील वर्षी (२०२४) याच दिवशी धरणांमध्ये ७३.७७ टक्के म्हणजेच १० लाख ६७हजार ७०३ दशलक्ष लिटर, तर २०२३ मध्ये याच दिवशी ७१.८४ टक्के म्हणजे १० लाख ३९ हजार ८२५ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध होता. सातही धरणांची पाणीसाठवण क्षमता १४ लाख ४७हजार ३६३ दशलक्ष लिटर इतकी आहे.

Comments
Add Comment

‘पॉड टॅक्सी’साठी महापालिकांनी आराखडा तयार करावा'

मुंबई : प्रवाशांना घरापासून ते थेट कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून

विरोधी पक्षात बसताच उबाठाच्या नगरसेवकांना आसने टोचू लागली

महापालिका सभागृहातील आसन व्यवस्थेत होणार सुधारणार गटनेत्यांच्या अनौपचारिक बैठकीत प्रशासनाला दिल्या

बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांविरोधात कारवाईला वेग

मुंबई : मुंबई उपनगरचे सहपालक मंत्री गेल्या पाच वर्षापासून सातत्याने बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांच्या

मध्य, हार्बरसह पश्चिम रेल्वेवर ब्लॉक

खारबाव येथील नियोजित रात्रकालीन मेगाब्लॉक रद्द मुंबई (प्रतिनिधी) : रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि

कांजूरमार्ग कारशेडच्या जागेबाबत खासगी विकासकांची याचिका फेटाळली

मुंबई : ‘स्वामी समर्थ नगर – विक्रोळी मेट्रो ६’ मार्गिकेच्या कारशेडसाठी हस्तांतरित करण्यात आलेल्या कांजूरमार्ग

Water Metro Project: मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार; लवकरच सुरु होणार 'जल मेट्रो प्रकल्प'

मुंबई: मुंबईच्या दैनंदिन वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची लवकरच सुटका होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. खासदार